[ad_1]
गडचिरोली : ‘आमच्या गावात आम्ही सरकार’ असा संदेश देणारे लेखा मेंढा गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गावाने कोणत्याही शासकीय कामासाठी लाच न देण्याचा निर्णय घेतला असून अधिकाऱ्यांनी पैसे मागितल्यास त्याची पावती सक्तीने घेतली जाणार आहे.
केंद्र व राज्य सरकार हे आमचेच त्यामुळे आमच्या गावात आमचेच सरकार असावे अशी भूमिका घेत ग्रामसभेला सर्व अधिकार देण्याची मागणी आणि त्याकरिता पाठपुरावा धानोरा तालुक्यातील लेखा मेंढा गावाने केला होता. ग्रामस्थांच्या या पाठपुराव्याला यश आले त्यानंतर स्वतंत्र ग्रामपंचायत येथे अस्तित्वात आली. या गावाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या गावातील सर्व शेत जमिनीची मालकी ग्रामसभेकडे आहे. अशा प्रकारचे अनेक आदर्शवादी उपक्रम लेखा मेंढा गावाने सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा यांच्या नेतृत्वाखाली राबविले.
१९९१-९२ च्या दरम्यान गावासाठी स्वतंत्र संहिता तयार करण्यात आली आहे. त्यानुसार शासकीय कामासाठी कोणत्याही प्रकारची लाच गावातील व्यक्तीने देऊ नये, असा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला. शासकीय अधिकाऱ्याने नियमानुसार असलेल्या कामाकरता पैशाची मागणी केल्यास त्याच्याकडून पावती मागावी, असेही ग्रामस्थांनी सामूहिकपणे ठरविले. या उपरही या निर्णयाची अवहेलना करून एखाद्याने पैसे दिल्यास आणि याची माहिती ग्रामसभेला झाल्यास तितकीच रक्कम संबंधित व्यक्तीला ग्राम निधीत जमा करावी लागणार आहे.
नक्षलप्रवण आणि अवघ्या पाचशे लोकवस्तीच्या या गावाने घेतलेल्या या अभिनव निर्णयाची चर्चा सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात होत आहे. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या मेसेजने अनेकांचे लक्ष या गावाकडे पुन्हा वेधल्या गेले आहे.
प्रतिक्रिया
आमच्या गावाने ग्रामसभेच्या माध्यमातून अनेक ठराव घेतले आहेत. त्यामध्ये शासकीय अधिकाऱ्याला लाच न देण्याचा ठरावही आहे. एखाद्याने लाच दिली आणि त्याबाबत ग्रामसभेला माहिती झाल्यास तेवढाच विकास निधी त्याला ग्राम विकास फंडात जमा करावा लागणार आहे. परिणामी आजवर गावातील एकाही व्यक्तीने लाच दिल्याची बाब समोर आली नाही. सद्यःस्थितीत गावात जलसंधारणाच्या कामांना मोठ्या प्रमाणात सुरुवात करण्यात आली आहे.
– देवाजी तोफा, सामाजिक कार्यकर्ते, लेखामेंढा, ता. धानोरा, जि. गडचिरोली
गडचिरोली : ‘आमच्या गावात आम्ही सरकार’ असा संदेश देणारे लेखा मेंढा गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गावाने कोणत्याही शासकीय कामासाठी लाच न देण्याचा निर्णय घेतला असून अधिकाऱ्यांनी पैसे मागितल्यास त्याची पावती सक्तीने घेतली जाणार आहे.
केंद्र व राज्य सरकार हे आमचेच त्यामुळे आमच्या गावात आमचेच सरकार असावे अशी भूमिका घेत ग्रामसभेला सर्व अधिकार देण्याची मागणी आणि त्याकरिता पाठपुरावा धानोरा तालुक्यातील लेखा मेंढा गावाने केला होता. ग्रामस्थांच्या या पाठपुराव्याला यश आले त्यानंतर स्वतंत्र ग्रामपंचायत येथे अस्तित्वात आली. या गावाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या गावातील सर्व शेत जमिनीची मालकी ग्रामसभेकडे आहे. अशा प्रकारचे अनेक आदर्शवादी उपक्रम लेखा मेंढा गावाने सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा यांच्या नेतृत्वाखाली राबविले.
१९९१-९२ च्या दरम्यान गावासाठी स्वतंत्र संहिता तयार करण्यात आली आहे. त्यानुसार शासकीय कामासाठी कोणत्याही प्रकारची लाच गावातील व्यक्तीने देऊ नये, असा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला. शासकीय अधिकाऱ्याने नियमानुसार असलेल्या कामाकरता पैशाची मागणी केल्यास त्याच्याकडून पावती मागावी, असेही ग्रामस्थांनी सामूहिकपणे ठरविले. या उपरही या निर्णयाची अवहेलना करून एखाद्याने पैसे दिल्यास आणि याची माहिती ग्रामसभेला झाल्यास तितकीच रक्कम संबंधित व्यक्तीला ग्राम निधीत जमा करावी लागणार आहे.
नक्षलप्रवण आणि अवघ्या पाचशे लोकवस्तीच्या या गावाने घेतलेल्या या अभिनव निर्णयाची चर्चा सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात होत आहे. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या मेसेजने अनेकांचे लक्ष या गावाकडे पुन्हा वेधल्या गेले आहे.
प्रतिक्रिया
आमच्या गावाने ग्रामसभेच्या माध्यमातून अनेक ठराव घेतले आहेत. त्यामध्ये शासकीय अधिकाऱ्याला लाच न देण्याचा ठरावही आहे. एखाद्याने लाच दिली आणि त्याबाबत ग्रामसभेला माहिती झाल्यास तेवढाच विकास निधी त्याला ग्राम विकास फंडात जमा करावा लागणार आहे. परिणामी आजवर गावातील एकाही व्यक्तीने लाच दिल्याची बाब समोर आली नाही. सद्यःस्थितीत गावात जलसंधारणाच्या कामांना मोठ्या प्रमाणात सुरुवात करण्यात आली आहे.
– देवाजी तोफा, सामाजिक कार्यकर्ते, लेखामेंढा, ता. धानोरा, जि. गडचिरोली
[ad_2]
Source link