[ad_1]
वाढत्या लोकसंख्येमुळे दरडोई जमीन धारणा कमी होत आहे. त्यातच बदलत्या हवामानाचे शेती उत्पादनावर विपरीत परिणाम जाणवू लागले आहे. अनियमित पाऊस, अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी परिस्थिती अशा समस्यांना सामोरे जाताना पिकांची उत्पादकता कमी होत आहे. अशा वेळी उपलब्ध जमीन धारणेमध्ये शाश्वत उत्पादन व उत्पन्न मिळवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ठरते.
हवामान बदलाची बदलती परिस्थिती आणि कमी होत जाणारी दरडोई जमीन धारणा या दोन्ही बाबी लक्षात ठेवून शेतीतून उत्पादकता व उत्पन्न वाढवण्यासाठी शेतीला वेगवेगळ्या पूरक व्यवसायांची जोड देणे अत्यावश्यक ठरत आहे. अशा एकात्मिक शेती पद्धतीमध्ये वैविध्यपूर्ण पिकांच्या, फळांच्या शेतीसोबत पशुपालन (मुख्यत्वे बैल, गाय, म्हैस, वराह, शेळ्या, मेंढ्या अशा स्थानिक प्राण्यांचा समावेश), पक्षिपालन (यात मुख्यत्वे कोंबडी व अन्य) व शेततळे किंवा पाणी साठा उपलब्ध असल्यास मत्स्यपालन, मधमाशीपालन इ. घटकांची सांगड घातली पाहिजे.
आपल्या स्वतःच्या शेतीसाठी एकूण क्षेत्र आणि उपलब्ध संसाधने यांचा विचार करून योग्य असा आराखडा तयार करावा. पीकनिहाय आराखडा तयार करताना कुटुंबांची आहाराची गरज आणि बाजारपेठेची मागणी लक्षात घ्यावी. त्याच प्रमाणे जो कोणताही पूरक व्यवसाय करणार आहोत, त्यासाठीही नियोजन करावे. हे दोन्ही घटक एकमेकांना पूरक असावेत. एका घटकाचे अवशेष किंवा उत्पादन हे दुसऱ्या घटकांसाठी निविष्ठा म्हणू वापरता आली पाहिजे. ही साखळी योग्य प्रकारे कार्यरत राहिल्यास खर्चात मोठी बचत होते. उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते.
एकात्मिक शेती पद्धतीची आवश्यकता
- रासायनिक खते, कीटकनाशकांच्या अतिरिक्त वापरामुळे नैसर्गिक संसाधनांची गुणवत्ता ढासळत गेली आहे.
- सलग पिके घेणे व वारंवार, अधिक सिंचन यामुळे मातीचे भूजल प्रदूषण, मातीची झीज या समस्या निर्माण झाल्या.
- पारंपरिक पीक वाण, स्थानिक सजीव जाती यांची जागा नवीन जातींनी घेतली. आनुवंशिक जैवविविधता संकुचित झाली.
- निव्वळ शेतीच्या उत्पन्नातून कुटुंबाची उपजीविका करण्यामध्ये अडचणी येतात. त्यापेक्षा पूरक व्यवसायाची जोड दिसल्यास फायदा वाढू शकतो.
प्राथमिक उद्दिष्टे
- सर्व घटक शेती उपक्रमांतून उत्पन्न वाढीबरोबरच स्थिरता मिळवणे.
- शेती प्रणालीच्या उत्पादकता पुनरुज्जीवन व सुधार.
- कीटक व तण व्यवस्थापनासाठी नैसर्गिक घटकांचा वापर.
- कृषी-पर्यावरणीय समतोल साधण्यासाठी रासायनिक घटकांचा किमान वापर.
एकात्मिक शेती पद्धतीचे फायदे
- कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढवून दरडोई आर्थिक उत्पन्नात वाढ करणे.
- कमी कृषी क्षेत्रात अधिक नफा मिळू शकतो.
- शेती व पशू-पक्षी पालनामधील शिल्लक अवशेषांचा शास्त्रीय पद्धतीने पुनर्वापर. उदा. चाऱ्याचा पशुआहारात वापर, पशूंच्या शेणांपासून बायोगॅस निर्मिती, पुढे बायोगॅस स्लरीचा वापर शेतीमध्ये खत म्हणून करणे इ.
