[ad_1]
अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन बियाण्याचे दर जाहीर केले आहेत. कृषिमंत्री दादा भुसे यांनी बियाण्याचे दर महाबीजने वाढवू नये, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत प्रशासनाने गतवर्षाचे दर कायम ठेवले आहेत. दुसरीकडे यंदा सोयाबीन महागले असतानाही महाबीजने बियाण्याची दरवाढ न केल्याने आता खासगी कंपन्यांच्या दरांकडेही लक्ष लागले आहे.
राज्यात आगामी हंगामासाठी बियाण्याचा लवकरच पुरवठा सुरू होणार आहे. त्यादृष्टीने बियाण्याच्या दरांकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी महाबीजने निर्णय घेत या खरीप हंगामासाठी दर जाहीर केले. महाबीजकडून राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी लाखो क्विंटल सोयाबीन बियाण्याचा पुरवठा केला जातो. यंदा परतीच्या पावसामुळे बीजोत्पादन क्षेत्रात नुकसान झाले होते. त्याचा फटका महाबीजलाही बसलेला आहे.
अपेक्षित सोयाबीन मिळू शकलेले नाही. त्यामुळे या हंगामासाठी किती क्विंटल बियाणे महाबीज पुरवेल याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही. यंदा अधिक भार खासगी कंपन्यांच्या बियाण्यावरही राहणार आहे. महाबीजने यंदा दरवाढ टाळल्याने बाजारपेठेत सोयाबीन बियाण्याच्या दरांवर आपोआप नियंत्रण येईल, अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे. राज्यात मध्य प्रदेशातील बियाणे कंपन्यांकडून पुरवठा केला जातो.
बाजारपेठेत यंदा सोयाबीनला चांगला भाव मिळालेला आहे. तरीही शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत महाबीजने यंदा बियाण्यात कुठलीही दरवाढ केलेली नाही. अशाच प्रकारे आता खासगी कंपन्यांनीही आपल्या सोयाबीन बियाण्याचे दर शेतकरी हिताचे काढण्याची वेळ आलेली आहे.
– वल्लभराव देशमुख, संचालक, महाबीज, अकोला
अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन बियाण्याचे दर जाहीर केले आहेत. कृषिमंत्री दादा भुसे यांनी बियाण्याचे दर महाबीजने वाढवू नये, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत प्रशासनाने गतवर्षाचे दर कायम ठेवले आहेत. दुसरीकडे यंदा सोयाबीन महागले असतानाही महाबीजने बियाण्याची दरवाढ न केल्याने आता खासगी कंपन्यांच्या दरांकडेही लक्ष लागले आहे.
राज्यात आगामी हंगामासाठी बियाण्याचा लवकरच पुरवठा सुरू होणार आहे. त्यादृष्टीने बियाण्याच्या दरांकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी महाबीजने निर्णय घेत या खरीप हंगामासाठी दर जाहीर केले. महाबीजकडून राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी लाखो क्विंटल सोयाबीन बियाण्याचा पुरवठा केला जातो. यंदा परतीच्या पावसामुळे बीजोत्पादन क्षेत्रात नुकसान झाले होते. त्याचा फटका महाबीजलाही बसलेला आहे.
अपेक्षित सोयाबीन मिळू शकलेले नाही. त्यामुळे या हंगामासाठी किती क्विंटल बियाणे महाबीज पुरवेल याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही. यंदा अधिक भार खासगी कंपन्यांच्या बियाण्यावरही राहणार आहे. महाबीजने यंदा दरवाढ टाळल्याने बाजारपेठेत सोयाबीन बियाण्याच्या दरांवर आपोआप नियंत्रण येईल, अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे. राज्यात मध्य प्रदेशातील बियाणे कंपन्यांकडून पुरवठा केला जातो.
बाजारपेठेत यंदा सोयाबीनला चांगला भाव मिळालेला आहे. तरीही शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत महाबीजने यंदा बियाण्यात कुठलीही दरवाढ केलेली नाही. अशाच प्रकारे आता खासगी कंपन्यांनीही आपल्या सोयाबीन बियाण्याचे दर शेतकरी हिताचे काढण्याची वेळ आलेली आहे.
– वल्लभराव देशमुख, संचालक, महाबीज, अकोला
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.