[ad_1]
अकोला ः शेतकऱ्याने कपाशीची लागवड केली. कपाशीची झाडे वाढून मोठी झाली. मात्र, बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाल्याने एकाही झाडाला बोंड लागले नाही. शितादही करण्यापुरताही कापूस लागला नसल्याचे शेतकऱ्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिस ठाणे गाठत बियाणे कंपनी व कृषी केंद्राच्या विरोधात बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथील अल्पभूधारक शेतकरी प्रवीण उर्फ बाबूराव राखोंडे यांनी तक्रार दाखल केली आहे.
राखोंडे यांची अंदुरा शिवारात ३८३ गट क्रमांकात चार एकर शेती असून त्यांनी चारही एकरात बीटी वाणाची सात जून रोजी पेरणी केली होती. मात्र, कपाशीला बोंडेच लागली नाही. शेतकऱ्याने तेल्हारा येथील एका कृषी केंद्रातून कपाशीचे बियाणे खरेदी केले होते. पिकाला खते टाकूनही बोंडे लागले नसल्याने वर्षभर करायचे काय, असा प्रश्न पडला आहे. संपूर्ण शेतकऱ्याचे कुटुंब शेतीच्या भरवशावर असून आता करायचे काय, असा निर्माण झाला आहे. झालेल्या नुकसानाची भरपाई संबंधित कंपनीने द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.
चार महिनानंतरही या कपाशीला कापूस व कुठलेच बोंड न लागल्याने शेतकऱ्याने तेल्हारा येथील कृषी केंद्राशी संपर्क साधला. त्यांनी बियाणे कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना याबाबत वारंवार अवगत केले. मात्र, सदर शेतकऱ्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शेतकऱ्याने शनिवारी (ता. २४) उरळ पोलिस ठाण्यात धाव घेऊन बियाणे कंपनी व कृषी केंद्राच्या संचालकाविरुद्ध तक्रार दिली आहे.
कुटुंबासह आमरण उपोषणाचा इशारा
बियाणे कंपनी, कृषी केंद्र संचालक यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही हाती काहीच लागले नसल्याने अखेर शेतकऱ्याने आपल्या कुटुंबीयांसह आमरण उपोषण करण्याचा इशारा उरळ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केला आहे. सदर शेतकऱ्याचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून, आपल्याला नुकसान भरपाई न मिळाल्यास कुटुंबासह आमरण उपोषण करणार असल्याचे म्हटले.
अकोला ः शेतकऱ्याने कपाशीची लागवड केली. कपाशीची झाडे वाढून मोठी झाली. मात्र, बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाल्याने एकाही झाडाला बोंड लागले नाही. शितादही करण्यापुरताही कापूस लागला नसल्याचे शेतकऱ्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिस ठाणे गाठत बियाणे कंपनी व कृषी केंद्राच्या विरोधात बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथील अल्पभूधारक शेतकरी प्रवीण उर्फ बाबूराव राखोंडे यांनी तक्रार दाखल केली आहे.
राखोंडे यांची अंदुरा शिवारात ३८३ गट क्रमांकात चार एकर शेती असून त्यांनी चारही एकरात बीटी वाणाची सात जून रोजी पेरणी केली होती. मात्र, कपाशीला बोंडेच लागली नाही. शेतकऱ्याने तेल्हारा येथील एका कृषी केंद्रातून कपाशीचे बियाणे खरेदी केले होते. पिकाला खते टाकूनही बोंडे लागले नसल्याने वर्षभर करायचे काय, असा प्रश्न पडला आहे. संपूर्ण शेतकऱ्याचे कुटुंब शेतीच्या भरवशावर असून आता करायचे काय, असा निर्माण झाला आहे. झालेल्या नुकसानाची भरपाई संबंधित कंपनीने द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.
चार महिनानंतरही या कपाशीला कापूस व कुठलेच बोंड न लागल्याने शेतकऱ्याने तेल्हारा येथील कृषी केंद्राशी संपर्क साधला. त्यांनी बियाणे कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना याबाबत वारंवार अवगत केले. मात्र, सदर शेतकऱ्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शेतकऱ्याने शनिवारी (ता. २४) उरळ पोलिस ठाण्यात धाव घेऊन बियाणे कंपनी व कृषी केंद्राच्या संचालकाविरुद्ध तक्रार दिली आहे.
कुटुंबासह आमरण उपोषणाचा इशारा
बियाणे कंपनी, कृषी केंद्र संचालक यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही हाती काहीच लागले नसल्याने अखेर शेतकऱ्याने आपल्या कुटुंबीयांसह आमरण उपोषण करण्याचा इशारा उरळ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केला आहे. सदर शेतकऱ्याचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून, आपल्याला नुकसान भरपाई न मिळाल्यास कुटुंबासह आमरण उपोषण करणार असल्याचे म्हटले.
[ad_2]
Source link