[ad_1]
औरंगाबाद : मराठवाड्यातील ७५ मध्यम व ७५२ लघु प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा ६० टक्क्यांपुढे असल्याचे चित्र आहे. लातूर जिल्ह्यातील लघु-मध्यम प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा सर्वात कमी ६० टक्के तर जालना जिल्ह्यातील लघु प्रकल्पात सर्वाधिक १०१ टक्के तर परभणी जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात सर्वाधिक ९४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
यंदा मराठवाड्यात जोरदार पावसामुळे पाणीसाठ्याची स्थिती आजघडीला चांगली आहे. सर्व ७५ मध्यम प्रकल्पांत १८ डिसेंबर अखेरपर्यंत सरासरी ८५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील १६ प्रकल्पांत ९१ टक्के, जालन्यातील ७ प्रकल्पांत ९३ टक्के, बीडमधील १६ प्रकल्पांत ८९ टक्के, लातूरमधील ८ प्रकल्पांत ६० टक्के, उस्मानाबादमधील १७ प्रकल्पांत ८५ टक्के, नांदेडमधील ९ प्रकल्पांत ८५ टक्के तर परभणीतील दोन मध्यम प्रकल्पांत ९४ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
२०१८ मध्ये सर्व मध्यम प्रकल्पांत केवळ १२ टक्के तर २०१९ मध्ये १८ डिसेंबर अखेरपर्यंतच केवळ ५३ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. मराठवाड्यातील ७५२ लघु प्रकल्पांत सरासरी ७२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये औंरगाबाद जिल्ह्यातील ९६ लघु प्रकल्पांत ६९ टक्के, जालनामधील ५७ प्रकल्पांत सर्वाधिक १०१ टक्के, बीडमधील १२६ प्रकल्पांत ७६ टक्के, लातूरमधील १३२ प्रकल्पांत ६९ टक्के, उस्मानाबादमधील २०५ प्रकल्पांत सर्वात कमी ६० टक्के, नांदेडमधील ८८ प्रकल्पांत ८० टक्के, परभणीमधील २२ प्रकल्पांत ७७ टक्के तर हिंगोलीतील २६ लघु प्रकल्पांत ८० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. १८ डिसेंबर २०१८ अखेर मराठवाड्यातील ७५२ लघु प्रकल्पांत केवळ १२ टक्के तर २०१९ मध्ये केवळ ४६ टक्केच उपयुक्त पाणीसाठा होता, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली.
पाच लघु प्रकल्प कोरडे
मराठवाड्यातील ७५२ लघु प्रकल्पांपैकी ५ प्रकल्प कोरडेठाक आहेत. त्यामध्ये औरंगाबाद बीड जिल्ह्यातील प्रत्येकी १ तर लातूर जिल्ह्यातील तीन लघु प्रकल्पांचा समावेश आहे. दुसरीकडे २२ लघु प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा जोत्याखाली आहे. त्यामध्ये जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी चार, औरंगाबादमधील पाच व नांदेड जिल्ह्यातील एका लघु प्रकल्पाचा समावेश आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यातील ७५ मध्यम व ७५२ लघु प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा ६० टक्क्यांपुढे असल्याचे चित्र आहे. लातूर जिल्ह्यातील लघु-मध्यम प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा सर्वात कमी ६० टक्के तर जालना जिल्ह्यातील लघु प्रकल्पात सर्वाधिक १०१ टक्के तर परभणी जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात सर्वाधिक ९४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
यंदा मराठवाड्यात जोरदार पावसामुळे पाणीसाठ्याची स्थिती आजघडीला चांगली आहे. सर्व ७५ मध्यम प्रकल्पांत १८ डिसेंबर अखेरपर्यंत सरासरी ८५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील १६ प्रकल्पांत ९१ टक्के, जालन्यातील ७ प्रकल्पांत ९३ टक्के, बीडमधील १६ प्रकल्पांत ८९ टक्के, लातूरमधील ८ प्रकल्पांत ६० टक्के, उस्मानाबादमधील १७ प्रकल्पांत ८५ टक्के, नांदेडमधील ९ प्रकल्पांत ८५ टक्के तर परभणीतील दोन मध्यम प्रकल्पांत ९४ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
२०१८ मध्ये सर्व मध्यम प्रकल्पांत केवळ १२ टक्के तर २०१९ मध्ये १८ डिसेंबर अखेरपर्यंतच केवळ ५३ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. मराठवाड्यातील ७५२ लघु प्रकल्पांत सरासरी ७२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये औंरगाबाद जिल्ह्यातील ९६ लघु प्रकल्पांत ६९ टक्के, जालनामधील ५७ प्रकल्पांत सर्वाधिक १०१ टक्के, बीडमधील १२६ प्रकल्पांत ७६ टक्के, लातूरमधील १३२ प्रकल्पांत ६९ टक्के, उस्मानाबादमधील २०५ प्रकल्पांत सर्वात कमी ६० टक्के, नांदेडमधील ८८ प्रकल्पांत ८० टक्के, परभणीमधील २२ प्रकल्पांत ७७ टक्के तर हिंगोलीतील २६ लघु प्रकल्पांत ८० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. १८ डिसेंबर २०१८ अखेर मराठवाड्यातील ७५२ लघु प्रकल्पांत केवळ १२ टक्के तर २०१९ मध्ये केवळ ४६ टक्केच उपयुक्त पाणीसाठा होता, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली.
पाच लघु प्रकल्प कोरडे
मराठवाड्यातील ७५२ लघु प्रकल्पांपैकी ५ प्रकल्प कोरडेठाक आहेत. त्यामध्ये औरंगाबाद बीड जिल्ह्यातील प्रत्येकी १ तर लातूर जिल्ह्यातील तीन लघु प्रकल्पांचा समावेश आहे. दुसरीकडे २२ लघु प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा जोत्याखाली आहे. त्यामध्ये जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी चार, औरंगाबादमधील पाच व नांदेड जिल्ह्यातील एका लघु प्रकल्पाचा समावेश आहे.
[ad_2]
Source link