[ad_1]
नवी दिल्ली। देशात गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन चालू आहे. यामुळे उद्योगधंदे, शेतीची कामे बंद आहेत. हातात रोख पैसा नाही, मात्र घरगुती खर्चासाठी पैशाची मोठी गरज भासत आहे. रोख पैसा नसल्याने खर्च कसा भागवायचा याची चिंता आता सगळ्यांनाच पडू लागली आहे. परंतु ज्यांच्याकडे किसान क्रेडिट कार्ड आहे, त्यांची मात्र या चिंतेतून काहीअंशी सुटका झाली आहे. हो शेतीच्या कामासाठी उपयोगात येणारे किसान क्रेडिट कार्ड आता तुमच्या घरातील वस्तू आणि किराणा भरण्यासाठी उपयोगात आणता येणार आहे.
किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून यापूर्वी शेतकऱ्यांना शेती कामासाठी खर्च करता येत होता. खते, बियाणे, अवजारे, आदीच्या कामासाठी या कार्डचा उपयोग होत होता. परंतु आता या कार्डच्या साहाय्याने शेतकऱ्यांना आता किराणा साहित्य देखील भरता येणार आहे. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना रोकडची चणचण भासत आहे. यावर केसीसीने ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
केसीसी योजनेअंतर्गत अल्प मुदतीच्या मर्यादेच्या १० टक्के रक्कम घरगुती कारणासाठी वापरता येऊ शकते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India )ने आपल्या आर्थिक शिक्षण (शेतकर्यांसाठी) कलमांतर्गत या संदर्भात आपल्या वेबसाइटवर माहिती दिली आहे.
किसान क्रेडिट कार्ड योजनेचा हेतू म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या पीक कर्जाची आवश्यकता पूर्ण करता यावी. यामुळे रिझर्व्ह बॅंकेने आपल्या घरगुती खर्चाची पूर्तता करण्यासाठी किसान कार्ड मोठ्या प्रमाणात न वापरण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे.
केसीसी कर्जाचा वेळेवर भरणा केल्यास शेतकऱ्यांना भविष्यातील कर्जावर अधिक लाभ मिळू शकेल. रिझर्व्ह बँकेने देशातील बँकांना एक मार्गदर्शिका जारी केली आहे. त्याअंतर्गत, १ मार्च २०२० ते ३१ मे २०२० दरम्यान ज्यांची खाती बाकी आहेत किंवा होतील. अशा शेतकर्यांना अल्प मुदतीच्या पीक कर्जासाठी २% व्याज सबवेशन (आयएस) आणि ३% च्या प्रॉम्प्ट रीपेमेंट इन्सेन्टिव्ह (पीआरआय) चा लाभ देण्यास सांगितले आहे.
[ad_2]
Source link