- बाह्य निविष्ठांवरील अवलंबित्व कमी होऊन खर्चात बचत होते.
- विविध अन्नधान्ये, भाजीपाला पिके, फळे यांचा एकत्रित आराखडा केल्यामुळे कुटुंबाला पोषक आहार मिळू शकतो.
- पीक अवशेषांची विल्हेवाट लावण्याची समस्या व प्रदूषण कमी होऊ शकते. होत असलेल्या कचऱ्याच्या पुनर्वापरामुळे पीक कचऱ्याचे ढीग होत नाहीत आणि परिणामी प्रदूषण टाळण्यास मदत होते.
- योग्य नियोजनातून एकात्मिक शेतीतून वर्षभर आर्थिक प्रवाह सुरू राहू शकतो. पूरक व्यवसायातून रोख रक्कम हाती खेळती राहते.
एकात्मिक शेती पद्धती घटक
एकात्मिक शेती पद्धतीमध्ये शेतीमध्ये विविध पिके, फळबाग, वनीकरण, तुती लागवड, बीजोत्पादन, सेंद्रिय परसबाग यांचा समावेश करावा. याला जोड म्हणून गाय- म्हैस पालन, कुक्कुटपालन, शेळीपालन, मत्स्यपालन, चारा उत्पादन, गांडूळ खतनिर्मिती, मधमाशीपालन, बदक पालन, कबूतर पालन, मशरूम उत्पादन, रेशीम कीटक संगोपन, ॲझोला निर्मिती, मेंढीपालन, वराह पालन इ. या पैकी दोन ते तीन घटकांचा आपल्याकडे उपलब्ध क्षेत्र, संसाधनांप्रमाणे समावेश करता येतो.
क्षेत्र अधिक असल्यास एकात्मिक शेती पद्धतीमध्ये पाणलोट क्षेत्र विकास, शेत तलाव इ. बाबीही अंतर्भूत करता येतात.
उपयुक्त एकात्मिक शेती पद्धती मॉडेल
अ) शेळी+ पीक एकात्मिक शेती पद्धती मॉडेल (१ हेक्टर) राज्यातील पावसावर आधारित क्षेत्रासाठी.
१) पीक पद्धती
कापूस + तूर (६:२) – तीळ
सोयाबीन + तूर (५:१)
ज्वारी – गहू
सोयाबीन – हरभरा
चवळी – मेथी
२) फलोत्पादन : सीताफळ, शेवगा
३) पशुपालन : १२ शेळ्या, २५ कोंबड्या, ५ ससे
४) क्षेत्र वाटा
पिके : ८० %
फलोत्पादन : १० %
पशुपालन : १० %
५) मॉडेलचा फायदा
- या मॉडेलमधून सरासरी उत्पादन : ५१ टन प्रति वर्ष मिळते.
- सरासरी निव्वळ नफा ०.६७ लाख रुपये प्रति वर्ष मिळतो.
- ९५१ मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध होतो.
ब) पीक + पशुपालन एकात्मिक शेती पद्धती मॉडेल (१ हेक्टर) (उत्तर कोकणातील किनारी क्षेत्रासाठी)
१) पीक पद्धती
तांदूळ – वांगी
तांदूळ – टरबूज
नाचणी – चवळी
भुईमूग – वाल
काकडी – मधुमका
हायब्रीड नेपियर बाजरी- चवळी
२) फलोत्पादन : आंबा, आवळा, चिकू, नारळ
आंतरपीक म्हणून मसाला पिकांचा समावेश करणे
३) पशुपालन : ३ गायी, १२ शेळ्या व कुक्कुटपालन
४) क्षेत्र वाटा
पिके : ६०%
फलोत्पादन : ३०%
पशुपालन : १०%
५) मॉडेलचा फायदा
- या मॉडेलमधून सरासरी उत्पादन ४४ टन प्रति वर्ष मिळते.
- मिळणारा निव्वळ नफा रु. १.४५ लाख प्रति वर्ष आहे.
- या मॉडेलमधून ९६४ मनुष्य दिवस रोजगार निर्माण होतो.
