[ad_1]
मुंबई : अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नेमलेल्या समितीने अहवाल सादर केला असून मुंबई, पुणे विद्यापीठ वगळता इतर विद्यापीठांत ऑनलाइन परीक्षा घेणे अशक्य असल्याचे नमूद केले आहे. समिती हा अहवाल आज (ता. ३१) राज्य सरकारकडे सादर करणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तसेच राज्यपालांसोबतही याविषयी तातडीने चर्चा करणार असल्याचे सामंत म्हणाले.
परीक्षेच्या आयोजनाबाबत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता.२९) समिती गठीत करण्यात आली होती. समितीने तयार केलेल्या अहवालावर रविवारी (ता. ३०) सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्वच विद्यापीठांनी ऑफलाईन परीक्षा घेणे कठीण असल्याचे मत या अहवालात नोंदविण्यात आले आहे. मुंबई आणि पुणे या दोन विद्यापीठांचा अपवाद वगळता राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये ऑनलाइन परीक्षा घेणे शक्य नाही. त्यासाठीची यंत्रणा विद्यापीठांमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे सर्व विद्यापीठांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल, अशी भीती कुलगुरूंनी या अहवालाच्या माध्यमातून व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.
ग्रामीण भागात परीक्षा कठीण
सर्वोच्च न्यायालयानेच अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे निर्देश दिल्याने या परीक्षा नेमक्या कोणत्या पद्धतीने घ्याव्यात, यावर उपाययोजना सुचविण्यासाठी कुलगुरूंची समिती नेमण्यात आली होती. मात्र, समितीने गेल्या काही महिन्यांत ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने या ठिकाणी ऑफलाइन परीक्षा घेणे कठीण असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
मुंबई : अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नेमलेल्या समितीने अहवाल सादर केला असून मुंबई, पुणे विद्यापीठ वगळता इतर विद्यापीठांत ऑनलाइन परीक्षा घेणे अशक्य असल्याचे नमूद केले आहे. समिती हा अहवाल आज (ता. ३१) राज्य सरकारकडे सादर करणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तसेच राज्यपालांसोबतही याविषयी तातडीने चर्चा करणार असल्याचे सामंत म्हणाले.
परीक्षेच्या आयोजनाबाबत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता.२९) समिती गठीत करण्यात आली होती. समितीने तयार केलेल्या अहवालावर रविवारी (ता. ३०) सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्वच विद्यापीठांनी ऑफलाईन परीक्षा घेणे कठीण असल्याचे मत या अहवालात नोंदविण्यात आले आहे. मुंबई आणि पुणे या दोन विद्यापीठांचा अपवाद वगळता राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये ऑनलाइन परीक्षा घेणे शक्य नाही. त्यासाठीची यंत्रणा विद्यापीठांमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे सर्व विद्यापीठांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल, अशी भीती कुलगुरूंनी या अहवालाच्या माध्यमातून व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.
ग्रामीण भागात परीक्षा कठीण
सर्वोच्च न्यायालयानेच अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे निर्देश दिल्याने या परीक्षा नेमक्या कोणत्या पद्धतीने घ्याव्यात, यावर उपाययोजना सुचविण्यासाठी कुलगुरूंची समिती नेमण्यात आली होती. मात्र, समितीने गेल्या काही महिन्यांत ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने या ठिकाणी ऑफलाइन परीक्षा घेणे कठीण असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
[ad_2]
Source link