[ad_1]
औरंगाबाद : मराठवाड्यात यंदाच्या गाळप हंगामात सहभागी कारखान्यांनी १३ मार्चपर्यंत २ कोटी २३ लाख ३३ हजार ५०८ टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून २ कोटी २३ लाख ८२ हजार २९० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
औरंगाबाद, जालना, लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील कारखान्यांचा सरासरी साखर उतारा १० टक्क्यांपुढे आहे. तर उस्मानाबाद, बीड व नांदेड जिल्ह्यातील कारखान्यांचा साखर उतारा १० टक्क्यांच्या आतच आहे. ५९ कारखान्यांपैकी ३६ कारखाने दैनंदिन गाळप क्षमतेच्या पुढे उसाचे गाळप करीत आहेत.
यंदाच्या ऊस गाळप हंगामात आजवर उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक १३, त्यापाठोपाठ लातूरमधील १०, औरंगाबाद व बीडमधील प्रत्येकी ७, परभणी व नांदेडमधील प्रत्येकी ६, हिंगोली व जालनामधील प्रत्येकी ५ कारखान्यांनी सहभाग नोंदविला आहे. १३ मार्चपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील ७ कारखान्यांनी २० लाख १ हजार २९८ टन, जालन्यातील ५ कारखान्यांनी १८ लाख ९६ हजार ३४३ टन, बीडमधील ७ कारखान्यांनी २९ लाख २८ हजार ८७ क्विंटल, उस्मानाबाद जिल्ह्यातील १३ कारखान्यांनी ५१ लाख ८६ हजार ८७५ टन उसाचे गाळप केले. लातूर जिल्ह्यातील १० कारखान्यांनी ३९ लाख ६५ हजार २१८ टन, परभणी जिल्ह्यातील ६ कारखान्यांनी २८ लाख ५४ हजार ९२६ टन, हिंगोली जिल्ह्यातील ५ साखर कारखान्यांनी १६ लाख २३ हजार ९८७ टन, नांदेड जिल्ह्यातील ६ कारखान्यांनी १८ लाख ७६ हजार ७७४ टन उसाचे गाळप केले.
३६ कारखान्यांकडून क्षमतेहून जास्त गाळप
उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक ८, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेडमधील प्रत्येकी ३, तर परभणी व हिंगोलीतील प्रत्येकी ५ व लातूरमधील ६ कारखान्यांनी क्षमतेहून अधिक गाळप केले.
औरंगाबाद : मराठवाड्यात यंदाच्या गाळप हंगामात सहभागी कारखान्यांनी १३ मार्चपर्यंत २ कोटी २३ लाख ३३ हजार ५०८ टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून २ कोटी २३ लाख ८२ हजार २९० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
औरंगाबाद, जालना, लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील कारखान्यांचा सरासरी साखर उतारा १० टक्क्यांपुढे आहे. तर उस्मानाबाद, बीड व नांदेड जिल्ह्यातील कारखान्यांचा साखर उतारा १० टक्क्यांच्या आतच आहे. ५९ कारखान्यांपैकी ३६ कारखाने दैनंदिन गाळप क्षमतेच्या पुढे उसाचे गाळप करीत आहेत.
यंदाच्या ऊस गाळप हंगामात आजवर उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक १३, त्यापाठोपाठ लातूरमधील १०, औरंगाबाद व बीडमधील प्रत्येकी ७, परभणी व नांदेडमधील प्रत्येकी ६, हिंगोली व जालनामधील प्रत्येकी ५ कारखान्यांनी सहभाग नोंदविला आहे. १३ मार्चपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील ७ कारखान्यांनी २० लाख १ हजार २९८ टन, जालन्यातील ५ कारखान्यांनी १८ लाख ९६ हजार ३४३ टन, बीडमधील ७ कारखान्यांनी २९ लाख २८ हजार ८७ क्विंटल, उस्मानाबाद जिल्ह्यातील १३ कारखान्यांनी ५१ लाख ८६ हजार ८७५ टन उसाचे गाळप केले. लातूर जिल्ह्यातील १० कारखान्यांनी ३९ लाख ६५ हजार २१८ टन, परभणी जिल्ह्यातील ६ कारखान्यांनी २८ लाख ५४ हजार ९२६ टन, हिंगोली जिल्ह्यातील ५ साखर कारखान्यांनी १६ लाख २३ हजार ९८७ टन, नांदेड जिल्ह्यातील ६ कारखान्यांनी १८ लाख ७६ हजार ७७४ टन उसाचे गाळप केले.
३६ कारखान्यांकडून क्षमतेहून जास्त गाळप
उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक ८, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेडमधील प्रत्येकी ३, तर परभणी व हिंगोलीतील प्रत्येकी ५ व लातूरमधील ६ कारखान्यांनी क्षमतेहून अधिक गाळप केले.
[ad_2]
Source link