क) पीक + दुग्ध व्यवसाय एकात्मिक शेती पद्धती मॉडेल (१ हेक्टर) (मराठवाडा विभागासाठी)
१) पीक पद्धती
सोयाबीन -ज्वारी
सोयाबीन – गहू
सोयाबीन – कांदा
मूग– वांगी
मूग– ल्युसर्न , हायब्रीड नेपियर बाजरी
२) फलोत्पादन : लिंबू
आंतरपिके म्हणून सोयाबीन, कोबी, आले, हळद घेणे.
३) पशुपालन : १ गाय, १ म्हैस
४) मॉडेलचा फायदा
- या मॉडेलमधून सरासरी उत्पादन ०६ टन प्रति वर्ष मिळते.
- सरासरी आर्थिक निव्वळ नफा रु. ०.९२ लाख प्रति वर्ष मिळतो.
- ५०४ मनुष्य दिवसांचा रोजगारही निर्माण होतो.
ड) पीक + पशुपालन एकात्मिक शेती पद्धती मॉडेल (१ हेक्टर) शाश्वत उत्पन्नासाठी
१) पीक पद्धती
सोयाबीन – गहू – पालेभाज्या
मका – कांदा – मूग
बाजरी- हरभरा- भाजी पाला पीक, ल्युसर्न, हायब्रीड नेपियर बाजरी
२) फलोत्पादन : पपई
३) पशुपालन : २ गायी
कुक्कुटपालन : ४०० कोंबड्या (४ बॅच)
मॉडेलचा फायदा
या मॉडेलचे सरासरी उत्पादन १६ टन प्रति वर्ष आहे.
निव्वळ नफा रु. २.४२ लाख प्रति वर्ष मिळू शकतो.
या मॉडेलमधून ५११ मनुष्य दिवस रोजगार निर्माण होऊ शकतो.
आणि मॉडेलचा शाश्वती निर्देशांक ०.७९ आहे.
– अनिकेत पाटील , ८५५४०६४०११
(अनिकेत पाटील हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे कृषी विद्या विभागामध्ये पीएच. डी.चे विद्यार्थी असून, डॉ. आदिनाथ पासलावर हे विभाग प्रमुख आहेत. तर डॉ. जयंत देशमुख हे अखिल भारतीय समन्वयित एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्पांत मुख्य शास्त्रज्ञ आहेत.)
वाढत्या लोकसंख्येमुळे दरडोई जमीन धारणा कमी होत आहे. त्यातच बदलत्या हवामानाचे शेती उत्पादनावर विपरीत परिणाम जाणवू लागले आहे. अनियमित पाऊस, अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी परिस्थिती अशा समस्यांना सामोरे जाताना पिकांची उत्पादकता कमी होत आहे. अशा वेळी उपलब्ध जमीन धारणेमध्ये शाश्वत उत्पादन व उत्पन्न मिळवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ठरते.
हवामान बदलाची बदलती परिस्थिती आणि कमी होत जाणारी दरडोई जमीन धारणा या दोन्ही बाबी लक्षात ठेवून शेतीतून उत्पादकता व उत्पन्न वाढवण्यासाठी शेतीला वेगवेगळ्या पूरक व्यवसायांची जोड देणे अत्यावश्यक ठरत आहे. अशा एकात्मिक शेती पद्धतीमध्ये वैविध्यपूर्ण पिकांच्या, फळांच्या शेतीसोबत पशुपालन (मुख्यत्वे बैल, गाय, म्हैस, वराह, शेळ्या, मेंढ्या अशा स्थानिक प्राण्यांचा समावेश), पक्षिपालन (यात मुख्यत्वे कोंबडी व अन्य) व शेततळे किंवा पाणी साठा उपलब्ध असल्यास मत्स्यपालन, मधमाशीपालन इ. घटकांची सांगड घातली पाहिजे.
आपल्या स्वतःच्या शेतीसाठी एकूण क्षेत्र आणि उपलब्ध संसाधने यांचा विचार करून योग्य असा आराखडा तयार करावा. पीकनिहाय आराखडा तयार करताना कुटुंबांची आहाराची गरज आणि बाजारपेठेची मागणी लक्षात घ्यावी. त्याच प्रमाणे जो कोणताही पूरक व्यवसाय करणार आहोत, त्यासाठीही नियोजन करावे. हे दोन्ही घटक एकमेकांना पूरक असावेत. एका घटकाचे अवशेष किंवा उत्पादन हे दुसऱ्या घटकांसाठी निविष्ठा म्हणू वापरता आली पाहिजे. ही साखळी योग्य प्रकारे कार्यरत राहिल्यास खर्चात मोठी बचत होते. उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते.
