[ad_1]
नगर/पुणे ः शेतकरी आत्महत्येला कारणीभूत असलेल्या बाबींवर लक्ष केंद्रित करून शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शनिवारपासून (ता. २८) शेतकरी संघटनेतर्फे ‘जनप्रबोधन यात्रा’ आयोजित केली आहे. यानिमित्त राज्यातील सहा जिल्ह्यांत पंधरा दिवस विविध कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिली.
महात्मा जोतिबा फुले यांचा २८ नोव्हेंबर रोजी स्मृती दिन आहे. तर १२ डिसेंबर हा परदेशी वस्तूंवर बहिष्कार घालणारे हुतात्मा बाबू गेनू यांचा बिलिदान दिवस आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या या दोन्ही महान व्यक्तींच्या स्मरणार्थ राज्यात होत असलल्या आत्महत्येचे कलंक पुसण्यासाठी शनिवारपासून (ता. २८) शेतकरी संघटनेतर्फे ‘जनप्रबोधन यात्रा’ आयोजित केली आहे.
यात्रेला कोल्हापूर जिल्ह्यातील निपाणी येथून सुरुवात होणार आहे. त्यानंतर तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात, तीन दिवस सांगली जिल्ह्यात, दोन दिवस सोलापूर जिल्ह्यात, दोन दिवस नगर जिल्ह्यात, तीन दिवस पुणे जिल्ह्यात व दोन दिवस सातारा जिल्ह्यात मेळावे, बैठका घेऊन शेतकऱ्यांत प्रबोधन करणार आहे.
१२ डिसेंबर रोजी सातारा येथे सभेत यात्रेचा समारोप होणार आहे. शेतीमालाला उत्पादन खर्चाइतकाही दर मिळत नाही. त्यामुळे शेतकरी कर्ज बाजारी झाला आहे. पन्नास वर्षे सतत कर्जमाफीच्या चर्चा चालू आहेत. मागच्या आणि आताच्या सरकारने केलेल्या कर्जमाफीपासून अनेक शेतकरी वंचित आहेत. उसाच्या दराबाबतबी फारसे गांभीर्याने घेतले जात नाही, अशा अनेक बाबींवर सरकारचे दुर्लक्ष आहे. याविषयी जनप्रबोधन यात्रेतून शेतकऱ्यांत जागृती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
…अशा आहेत मागण्या
- सर्व शेतकऱ्यांना सर्व कर्जातून व वीजबिलातून मुक्त करणे व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर मदत करणे.
- शेतकऱ्यांकडून वसूल केले जाणारे अप्रत्यक्ष कर कमी करण्याबाबत.
- शेतीमालाच्या शेती उत्पादनातून तयार होणाऱ्या पक्क्या मालाच्या किमतीची तुलना कच्च्या मालाशी करणे.
- सी. रंगराजन समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी कार्यक्रम आखणे.
- गोवंश हत्या बंदी, पाळीव प्राणी निर्णय वागणूक, वन्यजीव संरक्षण कायदा, भूसंपादन, आवश्यक वस्तू कायदा मुळासकट रद्द करणे यांसह शेतकरीविरोधी कायदे रद्द करणे.
नगर/पुणे ः शेतकरी आत्महत्येला कारणीभूत असलेल्या बाबींवर लक्ष केंद्रित करून शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शनिवारपासून (ता. २८) शेतकरी संघटनेतर्फे ‘जनप्रबोधन यात्रा’ आयोजित केली आहे. यानिमित्त राज्यातील सहा जिल्ह्यांत पंधरा दिवस विविध कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिली.
महात्मा जोतिबा फुले यांचा २८ नोव्हेंबर रोजी स्मृती दिन आहे. तर १२ डिसेंबर हा परदेशी वस्तूंवर बहिष्कार घालणारे हुतात्मा बाबू गेनू यांचा बिलिदान दिवस आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या या दोन्ही महान व्यक्तींच्या स्मरणार्थ राज्यात होत असलल्या आत्महत्येचे कलंक पुसण्यासाठी शनिवारपासून (ता. २८) शेतकरी संघटनेतर्फे ‘जनप्रबोधन यात्रा’ आयोजित केली आहे.
यात्रेला कोल्हापूर जिल्ह्यातील निपाणी येथून सुरुवात होणार आहे. त्यानंतर तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात, तीन दिवस सांगली जिल्ह्यात, दोन दिवस सोलापूर जिल्ह्यात, दोन दिवस नगर जिल्ह्यात, तीन दिवस पुणे जिल्ह्यात व दोन दिवस सातारा जिल्ह्यात मेळावे, बैठका घेऊन शेतकऱ्यांत प्रबोधन करणार आहे.
१२ डिसेंबर रोजी सातारा येथे सभेत यात्रेचा समारोप होणार आहे. शेतीमालाला उत्पादन खर्चाइतकाही दर मिळत नाही. त्यामुळे शेतकरी कर्ज बाजारी झाला आहे. पन्नास वर्षे सतत कर्जमाफीच्या चर्चा चालू आहेत. मागच्या आणि आताच्या सरकारने केलेल्या कर्जमाफीपासून अनेक शेतकरी वंचित आहेत. उसाच्या दराबाबतबी फारसे गांभीर्याने घेतले जात नाही, अशा अनेक बाबींवर सरकारचे दुर्लक्ष आहे. याविषयी जनप्रबोधन यात्रेतून शेतकऱ्यांत जागृती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
…अशा आहेत मागण्या
- सर्व शेतकऱ्यांना सर्व कर्जातून व वीजबिलातून मुक्त करणे व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर मदत करणे.
- शेतकऱ्यांकडून वसूल केले जाणारे अप्रत्यक्ष कर कमी करण्याबाबत.
- शेतीमालाच्या शेती उत्पादनातून तयार होणाऱ्या पक्क्या मालाच्या किमतीची तुलना कच्च्या मालाशी करणे.
- सी. रंगराजन समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी कार्यक्रम आखणे.
- गोवंश हत्या बंदी, पाळीव प्राणी निर्णय वागणूक, वन्यजीव संरक्षण कायदा, भूसंपादन, आवश्यक वस्तू कायदा मुळासकट रद्द करणे यांसह शेतकरीविरोधी कायदे रद्द करणे.
[ad_2]
Source link