[ad_1]
भोकरदन/राजूर, जि. जालना : तालुक्यातील पळसखेडा पिंपळे येथील सख्ख्या भावांना विजेचा शॉक लागून ते विहिरीत पडून तिघांचाही मृत्यू झाल्याची दुर्घटना बुधवारी (ता १८) रात्री दरम्यान घडली. या घटनेने संपूर्ण जालना जिल्ह्याचं हादरला असून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेविषयी सविस्तर वृत्तानुसार, बुधवारी(ता.१८) रात्री पळसखेडा पिंपळे येथील ज्ञानेश्वर अप्पासाहेब जाधव (२६), रामेश्वर अप्पासाहेब जाधव (२६) व सुनील अप्पासाहेब जाधव (१८) हे तिघे भाऊ रात्री नऊ वाजेच्या सुमारास शेतात गव्हाला पाणी देण्यासाठी गेले होते. रात्री उशिरापर्यंत तीनही मुले घरी का आले नाहीत म्हणून घरची मंडळी चिंता करू लागली. तिघांपैकी कोणाचाही फोनचा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे जाधव कुटुंबातील अन्य लोकांनी याबाबत नातेवाइकांना व आपल्या आसपास असलेल्या नागरीकांना सांगितले. त्यानंतर मध्यरात्रीच त्यांच्या शोधासाठी गावातील लोक गेले. तेव्हा त्यांना तिघेही भाऊ विहिरीत पडलेले दिसले. यासंदर्भात हसनाबाद पोलिस ठाण्याला माहिती देण्यात आली. घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष घोडके हे दाखल झाले. घटनास्थळाचे पंचनामे करण्यात आले. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह राजूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले होते.
संसार अर्ध्यावर…
मृत झालेल्या तीनही भावांपैकी ज्ञानेश्वर हा सर्वात मोठा. तीन महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. रामेश्वर आणि सुनील हे दोघे औरंगाबादेत कंपनीत काम करीत असतं. कोरोनाच्या सावटानंतर सुरक्षितता म्हणून त्यांनी कंपनीतील नोकरी सोडून ते गावी गेले होते. त्यात लॉकडाऊन आले. नंतर शेतीतील कामे आली. त्यामुळे गावीच होते. घरातील कर्तेधर्ते युवक गेल्याने जाधव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने संपूर्ण जालना जिल्हा दादरला आहे.
भोकरदन/राजूर, जि. जालना : तालुक्यातील पळसखेडा पिंपळे येथील सख्ख्या भावांना विजेचा शॉक लागून ते विहिरीत पडून तिघांचाही मृत्यू झाल्याची दुर्घटना बुधवारी (ता १८) रात्री दरम्यान घडली. या घटनेने संपूर्ण जालना जिल्ह्याचं हादरला असून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेविषयी सविस्तर वृत्तानुसार, बुधवारी(ता.१८) रात्री पळसखेडा पिंपळे येथील ज्ञानेश्वर अप्पासाहेब जाधव (२६), रामेश्वर अप्पासाहेब जाधव (२६) व सुनील अप्पासाहेब जाधव (१८) हे तिघे भाऊ रात्री नऊ वाजेच्या सुमारास शेतात गव्हाला पाणी देण्यासाठी गेले होते. रात्री उशिरापर्यंत तीनही मुले घरी का आले नाहीत म्हणून घरची मंडळी चिंता करू लागली. तिघांपैकी कोणाचाही फोनचा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे जाधव कुटुंबातील अन्य लोकांनी याबाबत नातेवाइकांना व आपल्या आसपास असलेल्या नागरीकांना सांगितले. त्यानंतर मध्यरात्रीच त्यांच्या शोधासाठी गावातील लोक गेले. तेव्हा त्यांना तिघेही भाऊ विहिरीत पडलेले दिसले. यासंदर्भात हसनाबाद पोलिस ठाण्याला माहिती देण्यात आली. घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष घोडके हे दाखल झाले. घटनास्थळाचे पंचनामे करण्यात आले. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह राजूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले होते.
संसार अर्ध्यावर…
मृत झालेल्या तीनही भावांपैकी ज्ञानेश्वर हा सर्वात मोठा. तीन महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. रामेश्वर आणि सुनील हे दोघे औरंगाबादेत कंपनीत काम करीत असतं. कोरोनाच्या सावटानंतर सुरक्षितता म्हणून त्यांनी कंपनीतील नोकरी सोडून ते गावी गेले होते. त्यात लॉकडाऊन आले. नंतर शेतीतील कामे आली. त्यामुळे गावीच होते. घरातील कर्तेधर्ते युवक गेल्याने जाधव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने संपूर्ण जालना जिल्हा दादरला आहे.
[ad_2]
Source link