एकात्मिक शेती पद्धतीची आवश्यकता
- रासायनिक खते, कीटकनाशकांच्या अतिरिक्त वापरामुळे नैसर्गिक संसाधनांची गुणवत्ता ढासळत गेली आहे.
- सलग पिके घेणे व वारंवार, अधिक सिंचन यामुळे मातीचे भूजल प्रदूषण, मातीची झीज या समस्या निर्माण झाल्या.
- पारंपरिक पीक वाण, स्थानिक सजीव जाती यांची जागा नवीन जातींनी घेतली. आनुवंशिक जैवविविधता संकुचित झाली.
- निव्वळ शेतीच्या उत्पन्नातून कुटुंबाची उपजीविका करण्यामध्ये अडचणी येतात. त्यापेक्षा पूरक व्यवसायाची जोड दिसल्यास फायदा वाढू शकतो.
प्राथमिक उद्दिष्टे
- सर्व घटक शेती उपक्रमांतून उत्पन्न वाढीबरोबरच स्थिरता मिळवणे.
- शेती प्रणालीच्या उत्पादकता पुनरुज्जीवन व सुधार.
- कीटक व तण व्यवस्थापनासाठी नैसर्गिक घटकांचा वापर.
- कृषी-पर्यावरणीय समतोल साधण्यासाठी रासायनिक घटकांचा किमान वापर.
एकात्मिक शेती पद्धतीचे फायदे
- कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढवून दरडोई आर्थिक उत्पन्नात वाढ करणे.
- कमी कृषी क्षेत्रात अधिक नफा मिळू शकतो.
- शेती व पशू-पक्षी पालनामधील शिल्लक अवशेषांचा शास्त्रीय पद्धतीने पुनर्वापर. उदा. चाऱ्याचा पशुआहारात वापर, पशूंच्या शेणांपासून बायोगॅस निर्मिती, पुढे बायोगॅस स्लरीचा वापर शेतीमध्ये खत म्हणून करणे इ.
- बाह्य निविष्ठांवरील अवलंबित्व कमी होऊन खर्चात बचत होते.
- विविध अन्नधान्ये, भाजीपाला पिके, फळे यांचा एकत्रित आराखडा केल्यामुळे कुटुंबाला पोषक आहार मिळू शकतो.
- पीक अवशेषांची विल्हेवाट लावण्याची समस्या व प्रदूषण कमी होऊ शकते. होत असलेल्या कचऱ्याच्या पुनर्वापरामुळे पीक कचऱ्याचे ढीग होत नाहीत आणि परिणामी प्रदूषण टाळण्यास मदत होते.
- योग्य नियोजनातून एकात्मिक शेतीतून वर्षभर आर्थिक प्रवाह सुरू राहू शकतो. पूरक व्यवसायातून रोख रक्कम हाती खेळती राहते.
एकात्मिक शेती पद्धती घटक
एकात्मिक शेती पद्धतीमध्ये शेतीमध्ये विविध पिके, फळबाग, वनीकरण, तुती लागवड, बीजोत्पादन, सेंद्रिय परसबाग यांचा समावेश करावा. याला जोड म्हणून गाय- म्हैस पालन, कुक्कुटपालन, शेळीपालन, मत्स्यपालन, चारा उत्पादन, गांडूळ खतनिर्मिती, मधमाशीपालन, बदक पालन, कबूतर पालन, मशरूम उत्पादन, रेशीम कीटक संगोपन, ॲझोला निर्मिती, मेंढीपालन, वराह पालन इ. या पैकी दोन ते तीन घटकांचा आपल्याकडे उपलब्ध क्षेत्र, संसाधनांप्रमाणे समावेश करता येतो.
क्षेत्र अधिक असल्यास एकात्मिक शेती पद्धतीमध्ये पाणलोट क्षेत्र विकास, शेत तलाव इ. बाबीही अंतर्भूत करता येतात.
उपयुक्त एकात्मिक शेती पद्धती मॉडेल
अ) शेळी+ पीक एकात्मिक शेती पद्धती मॉडेल (१ हेक्टर) राज्यातील पावसावर आधारित क्षेत्रासाठी.
