[ad_1]
अकोला: महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अर्थात ‘महाबीज’च्या भागधारकांची सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता. २२) घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोरोनाचे कारण देत ही सभा ऑनलाइन पद्धतीने घेतली जात असल्याने सभा होण्यापूर्वीच गाजू लागली आहे.
दरवर्षी महाबीजची वार्षिक सर्वसाधारण सभा विविध मुद्यांवर गाजत असते. यंदा तर महाबीजचे बियाणे खरिपात अनेक जिल्ह्यांत निघालेले नव्हते. त्यामुळे काही जिल्ह्यांत शासनाकडून गुन्हेही दाखल झालेले आहेत.
बीजोत्पादकांचेही विविध प्रश्न प्रलंबित आहेत. महाबीज कर्मचाऱ्यांचे आंदोलनही सुरू आहे. याबाबत सर्वसाधारण सभेत घमासान चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र ही सभा ऑनलाइन पद्धतीने घेतली जात असल्याने किती भागधारक बोलू शकतील, किती जणांना वेळ दिला जाईल, नियोजन कसे असेल याबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
कोरोनामुळे गेले काही महिने सुरू असलेला लॉकडाउन आता शिथिल झाला आहे. अशा परिस्थितीत ही सर्वसाधारण सभा दरवर्षी होते त्याच पद्धतीने घेण्याविषयी भागधारकांचा आग्रह आहे. परंतु महाबीज प्रशासनाने कोरोनाच्या कारणामुळे सभा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन केले आहे.
नवे एमडी अद्यापही रुजू नाहीत
अनिल भंडारी यांची मुंबईला बदली केल्यानंतर शासनाने महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकपदी लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची नियुक्ती केली आहे. आठवडाभरापूर्वी ही नियुक्ती झाली आहे. श्रीकांत यांनी लातूरचा पदभार नव्या जिल्हाधिकाऱ्यांना सोपविला आहे. मात्र दुसरीकडे ते अद्यापही येथे रूजू झालेले नाहीत. कदाचित ते पुढील आठवड्यात रुजू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सभा ऑफलाइन घ्या..
२२ डिसेंबरला ऑनलाइईन पद्धतीने सर्वसाधारण सभा होत आहे. मात्र अनेक भागधारक शेतकऱ्यांना या पद्धतीचा वापर करता येत नाही. बहुतांश भागधारक हे वयस्कर आहेत. त्यामुळे सभा ऑफलाइन व्हायला हवी होती. कोरोनामुळे शासनाकडून तशी परवानगी मिळाली नाही. ही सभा ऑफलाइन घ्या किंवा ती सभा पुढे ढकला अशी मागणी भागधारकांनी केली आहे. परंतु कंपनी कायद्यानुसार सभा घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या सभेशिवाय एमडींसोबत स्वतंत्र बैठकही घेण्याचा मी पर्याय दिला आहे. दरवर्षी सर्वसाधारण सभेत जे भागधारक प्रामुख्याने चर्चेत सहभागी होतात, अशा भागधारकांची एमडींसोबत बैठक ठेवण्याचे सुचविलेले आहे. या बैठकीत होणाऱ्या चर्चेतून उर्वरित भागधारकांचे प्रमुख प्रश्न चर्चिले जाऊ शकतील, असे मत महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
अकोला: महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अर्थात ‘महाबीज’च्या भागधारकांची सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता. २२) घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोरोनाचे कारण देत ही सभा ऑनलाइन पद्धतीने घेतली जात असल्याने सभा होण्यापूर्वीच गाजू लागली आहे.
दरवर्षी महाबीजची वार्षिक सर्वसाधारण सभा विविध मुद्यांवर गाजत असते. यंदा तर महाबीजचे बियाणे खरिपात अनेक जिल्ह्यांत निघालेले नव्हते. त्यामुळे काही जिल्ह्यांत शासनाकडून गुन्हेही दाखल झालेले आहेत.
बीजोत्पादकांचेही विविध प्रश्न प्रलंबित आहेत. महाबीज कर्मचाऱ्यांचे आंदोलनही सुरू आहे. याबाबत सर्वसाधारण सभेत घमासान चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र ही सभा ऑनलाइन पद्धतीने घेतली जात असल्याने किती भागधारक बोलू शकतील, किती जणांना वेळ दिला जाईल, नियोजन कसे असेल याबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
कोरोनामुळे गेले काही महिने सुरू असलेला लॉकडाउन आता शिथिल झाला आहे. अशा परिस्थितीत ही सर्वसाधारण सभा दरवर्षी होते त्याच पद्धतीने घेण्याविषयी भागधारकांचा आग्रह आहे. परंतु महाबीज प्रशासनाने कोरोनाच्या कारणामुळे सभा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन केले आहे.
नवे एमडी अद्यापही रुजू नाहीत
अनिल भंडारी यांची मुंबईला बदली केल्यानंतर शासनाने महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकपदी लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची नियुक्ती केली आहे. आठवडाभरापूर्वी ही नियुक्ती झाली आहे. श्रीकांत यांनी लातूरचा पदभार नव्या जिल्हाधिकाऱ्यांना सोपविला आहे. मात्र दुसरीकडे ते अद्यापही येथे रूजू झालेले नाहीत. कदाचित ते पुढील आठवड्यात रुजू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सभा ऑफलाइन घ्या..
२२ डिसेंबरला ऑनलाइईन पद्धतीने सर्वसाधारण सभा होत आहे. मात्र अनेक भागधारक शेतकऱ्यांना या पद्धतीचा वापर करता येत नाही. बहुतांश भागधारक हे वयस्कर आहेत. त्यामुळे सभा ऑफलाइन व्हायला हवी होती. कोरोनामुळे शासनाकडून तशी परवानगी मिळाली नाही. ही सभा ऑफलाइन घ्या किंवा ती सभा पुढे ढकला अशी मागणी भागधारकांनी केली आहे. परंतु कंपनी कायद्यानुसार सभा घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या सभेशिवाय एमडींसोबत स्वतंत्र बैठकही घेण्याचा मी पर्याय दिला आहे. दरवर्षी सर्वसाधारण सभेत जे भागधारक प्रामुख्याने चर्चेत सहभागी होतात, अशा भागधारकांची एमडींसोबत बैठक ठेवण्याचे सुचविलेले आहे. या बैठकीत होणाऱ्या चर्चेतून उर्वरित भागधारकांचे प्रमुख प्रश्न चर्चिले जाऊ शकतील, असे मत महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
[ad_2]
Source link