[ad_1]
रत्नागिरी ः कृषी पंपाच्या अव्वाच्या सव्वा आलेल्या वीजबिलांवरून सदस्यांनी महावितरण कंपनीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. शेती पंप असलेल्या शेतकऱ्यांना आकारलेली ही बिले शेतीनुसार आकारली जावीत असा ठराव मालगुंड येथे झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये सर्वानुमते करण्यात आला. अधिकची बिले आलेल्यांचा सर्व्हे दोन महिन्यांत करण्याचे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले.
सभापती संजना माने यांच्या अध्यक्षतेखाली या टर्ममधील शेवटची मासिक सभा मालगुंड येथे झाली. सदस्यांची मुदत २३ मार्चला संपुष्टात येणार असल्याने ही सभा कार्यालयाच्या सभागृहात न घेता कवी केशवसुत स्मारक सभागृहात झाली. या वेळी गटविकास अधिकाऱ्यांसह सर्व सदस्य उपस्थित होते. सुनील नावले, गजानन पाटील यांनी महावितरण, शिक्षणासह विविध विभागातील समस्यांवर प्रश्न उपस्थित केले. शेती पंप वापरणाऱ्यांच्या विजेचे बिल अव्वाच्या सव्वा आले आहे. मागील मासिक सभेत या विषयावरून महावितरण कंपनीला धारेवर धरण्यात आले होते. तक्रारी असलेल्या ग्राहकांशी संवाद साधून बिले कमी करून देऊ असे आश्वासन दिले गेले; परंतु त्यावर महावितरणने कार्यवाही केली नाही. त्याचे पडसाद शुक्रवारच्या सभेत उमटले. सुनील नावले यांनी अवस्थित कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. भरमसाठ बिले आलेल्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन ती कमी करून द्यावीत असा ठरावही करण्यात आला आहे.
कोरोनातील तिसऱ्या लाटेचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागल्यानंतर शाळांचे कामकाज पूर्ववत होत आहे; मात्र रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील अनेक शिक्षक वेळेत शाळेत जात नाहीत. काहीजण तर शाळेतच जात नाहीत. त्याचा मुलांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे, अशी तक्रार नावले यांनी मांडली. याची दखल घेतली जाईल आणि शिक्षकांना तशा सूचना करू असे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. महिला बचत गटांना कर्जवाटप केल्याची माहिती दर सभेत दिली जाते; परंतु याचे वितरण करताना किंवा ते कोणाला द्यावे यावर निर्णय घेण्याचे अधिकार पंचायत समिती सभापती, सदस्यांना नाहीत. यंदा चौदा कोटी रुपये कर्जाचे वाटप करण्यात आले. नुसतीच माहिती देऊन उपयोग नाही, तर गरजू गटांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे यादृष्टीने सभागृहात मांडणी करावी अशी सूचना गजानन पाटील यांनी केली.
जुनाट वटवृक्षांचे संवर्धन करा
मालगुंड येथील कवी केशवसूत यांच्या स्मारकासमोरील खासगी जागेमध्ये खूप जुना अवाढव्य असा वटवृक्ष आहे. त्याच्या फांद्या तोडण्यात आल्या असून उर्वरित भाग संबंधितांकडून तोडला जाऊ नये, अशी मागणी सभेमध्ये सदस्यांनी केली. रत्नागिरी शहरातील एका जुन्या गोरखचिंचेच्या वृक्षांचे जतन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पावले उचलली आहेत. त्याप्रमाणेच वडाच्या झाडांचे पर्यटनदृष्ट्या जतन करा, अशी सूचना करण्यात आली आहे. याबाबत वन विभागाकडून संबंधितांना सूचना करण्याचे आश्वासन दिले गेले.
रत्नागिरी ः कृषी पंपाच्या अव्वाच्या सव्वा आलेल्या वीजबिलांवरून सदस्यांनी महावितरण कंपनीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. शेती पंप असलेल्या शेतकऱ्यांना आकारलेली ही बिले शेतीनुसार आकारली जावीत असा ठराव मालगुंड येथे झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये सर्वानुमते करण्यात आला. अधिकची बिले आलेल्यांचा सर्व्हे दोन महिन्यांत करण्याचे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले.
सभापती संजना माने यांच्या अध्यक्षतेखाली या टर्ममधील शेवटची मासिक सभा मालगुंड येथे झाली. सदस्यांची मुदत २३ मार्चला संपुष्टात येणार असल्याने ही सभा कार्यालयाच्या सभागृहात न घेता कवी केशवसुत स्मारक सभागृहात झाली. या वेळी गटविकास अधिकाऱ्यांसह सर्व सदस्य उपस्थित होते. सुनील नावले, गजानन पाटील यांनी महावितरण, शिक्षणासह विविध विभागातील समस्यांवर प्रश्न उपस्थित केले. शेती पंप वापरणाऱ्यांच्या विजेचे बिल अव्वाच्या सव्वा आले आहे. मागील मासिक सभेत या विषयावरून महावितरण कंपनीला धारेवर धरण्यात आले होते. तक्रारी असलेल्या ग्राहकांशी संवाद साधून बिले कमी करून देऊ असे आश्वासन दिले गेले; परंतु त्यावर महावितरणने कार्यवाही केली नाही. त्याचे पडसाद शुक्रवारच्या सभेत उमटले. सुनील नावले यांनी अवस्थित कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. भरमसाठ बिले आलेल्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन ती कमी करून द्यावीत असा ठरावही करण्यात आला आहे.
कोरोनातील तिसऱ्या लाटेचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागल्यानंतर शाळांचे कामकाज पूर्ववत होत आहे; मात्र रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील अनेक शिक्षक वेळेत शाळेत जात नाहीत. काहीजण तर शाळेतच जात नाहीत. त्याचा मुलांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे, अशी तक्रार नावले यांनी मांडली. याची दखल घेतली जाईल आणि शिक्षकांना तशा सूचना करू असे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. महिला बचत गटांना कर्जवाटप केल्याची माहिती दर सभेत दिली जाते; परंतु याचे वितरण करताना किंवा ते कोणाला द्यावे यावर निर्णय घेण्याचे अधिकार पंचायत समिती सभापती, सदस्यांना नाहीत. यंदा चौदा कोटी रुपये कर्जाचे वाटप करण्यात आले. नुसतीच माहिती देऊन उपयोग नाही, तर गरजू गटांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे यादृष्टीने सभागृहात मांडणी करावी अशी सूचना गजानन पाटील यांनी केली.
जुनाट वटवृक्षांचे संवर्धन करा
मालगुंड येथील कवी केशवसूत यांच्या स्मारकासमोरील खासगी जागेमध्ये खूप जुना अवाढव्य असा वटवृक्ष आहे. त्याच्या फांद्या तोडण्यात आल्या असून उर्वरित भाग संबंधितांकडून तोडला जाऊ नये, अशी मागणी सभेमध्ये सदस्यांनी केली. रत्नागिरी शहरातील एका जुन्या गोरखचिंचेच्या वृक्षांचे जतन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पावले उचलली आहेत. त्याप्रमाणेच वडाच्या झाडांचे पर्यटनदृष्ट्या जतन करा, अशी सूचना करण्यात आली आहे. याबाबत वन विभागाकडून संबंधितांना सूचना करण्याचे आश्वासन दिले गेले.
[ad_2]
Source link