[ad_1]
परभणी ः कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तत्काळ बंद करावी, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघटनेतर्फे मंगळवारी (ता. १) बोरी (ता.जिंतूर) येथील महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्रासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
कृषिपंपांची विज बिले दुरुस्त करुण द्यावीत. इगतपुरीच्या शेतकऱ्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेऊन त्यांना मुक्त करावे. बेकायदेशीर वीजपुरवठा खंडित करणाऱ्या वीज वितरणच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या राज्यव्यापी आंदोलना अंतर्गत बोरी (ता.जिंतूर) येथे हे आंदोलन करण्यात आले. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे करण्यात आले.
परभणी ः कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तत्काळ बंद करावी, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघटनेतर्फे मंगळवारी (ता. १) बोरी (ता.जिंतूर) येथील महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्रासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
कृषिपंपांची विज बिले दुरुस्त करुण द्यावीत. इगतपुरीच्या शेतकऱ्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेऊन त्यांना मुक्त करावे. बेकायदेशीर वीजपुरवठा खंडित करणाऱ्या वीज वितरणच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या राज्यव्यापी आंदोलना अंतर्गत बोरी (ता.जिंतूर) येथे हे आंदोलन करण्यात आले. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे करण्यात आले.
[ad_2]
Source link