[ad_1]
जालना ः ‘‘शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करावा,’’ असा सल्ला उपविभागीय कृषी अधिकारी गजानन सोनकांबळे यांनी दिला.
शुक्रवारी (ता. २८) कृषी विज्ञान केंद्र खरपुडीमार्फत कडधान्य समूह पीक प्रात्यक्षिक उपक्रमाअंतर्गत मौजे कटाळा, तालुका मंठा येथे आयोजित ‘उडीद शेती दिन’ या कार्यक्रमात सोनकांबळे बोलत होते. या प्रसंगी तालुका कृषी अधिकारी विष्णू राठोड, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस. व्ही. सोनुने, सरपंच गजानन घाटूळ, विषय विशेषज्ञ पीक संरक्षण अजय मिटकरी, कृषी अभियंता पंडित वासरे यांची उपस्थिती होती.
सर्व मान्यवर व शेतकऱ्यांनी सर्जेराव बेंद्रे यांच्या कापूस अधिक उडीद आंतरपीक पद्धतीतील एकेयु- १५ या सुधारित उडीद वाणाच्या प्रात्यक्षिक प्लॉटला भेट दिली.
सोनकांबळे म्हणाले, ‘‘सध्याच्या परिस्थितीत मुगापेक्षा उडीद पीक हे तग धरणारे आहे. भविष्यात डाळवर्गीय पिकांना मागणी असेल. त्यामुळे त्यांचे उत्पादन घेणे फायदेशीर ठरेल. त्याच प्रमाणे शेतीसोबत पूरक व्यवसायाची जोड लावल्यास, त्या माध्यमातून आर्थिक घडी बसू शकेल.’’
मिटकरी म्हमाले, ‘‘आर्द्रता युक्त वातावरण असल्यास सोयाबीनवर करपा येण्याची शक्यता आहे. तरी शेतकऱ्यांनी जागरूक राहावे.’’
पंडित वासरे यांनी येणाऱ्या हंगामात पाण्याचे व्यवस्थापन करून शेती पद्धतीत योग्य बदल करावा, असे मार्गदर्शन केले.
जालना ः ‘‘शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करावा,’’ असा सल्ला उपविभागीय कृषी अधिकारी गजानन सोनकांबळे यांनी दिला.
शुक्रवारी (ता. २८) कृषी विज्ञान केंद्र खरपुडीमार्फत कडधान्य समूह पीक प्रात्यक्षिक उपक्रमाअंतर्गत मौजे कटाळा, तालुका मंठा येथे आयोजित ‘उडीद शेती दिन’ या कार्यक्रमात सोनकांबळे बोलत होते. या प्रसंगी तालुका कृषी अधिकारी विष्णू राठोड, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस. व्ही. सोनुने, सरपंच गजानन घाटूळ, विषय विशेषज्ञ पीक संरक्षण अजय मिटकरी, कृषी अभियंता पंडित वासरे यांची उपस्थिती होती.
सर्व मान्यवर व शेतकऱ्यांनी सर्जेराव बेंद्रे यांच्या कापूस अधिक उडीद आंतरपीक पद्धतीतील एकेयु- १५ या सुधारित उडीद वाणाच्या प्रात्यक्षिक प्लॉटला भेट दिली.
सोनकांबळे म्हणाले, ‘‘सध्याच्या परिस्थितीत मुगापेक्षा उडीद पीक हे तग धरणारे आहे. भविष्यात डाळवर्गीय पिकांना मागणी असेल. त्यामुळे त्यांचे उत्पादन घेणे फायदेशीर ठरेल. त्याच प्रमाणे शेतीसोबत पूरक व्यवसायाची जोड लावल्यास, त्या माध्यमातून आर्थिक घडी बसू शकेल.’’
मिटकरी म्हमाले, ‘‘आर्द्रता युक्त वातावरण असल्यास सोयाबीनवर करपा येण्याची शक्यता आहे. तरी शेतकऱ्यांनी जागरूक राहावे.’’
पंडित वासरे यांनी येणाऱ्या हंगामात पाण्याचे व्यवस्थापन करून शेती पद्धतीत योग्य बदल करावा, असे मार्गदर्शन केले.
[ad_2]
Source link