१) पीक पद्धती
कापूस + तूर (६:२) – तीळ
सोयाबीन + तूर (५:१)
ज्वारी – गहू
सोयाबीन – हरभरा
चवळी – मेथी
२) फलोत्पादन : सीताफळ, शेवगा
३) पशुपालन : १२ शेळ्या, २५ कोंबड्या, ५ ससे
४) क्षेत्र वाटा
पिके : ८० %
फलोत्पादन : १० %
पशुपालन : १० %
५) मॉडेलचा फायदा
- या मॉडेलमधून सरासरी उत्पादन : ५१ टन प्रति वर्ष मिळते.
- सरासरी निव्वळ नफा ०.६७ लाख रुपये प्रति वर्ष मिळतो.
- ९५१ मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध होतो.
ब) पीक + पशुपालन एकात्मिक शेती पद्धती मॉडेल (१ हेक्टर) (उत्तर कोकणातील किनारी क्षेत्रासाठी)
१) पीक पद्धती
तांदूळ – वांगी
तांदूळ – टरबूज
नाचणी – चवळी
भुईमूग – वाल
काकडी – मधुमका
हायब्रीड नेपियर बाजरी- चवळी
२) फलोत्पादन : आंबा, आवळा, चिकू, नारळ
आंतरपीक म्हणून मसाला पिकांचा समावेश करणे
३) पशुपालन : ३ गायी, १२ शेळ्या व कुक्कुटपालन
४) क्षेत्र वाटा
पिके : ६०%
फलोत्पादन : ३०%
पशुपालन : १०%
५) मॉडेलचा फायदा
- या मॉडेलमधून सरासरी उत्पादन ४४ टन प्रति वर्ष मिळते.
- मिळणारा निव्वळ नफा रु. १.४५ लाख प्रति वर्ष आहे.
- या मॉडेलमधून ९६४ मनुष्य दिवस रोजगार निर्माण होतो.
क) पीक + दुग्ध व्यवसाय एकात्मिक शेती पद्धती मॉडेल (१ हेक्टर) (मराठवाडा विभागासाठी)
१) पीक पद्धती
सोयाबीन -ज्वारी
सोयाबीन – गहू
सोयाबीन – कांदा
मूग– वांगी
मूग– ल्युसर्न , हायब्रीड नेपियर बाजरी
२) फलोत्पादन : लिंबू
आंतरपिके म्हणून सोयाबीन, कोबी, आले, हळद घेणे.
३) पशुपालन : १ गाय, १ म्हैस
४) मॉडेलचा फायदा
- या मॉडेलमधून सरासरी उत्पादन ०६ टन प्रति वर्ष मिळते.
- सरासरी आर्थिक निव्वळ नफा रु. ०.९२ लाख प्रति वर्ष मिळतो.
- ५०४ मनुष्य दिवसांचा रोजगारही निर्माण होतो.
ड) पीक + पशुपालन एकात्मिक शेती पद्धती मॉडेल (१ हेक्टर) शाश्वत उत्पन्नासाठी
१) पीक पद्धती
सोयाबीन – गहू – पालेभाज्या
मका – कांदा – मूग
बाजरी- हरभरा- भाजी पाला पीक, ल्युसर्न, हायब्रीड नेपियर बाजरी
२) फलोत्पादन : पपई
३) पशुपालन : २ गायी
कुक्कुटपालन : ४०० कोंबड्या (४ बॅच)
मॉडेलचा फायदा
या मॉडेलचे सरासरी उत्पादन १६ टन प्रति वर्ष आहे.
निव्वळ नफा रु. २.४२ लाख प्रति वर्ष मिळू शकतो.
या मॉडेलमधून ५११ मनुष्य दिवस रोजगार निर्माण होऊ शकतो.
आणि मॉडेलचा शाश्वती निर्देशांक ०.७९ आहे.
– अनिकेत पाटील , ८५५४०६४०११
(अनिकेत पाटील हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे कृषी विद्या विभागामध्ये पीएच. डी.चे विद्यार्थी असून, डॉ. आदिनाथ पासलावर हे विभाग प्रमुख आहेत. तर डॉ. जयंत देशमुख हे अखिल भारतीय समन्वयित एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्पांत मुख्य शास्त्रज्ञ आहेत.)
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.