[ad_1]
नाशिक : सिन्नर येथील युवा मित्र संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुनील पोटे (वय ५३) यांचे रविवारी (ता.१३) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या पश्च्यात आई, पत्नी, मुलगी असा परिवार आहे.
युवा मित्र संस्थेची स्थापना करून गेल्या दोन दशकांपासून ते सामाजिक विकासाच्या उपक्रमात सहभागी होते. ग्रामविकास, कृषी, जलसंधारण, महिला सक्षमीकरण, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात त्यांनी काम केले. शेतकरी, युवक व महिला यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून नेहमी पुढाकार घेतला. शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून शेतकरी उत्पादक कंपनीची चळवळ त्यांनी उभी केली. टाटा ट्रस्टच्या सहकार्याने प्रत्येक गावात जलसाक्षरता अभियानाद्वारे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे अनेक गावे पाणीदार झाली.
गेल्या काही वर्षांपूर्वी शेळीपालन व्यवसायासंबंधी काम हाती घेत महिला उपजीविका कार्यक्रमाला संघटित आणि व्यावसायिक स्वरूप त्यांनी दिले. पुढे या संघटनात्मक कार्यातून ”सावित्रीबाई फुले महिला शेळीपालक उत्पादक कंपनी” नावारूपास आली. तालुक्यातील ८० गावांमधील गरजू व होतकरू १२ हजार महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून त्यांनी मिळवून दिला.
अलीकडेच राज्यात जलसंपदा व लाभक्षेत्र विकास विभाग व युवा मित्र संस्था यांच्या दरम्यान नांदूर मध्यमेश्वर एक्सप्रेस कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये ‘पाण्याचा कार्यक्षमतेने वापर आणि उत्पादकता वाढविण्याबरोबरच एकात्मिक शेतीविषयक गुंतवणूक आणि बाजारपेठेशी जोडणी’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्याकरिता सामंजस्य करार त्यांनी केला होता. त्यांच्या निधनामुळे कृषी, महिला, युवा आणि ग्रामीण क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे.
नाशिक : सिन्नर येथील युवा मित्र संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुनील पोटे (वय ५३) यांचे रविवारी (ता.१३) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या पश्च्यात आई, पत्नी, मुलगी असा परिवार आहे.
युवा मित्र संस्थेची स्थापना करून गेल्या दोन दशकांपासून ते सामाजिक विकासाच्या उपक्रमात सहभागी होते. ग्रामविकास, कृषी, जलसंधारण, महिला सक्षमीकरण, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात त्यांनी काम केले. शेतकरी, युवक व महिला यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून नेहमी पुढाकार घेतला. शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून शेतकरी उत्पादक कंपनीची चळवळ त्यांनी उभी केली. टाटा ट्रस्टच्या सहकार्याने प्रत्येक गावात जलसाक्षरता अभियानाद्वारे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे अनेक गावे पाणीदार झाली.
गेल्या काही वर्षांपूर्वी शेळीपालन व्यवसायासंबंधी काम हाती घेत महिला उपजीविका कार्यक्रमाला संघटित आणि व्यावसायिक स्वरूप त्यांनी दिले. पुढे या संघटनात्मक कार्यातून ”सावित्रीबाई फुले महिला शेळीपालक उत्पादक कंपनी” नावारूपास आली. तालुक्यातील ८० गावांमधील गरजू व होतकरू १२ हजार महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून त्यांनी मिळवून दिला.
अलीकडेच राज्यात जलसंपदा व लाभक्षेत्र विकास विभाग व युवा मित्र संस्था यांच्या दरम्यान नांदूर मध्यमेश्वर एक्सप्रेस कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये ‘पाण्याचा कार्यक्षमतेने वापर आणि उत्पादकता वाढविण्याबरोबरच एकात्मिक शेतीविषयक गुंतवणूक आणि बाजारपेठेशी जोडणी’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्याकरिता सामंजस्य करार त्यांनी केला होता. त्यांच्या निधनामुळे कृषी, महिला, युवा आणि ग्रामीण क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे.
[ad_2]
Source link