[ad_1]
अकोला ः वऱ्हाडात अकोला, बुलडाणा जिल्ह्यात बुधवारी (ता.१४) बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह, ढगांच्या गडगडाटात पाऊस झाला. या पावसाने उन्हाळी पिके, फळबागांना फटका बसला, शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.
अकोला जिल्ह्यात अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी व पातूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी दिली. पातूरमधील चतारी परिसरात पावसाने हजेरी लावल्याने शेतामध्ये असलेल्या उन्हाळी मूग, कांदा, भुईमूग पिकांचे नुकसान झाले. तेल्हारा, अकोट तालुक्यात बऱ्याच ठिकाणी सायंकाळी मेघगर्जनेसह पाऊस पडला.
अडगाव, पंचगव्हाण, दानापूर, शिरसोली भागांत पाऊस झाला. मूर्तिजापूर तालुक्यात सायंकाळच्या सुमारास विजांचा कडकडाटासह पाऊस झाला. बार्शीटाकळी तालुक्यात हातोला, झोडगा, वस्तापूर, भेंडगाव, पिंजर, निंभारा आदी गावांसह इतर ठिकाणी वादळी पावसाचा तडाखा बसला.
बुलडाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यातील शेलगाव, खंडाळा शिवारात बुधवारी गारपीट झाल्याचे वृत्त आहे. यामुळे कांदा बीजोत्पादन क्षेत्रात मोठे नुकसान झाले. परिपक्व झालेले कांदा बियाणे गळून पडले. काही शेतकऱ्यांचे शाळू ज्वारीचे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या आपत्तीने हिरावून नेला आहे.
फळबागांचे नुकसान
बुधवारी पावसापेक्षा वादळाचे प्रमाण अधिक होते. यामुळे केळीच्या झाडांवरील पाने सर्वत्र फाटली. नव्याने लागवड असलेल्या केळी बागांचे यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.
अकोला ः वऱ्हाडात अकोला, बुलडाणा जिल्ह्यात बुधवारी (ता.१४) बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह, ढगांच्या गडगडाटात पाऊस झाला. या पावसाने उन्हाळी पिके, फळबागांना फटका बसला, शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.
अकोला जिल्ह्यात अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी व पातूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी दिली. पातूरमधील चतारी परिसरात पावसाने हजेरी लावल्याने शेतामध्ये असलेल्या उन्हाळी मूग, कांदा, भुईमूग पिकांचे नुकसान झाले. तेल्हारा, अकोट तालुक्यात बऱ्याच ठिकाणी सायंकाळी मेघगर्जनेसह पाऊस पडला.
अडगाव, पंचगव्हाण, दानापूर, शिरसोली भागांत पाऊस झाला. मूर्तिजापूर तालुक्यात सायंकाळच्या सुमारास विजांचा कडकडाटासह पाऊस झाला. बार्शीटाकळी तालुक्यात हातोला, झोडगा, वस्तापूर, भेंडगाव, पिंजर, निंभारा आदी गावांसह इतर ठिकाणी वादळी पावसाचा तडाखा बसला.
बुलडाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यातील शेलगाव, खंडाळा शिवारात बुधवारी गारपीट झाल्याचे वृत्त आहे. यामुळे कांदा बीजोत्पादन क्षेत्रात मोठे नुकसान झाले. परिपक्व झालेले कांदा बियाणे गळून पडले. काही शेतकऱ्यांचे शाळू ज्वारीचे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या आपत्तीने हिरावून नेला आहे.
फळबागांचे नुकसान
बुधवारी पावसापेक्षा वादळाचे प्रमाण अधिक होते. यामुळे केळीच्या झाडांवरील पाने सर्वत्र फाटली. नव्याने लागवड असलेल्या केळी बागांचे यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.