[ad_1]
नांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पात जायकवाडी प्रकल्पाचे पाणी येत असल्याने पाण्याचा येवा वाढत आहे. यामुळे नांदेड पाटबंधारे विभागाकडून खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवारी (ता. १८) प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडण्यात आले. ८४ हजार ५४१ क्युसेक्स वेगाने पाणी गोदावरी नदीत सोडण्यात येत आहे.
आतापर्यंत सर्वाधिक पाणी गोदावरीत सोडण्यात येत असल्याने नदी दुथडी भरुन वाहत आहे. नांदेड जिल्ह्यासह परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे गोदावरी नदीवरील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात पाणी येत आहे. मागील काही दिवसापासून सतत दरवाजे उघडे करुन नदीत पाणी सोडण्यात येत आहे.
दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्प पूर्ण भरल्यामुळे या प्रकल्पाचे पाणी गोदावरी नदीत सोडण्यात येत आहे. यामुळे जायकवाडीच्या खाली असलेल्या बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात येत आहे, अशी माहिती पूर नियंत्रण कक्षातून देण्यात आली. ३६५ क्सुसेक्स पाणी सोडण्यात आले.
नांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पात जायकवाडी प्रकल्पाचे पाणी येत असल्याने पाण्याचा येवा वाढत आहे. यामुळे नांदेड पाटबंधारे विभागाकडून खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवारी (ता. १८) प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडण्यात आले. ८४ हजार ५४१ क्युसेक्स वेगाने पाणी गोदावरी नदीत सोडण्यात येत आहे.
आतापर्यंत सर्वाधिक पाणी गोदावरीत सोडण्यात येत असल्याने नदी दुथडी भरुन वाहत आहे. नांदेड जिल्ह्यासह परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे गोदावरी नदीवरील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात पाणी येत आहे. मागील काही दिवसापासून सतत दरवाजे उघडे करुन नदीत पाणी सोडण्यात येत आहे.
दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्प पूर्ण भरल्यामुळे या प्रकल्पाचे पाणी गोदावरी नदीत सोडण्यात येत आहे. यामुळे जायकवाडीच्या खाली असलेल्या बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात येत आहे, अशी माहिती पूर नियंत्रण कक्षातून देण्यात आली. ३६५ क्सुसेक्स पाणी सोडण्यात आले.
[ad_2]
Source link