[ad_1]
सांगली : महावितरण कंपनीच्या वीज जोडणी तोडणीच्या निषेधार्थ व आयर्विन पुलाला समांतर पूल व्हावा, या प्रमुख मागण्यासाठी सांगली-इस्लामपूर मार्गावरील लक्ष्मीफाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल, रघुनाथ पाटील प्रणीत शेतकरी संघटनेसह सर्वपक्षीय रास्ता रोको शुक्रवारी (ता. १९) करण्यात आला.
या वेळी वीजबिल माफी झालीच पाहिजे, आयर्वीनला समांतर पूल झालाच पाहिजे, आशा घोषणा देण्यात आल्या. वीजबिल माफीसाठी वेळोवेळी आंदोलने केली, मोर्चे काढले मात्र सरकारने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे आरपारची लढाई करण्यासाठी स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्याचे आवाहन केले होते.
या आवाहनानुसार लक्ष्मीफाटा येथे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, जनता दलचे माजी आमदार शरद पाटील, रघुनाथ दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन केले. एक तास चाललेल्या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
या वेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, ‘‘महावितरण कंपनीच्या वतीने वीज कनेक्शन तोडणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. वाढीव वीजबिलांमुळे सर्वसामान्य माणूस हवालदिल झाला आहे. ऊर्जामंत्री यांनी कोरोना काळातील वीजबिल माफीचे आश्वासन दिले होते ते पाळावे. आयर्विन पुलाला समांतर पूल झाला पाहिजे अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल.’’
माजी आमदार शरद पाटील म्हणाले, ‘‘राज्य सरकारने सामान्य जनतेला वीजबिल माफीचे आश्वासन देऊन झुलवत ठेवले. थकीत वीजबिलापोटी कनेक्शन तोडण्याच्या सूचनाही दिल्या, यातून सरकारचा दुटप्पीपणा दिसून येतो आहे. सरकारने वीजबिल माफ करून दिलासा द्यावा.’’ रघुनाथदादा पाटील म्हणाले, ‘‘लॉकडाऊन काळातील घरगुती वीजबिल व शेतीपंपाचे वीजबिल माफ झाले पाहिजे. वाढीव बीले देऊन शेतकऱ्यांना लुबाडायचे काम हे सरकार करत आहे. वाढीव बिले देऊन त्यातून ५० टक्के सवलत देण्याचे नाटक करत आहे.’’ सर्वपक्षीय आंदोलनामुळे मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
सांगली : महावितरण कंपनीच्या वीज जोडणी तोडणीच्या निषेधार्थ व आयर्विन पुलाला समांतर पूल व्हावा, या प्रमुख मागण्यासाठी सांगली-इस्लामपूर मार्गावरील लक्ष्मीफाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल, रघुनाथ पाटील प्रणीत शेतकरी संघटनेसह सर्वपक्षीय रास्ता रोको शुक्रवारी (ता. १९) करण्यात आला.
या वेळी वीजबिल माफी झालीच पाहिजे, आयर्वीनला समांतर पूल झालाच पाहिजे, आशा घोषणा देण्यात आल्या. वीजबिल माफीसाठी वेळोवेळी आंदोलने केली, मोर्चे काढले मात्र सरकारने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे आरपारची लढाई करण्यासाठी स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्याचे आवाहन केले होते.
या आवाहनानुसार लक्ष्मीफाटा येथे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, जनता दलचे माजी आमदार शरद पाटील, रघुनाथ दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन केले. एक तास चाललेल्या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
या वेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, ‘‘महावितरण कंपनीच्या वतीने वीज कनेक्शन तोडणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. वाढीव वीजबिलांमुळे सर्वसामान्य माणूस हवालदिल झाला आहे. ऊर्जामंत्री यांनी कोरोना काळातील वीजबिल माफीचे आश्वासन दिले होते ते पाळावे. आयर्विन पुलाला समांतर पूल झाला पाहिजे अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल.’’
माजी आमदार शरद पाटील म्हणाले, ‘‘राज्य सरकारने सामान्य जनतेला वीजबिल माफीचे आश्वासन देऊन झुलवत ठेवले. थकीत वीजबिलापोटी कनेक्शन तोडण्याच्या सूचनाही दिल्या, यातून सरकारचा दुटप्पीपणा दिसून येतो आहे. सरकारने वीजबिल माफ करून दिलासा द्यावा.’’ रघुनाथदादा पाटील म्हणाले, ‘‘लॉकडाऊन काळातील घरगुती वीजबिल व शेतीपंपाचे वीजबिल माफ झाले पाहिजे. वाढीव बीले देऊन शेतकऱ्यांना लुबाडायचे काम हे सरकार करत आहे. वाढीव बिले देऊन त्यातून ५० टक्के सवलत देण्याचे नाटक करत आहे.’’ सर्वपक्षीय आंदोलनामुळे मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
[ad_2]
Source link