[ad_1]
पुणे : कमाल तापमान चाळिशीपार पोहोचल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला आहे. शनिवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे देशातील उच्चांकी ४२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोमवारपासून (ता.२८) विदर्भात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला.
कमाल तापमानात झालेल्या वाढीमुळे उन्हाच्या झळा चांगल्यात वाढल्या आहे. उकाड्यातही वाढ झाल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. विदर्भात अनेक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमान चाळीस अंशांच्या पुढे गेले आहे. नगर येथे ४१.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
तापमानात सरासरीपेक्षा ५.१ अंशांची वाढ झाल्याने तेथे उष्णतेची लाट आली आहे. उद्यापासून (ता. २८) विदर्भात उष्ण लाटेचा इशारा आहे.
विदर्भापासून, मराठवाडा, दक्षिण कर्नाटकपर्यंत वाऱ्याचे प्रवाह खंडित झाले. त्यामुळे हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पावसाला पोषक हवामान आहे.
शनिवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३७.४, नगर ४१.४, धुळे ३९, कोल्हापूर ३४, महाबळेश्वर ३०.३, नाशिक ३७.८, निफाड ३६.८, सांगली ३४.३, सातारा ३५.६, सोलापूर ३९, सांताक्रूझ ३३.१, डहाणू ३०.५, रत्नागिरी ३२.५, औरंगाबाद ३८.९, नांदेड ३९.४,
परभणी ३९.७, अकोला ४२.३, अमरावती ४०.२, बुलडाणा ३९.५, ब्रह्मपुरी ४०.१, चंद्रपूर ४०.८, गोंदिया ३८.०, नागपूर ३८.४, वाशीम ४१, वर्धा ४०, यवतमाळ ४०.
पुणे : कमाल तापमान चाळिशीपार पोहोचल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला आहे. शनिवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे देशातील उच्चांकी ४२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोमवारपासून (ता.२८) विदर्भात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला.
कमाल तापमानात झालेल्या वाढीमुळे उन्हाच्या झळा चांगल्यात वाढल्या आहे. उकाड्यातही वाढ झाल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. विदर्भात अनेक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमान चाळीस अंशांच्या पुढे गेले आहे. नगर येथे ४१.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
तापमानात सरासरीपेक्षा ५.१ अंशांची वाढ झाल्याने तेथे उष्णतेची लाट आली आहे. उद्यापासून (ता. २८) विदर्भात उष्ण लाटेचा इशारा आहे.
विदर्भापासून, मराठवाडा, दक्षिण कर्नाटकपर्यंत वाऱ्याचे प्रवाह खंडित झाले. त्यामुळे हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पावसाला पोषक हवामान आहे.
शनिवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३७.४, नगर ४१.४, धुळे ३९, कोल्हापूर ३४, महाबळेश्वर ३०.३, नाशिक ३७.८, निफाड ३६.८, सांगली ३४.३, सातारा ३५.६, सोलापूर ३९, सांताक्रूझ ३३.१, डहाणू ३०.५, रत्नागिरी ३२.५, औरंगाबाद ३८.९, नांदेड ३९.४,
परभणी ३९.७, अकोला ४२.३, अमरावती ४०.२, बुलडाणा ३९.५, ब्रह्मपुरी ४०.१, चंद्रपूर ४०.८, गोंदिया ३८.०, नागपूर ३८.४, वाशीम ४१, वर्धा ४०, यवतमाळ ४०.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.