[ad_1]
कोल्हापूर: यंदाच्या गळीत हंगामात ३२ सहकारी साखर कारखान्यांना बँकाकडून ५१६.३० कोटी रुपयांचे अल्प मुदतीचे कर्ज घेण्यासाठी शासनाने शासनहमी मंजूर केली आहे. याबाबतचा शासन आदेश काढला आहे. याबाबत निर्णय नुकताच मंत्री मंडळाने घेतला होता.
यंदा राज्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. जास्तीत जास्त साखर कारखाने सुरू होणे गरजेचे आहे. कारखाने सुरू होण्यासाठी कारखान्यांना अर्थसाह्य देण्याची मागणी कारखानदारांकडून होत होती. साखरेचे कमी असलेले दर व अन्य बाबींमुळे यंदा ऊस मुबलक असूनही आर्थिक कारखाने सुरू होण्यास अडथळे येत होते.
आर्थिक अडचणीमुळे ३२ सहकारी साखर कारखाने यंदाच्या हंगामात बंदच राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे या कारखान्यांच्या क्षेत्रातील ऊस गाळपाअभावी शिल्लक राहण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. ही स्थिती टाळण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला.
शासन हमी दिलेल्या कारखान्यामध्ये नगर, कोल्हापूर, बीड, नांदेड हिंगोली, सातारा, उस्मानाबाद, सोलापूर, जालना, लातूर, सांगली आदी जिल्ह्यांतील ३२ कारखान्यांचा समावेश आहे.
कोल्हापूर: यंदाच्या गळीत हंगामात ३२ सहकारी साखर कारखान्यांना बँकाकडून ५१६.३० कोटी रुपयांचे अल्प मुदतीचे कर्ज घेण्यासाठी शासनाने शासनहमी मंजूर केली आहे. याबाबतचा शासन आदेश काढला आहे. याबाबत निर्णय नुकताच मंत्री मंडळाने घेतला होता.
यंदा राज्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. जास्तीत जास्त साखर कारखाने सुरू होणे गरजेचे आहे. कारखाने सुरू होण्यासाठी कारखान्यांना अर्थसाह्य देण्याची मागणी कारखानदारांकडून होत होती. साखरेचे कमी असलेले दर व अन्य बाबींमुळे यंदा ऊस मुबलक असूनही आर्थिक कारखाने सुरू होण्यास अडथळे येत होते.
आर्थिक अडचणीमुळे ३२ सहकारी साखर कारखाने यंदाच्या हंगामात बंदच राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे या कारखान्यांच्या क्षेत्रातील ऊस गाळपाअभावी शिल्लक राहण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. ही स्थिती टाळण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला.
शासन हमी दिलेल्या कारखान्यामध्ये नगर, कोल्हापूर, बीड, नांदेड हिंगोली, सातारा, उस्मानाबाद, सोलापूर, जालना, लातूर, सांगली आदी जिल्ह्यांतील ३२ कारखान्यांचा समावेश आहे.
[ad_2]
Source link