[ad_1]
सांगली : केंद्र शासनाच्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला सांगली जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. केंद्र सरकारच्या पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून करण्यात आला. मात्र याला पोलिसांनी विरोध केला. या वेळी पोलिस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पुतळा दहनावेळी झटापटीचा प्रकार घडला. त्यामुळे काही वेळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
केंद्र शासनाने लागू केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. पंजाब, हरियाना तसेच उत्तर भारतातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. देशभरातील शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली. जिल्ह्यात मंगळवारी (ता. ८) सकाळपासून शहर आणि ग्रामीण भागातील व्यापारी संघटनांनी दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवली. दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये भाजीपाला फळे, धान्य यासह कांदा बटाट्याची आवक झाली नसल्याने सौदे बंद होते. तर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि ‘स्वाभिमानी’सह इतर सामाजिक संघटनांनी ‘भारत बंद’ला पाठिंबा दिला. या बंदमध्ये सर्व पक्षीय आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रॅली काढण्यात आली.
सांगली : केंद्र शासनाच्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला सांगली जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. केंद्र सरकारच्या पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून करण्यात आला. मात्र याला पोलिसांनी विरोध केला. या वेळी पोलिस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पुतळा दहनावेळी झटापटीचा प्रकार घडला. त्यामुळे काही वेळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
केंद्र शासनाने लागू केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. पंजाब, हरियाना तसेच उत्तर भारतातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. देशभरातील शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली. जिल्ह्यात मंगळवारी (ता. ८) सकाळपासून शहर आणि ग्रामीण भागातील व्यापारी संघटनांनी दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवली. दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये भाजीपाला फळे, धान्य यासह कांदा बटाट्याची आवक झाली नसल्याने सौदे बंद होते. तर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि ‘स्वाभिमानी’सह इतर सामाजिक संघटनांनी ‘भारत बंद’ला पाठिंबा दिला. या बंदमध्ये सर्व पक्षीय आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रॅली काढण्यात आली.
[ad_2]
Source link