[ad_1]
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारपर्यंत (ता.१) केरळमध्ये दाखल होण्यास पोषकस्थिती असल्याचे भारतीय हवामान विभागाने गुरूवारी (ता.२८) जाहीर केले आहे. मॉन्सूनने अंदमान, निकोबार बेट समुहाच्या सर्व भागात मजल मारली आहे. तर अरबी समुद्रातील मालदीव आणि कोमोरीनच्या काही भागातही मॉन्सूनचे आगमन झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
यंदा मॉन्सून सर्वसाधारण वेळेच्या चार दिवस उशिराने म्हणजेच पाच जून रोजी दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. यात चार दिवसांची मागे पुढे तफावतही गृहीत धरण्यात आली होती. मात्र अरबी समुद्रात रविवारपर्यंत (ता.३१) कमी दाब क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. या प्रणालीमुळे मॉन्सून वारे खेचून आणण्यास पोषक स्थिती तयार होत असल्याने १ जून रोजी मॉन्सून केरळात दाखल होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे १७ मे रोजी मॉन्सून अंदमान, निकोबार बेटांवर दाखल झाला होता. मात्र हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकल्यानंतर तब्बल दहा दिवस दक्षिण दक्षिण अंदमानातच मॉन्सून अडखळला. बुधवारी (ता.२७) मॉन्सूनची वाटचाल पुन्हा सुरू झाली. त्यानंतर गुरूवारी (ता.२८) दुसऱ्याच दिवशी मॉन्सूनने संपूर्ण अंदमान बेटे आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात धडक दिली. तर भारताच्या दक्षिणेकडे असलेल्या मालदीव आणि कोमोरीन भागातही मॉन्सून वारे दाखल झाले आहेत. शनिवारपर्यंत (ता.३०) मालदीव कोमोरीन बेटांच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारपर्यंत (ता.१) केरळमध्ये दाखल होण्यास पोषकस्थिती असल्याचे भारतीय हवामान विभागाने गुरूवारी (ता.२८) जाहीर केले आहे. मॉन्सूनने अंदमान, निकोबार बेट समुहाच्या सर्व भागात मजल मारली आहे. तर अरबी समुद्रातील मालदीव आणि कोमोरीनच्या काही भागातही मॉन्सूनचे आगमन झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
यंदा मॉन्सून सर्वसाधारण वेळेच्या चार दिवस उशिराने म्हणजेच पाच जून रोजी दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. यात चार दिवसांची मागे पुढे तफावतही गृहीत धरण्यात आली होती. मात्र अरबी समुद्रात रविवारपर्यंत (ता.३१) कमी दाब क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. या प्रणालीमुळे मॉन्सून वारे खेचून आणण्यास पोषक स्थिती तयार होत असल्याने १ जून रोजी मॉन्सून केरळात दाखल होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे १७ मे रोजी मॉन्सून अंदमान, निकोबार बेटांवर दाखल झाला होता. मात्र हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकल्यानंतर तब्बल दहा दिवस दक्षिण दक्षिण अंदमानातच मॉन्सून अडखळला. बुधवारी (ता.२७) मॉन्सूनची वाटचाल पुन्हा सुरू झाली. त्यानंतर गुरूवारी (ता.२८) दुसऱ्याच दिवशी मॉन्सूनने संपूर्ण अंदमान बेटे आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात धडक दिली. तर भारताच्या दक्षिणेकडे असलेल्या मालदीव आणि कोमोरीन भागातही मॉन्सून वारे दाखल झाले आहेत. शनिवारपर्यंत (ता.३०) मालदीव कोमोरीन बेटांच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.
[ad_2]
Source link