[ad_1]
रायगड | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या कोकण दौऱ्याला आज (९ जून) रायगडपासून सुरुवात केली. यावेळी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत चर्चा केली. पवार यांनी यावेळी माणगाव आणि म्हसळा येथे वादळाने केलेल्या नुकसानीचा आढावा घेतला, त्यानंतर ते दिवे-आगरकडे रवाना झाले. आज ते दिवसभर रायगड जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यांच्यासोबत सुनिल तटकरे, आदिती तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर अनेक नेते आहेत.
शरद पवार यांनी म्हसळा येथे मदरसा आणि उपजिल्हा रुग्णालय येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. जिल्हा परिषद कृषी सभापती बबन मनवे, पंचायत समिती सभापती उज्वला सावंत, उपसभापती भधुकर गायकर, कोळी समाज अध्यक्ष अनिल बसवत यांनी यावेळी शरद पवार यांच्यासमोर नुकसानीच्या व्यथा मांडल्या.
शरद पवार यांनी या दौऱ्यात निर्माणाधीन खडतर रस्त्यांवरुन प्रवास करत नुकसानीची पाहणी केली. माणगावनंतर म्हसळा, दिवेआगार, श्रीवर्धन असा प्रवास करत माणगाव म्हसळा रोडवरील घोणसे घाटातून त्यांचा दौरा पुढे गेला.
शरद पवार यांच्या दौऱ्यातील प्रमुख घडामोडी:
- शरद पवार दुपारी 12.30 वाजता माणगाव मार्केटला आले. तिथं त्यांनी नुकसानीची पाहणी केली.
- दुपारी 1 वाजता त्यांनी म्हसाळा येथील मदरशाला भेट दिली. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात शेडचं नुकसान झालं होतं. शेडची पाहणी करुन स्थानिकांकडून माहिती घेतली.
- दुपारी 1.15 ला म्हसाळा येथील रुग्णालयाची पाहणी केली. वादळामुळे तिथेही मोठं नुकसान झालं होतं.
- दुपारी 1.45 च्या दरम्यान त्यांनी दिवे आगार येथील गिरीराज बापट यांच्या चिकू, नारळ बागेची पाहणी केली. तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
- रस्त्यात अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याचं दिसून आलं. तसेच वीजेचे खांबही पडल्याचं पाहायला मिळालं.
[ad_2]
Source link