[ad_1]
अकोला ः गेल्या महिन्यात झालेला अवकाळी पाऊस, गारपीट आणि त्यानंतर आता कडक उन्हामुळे पिकांवर संकट उभे राहिले आहे. दिवसाचे उष्णतामान कमालीचे वाढल्याचा परिणाम पिकांवर थेट पडू लागला आहे.
वातावरण बदलाने शेतकरी सातत्याने संकटांचा सामना करीत आहेत.यंदाच्या खरिपात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मूग, ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, कांदा या पिकांनाही अवकाळीचा फटका बसला. या दोन्ही हंगामांवर बदललेल्या वातावरणाचा मोठा परिणाम झाला. उत्पादन घटले. आताही अवकाळी पावसाने नुकसान केले. त्यापाठोपाठ आता उष्णतामान वाढल्याचा फटका बसत आहे.
जिल्ह्यात संत्रा, केळी बागांना बदलत्या वातावरणाचा ताण सहन होताना दिसत नाही. गेल्या तीन दिवसांतील उष्णतेमुळे पिकांना पाण्याची गरज वाढली आहे. त्यातच अनेक ठिकाणी वीज कनेक्शन तोडल्याने पिकांना पाणी देण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. वातावरण बदलामुळे अकोट तालुक्यात बोर्डी परिसरात केळी बागांमध्ये पाने फाटली असून, काही ठिकाणी जळाल्याचे दिसून येत आहे.
अकोट तालुक्यात शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा विचार करून संत्रा बागा उभ्या केल्या. मात्र गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा संत्रा पिकाला फटका बसत आहे. हस्त आणि आंबिया हे दोन्ही बहर अडचणीचे ठरत आहेत. पिकाला ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस बाधक ठरत आहेत. शासनाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
– राहुल बोंडे, स्थानिक शेतकरी, उमरा जि. अकोलाहवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे संत्रा आंबिया बहराला फटका बसला. हा बहर जवळ जवळ गळाला आहे. त्याचप्रमाणे केळीवर सुद्धा करपा येऊन पाने पिवळी पडत आहेत.
– गजानन धर्मे, शेतकरी, अकोली जहाँगीर, ता. अकोट, जि. अकोला
अकोला ः गेल्या महिन्यात झालेला अवकाळी पाऊस, गारपीट आणि त्यानंतर आता कडक उन्हामुळे पिकांवर संकट उभे राहिले आहे. दिवसाचे उष्णतामान कमालीचे वाढल्याचा परिणाम पिकांवर थेट पडू लागला आहे.
वातावरण बदलाने शेतकरी सातत्याने संकटांचा सामना करीत आहेत.यंदाच्या खरिपात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मूग, ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, कांदा या पिकांनाही अवकाळीचा फटका बसला. या दोन्ही हंगामांवर बदललेल्या वातावरणाचा मोठा परिणाम झाला. उत्पादन घटले. आताही अवकाळी पावसाने नुकसान केले. त्यापाठोपाठ आता उष्णतामान वाढल्याचा फटका बसत आहे.
जिल्ह्यात संत्रा, केळी बागांना बदलत्या वातावरणाचा ताण सहन होताना दिसत नाही. गेल्या तीन दिवसांतील उष्णतेमुळे पिकांना पाण्याची गरज वाढली आहे. त्यातच अनेक ठिकाणी वीज कनेक्शन तोडल्याने पिकांना पाणी देण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. वातावरण बदलामुळे अकोट तालुक्यात बोर्डी परिसरात केळी बागांमध्ये पाने फाटली असून, काही ठिकाणी जळाल्याचे दिसून येत आहे.
अकोट तालुक्यात शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा विचार करून संत्रा बागा उभ्या केल्या. मात्र गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा संत्रा पिकाला फटका बसत आहे. हस्त आणि आंबिया हे दोन्ही बहर अडचणीचे ठरत आहेत. पिकाला ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस बाधक ठरत आहेत. शासनाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
– राहुल बोंडे, स्थानिक शेतकरी, उमरा जि. अकोलाहवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे संत्रा आंबिया बहराला फटका बसला. हा बहर जवळ जवळ गळाला आहे. त्याचप्रमाणे केळीवर सुद्धा करपा येऊन पाने पिवळी पडत आहेत.
– गजानन धर्मे, शेतकरी, अकोली जहाँगीर, ता. अकोट, जि. अकोला
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.