[ad_1]
कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत तातडीने सुधारणा करा, अशी मागणी आंदोलन अंकुशच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन त्यांनी वजन काटे विभागाचे सहायक नियंत्रक डी. पी. पवार यांना दिले.
निवेदनानुसार, ऊस हंगाम काही दिवसांत सुरु होईल. आपल्या विभागामार्फत साखर कारखान्यांच्या वजन काट्यांना वैधता प्रमाणपत्र देण्याचे बहुदा सुरु झाले असेल. भरलेले वाहन कारखाना कार्यस्थळावर आल्यानंतर त्याचे तात्काळ वजन करून मगच नंबरला लावावे. भरलेल्या वाहनाचे वजन करून त्याची वजनस्लिप, ऑटो जनरेटेड वेईन्ग मशीनवरील पावती, वाहन धारकाकडे (मालकाकडे) देण्याची व्यवस्था करावी. शेतकऱ्याला वजन काट्यापर्यंत येण्यास मज्जाव केला जातो. त्याबाबतीत काट्याजवळ माहिती फलक लावण्याची कारखान्यांना सक्ती करावी.
वजनकाट्याच्या वैधतेबद्दल कोणालाही सॅम्पल वजनाद्वारे खात्री करण्याची मुभा असावी (तसा फलक असावा).
शेतकऱ्याला वजनाबाबत तक्रार करायची झाल्यास कोणाकडे करावी, त्याची माहिती देणारा फलक काट्याशेजारी उभारावा. बाहेरच्या काट्यावर शेतकऱ्याने वजनाच्या खात्री साठी वजन केल्यास कारखाना, असे वाहन नाकारतो. त्याबाबत कारखान्यांना सूचना कराव्यात.
ऊस नियंत्रण आदेशानुसार वजनकाटे हे इलेक्ट्रॉनिक व ऑटो जनरेटेड असावेत, असे निर्देश आहेत. त्यामुळे वजन करण्याच्या व पावती देण्याच्या प्रक्रियेमध्ये मानवी हस्तक्षेप असता कामा नये, याबाबतीत खात्री करून व अट घालून साखर कारखान्यांना वैधता प्रमाणपत्र द्यावे. साखर कारखाने हे भरलेल्या वाहनांची पावती काढत नाहीत, वाहन रिकामे होऊन आलेनंतर वजावट करून पावती वाहन चालकाकडे देतात, असे निवेदनात नमूद आहे. यावेळी धनाजी चूडमुंगे. श्रीकांत माने, आप्पा कदम उपस्थित होते.
कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत तातडीने सुधारणा करा, अशी मागणी आंदोलन अंकुशच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन त्यांनी वजन काटे विभागाचे सहायक नियंत्रक डी. पी. पवार यांना दिले.
निवेदनानुसार, ऊस हंगाम काही दिवसांत सुरु होईल. आपल्या विभागामार्फत साखर कारखान्यांच्या वजन काट्यांना वैधता प्रमाणपत्र देण्याचे बहुदा सुरु झाले असेल. भरलेले वाहन कारखाना कार्यस्थळावर आल्यानंतर त्याचे तात्काळ वजन करून मगच नंबरला लावावे. भरलेल्या वाहनाचे वजन करून त्याची वजनस्लिप, ऑटो जनरेटेड वेईन्ग मशीनवरील पावती, वाहन धारकाकडे (मालकाकडे) देण्याची व्यवस्था करावी. शेतकऱ्याला वजन काट्यापर्यंत येण्यास मज्जाव केला जातो. त्याबाबतीत काट्याजवळ माहिती फलक लावण्याची कारखान्यांना सक्ती करावी.
वजनकाट्याच्या वैधतेबद्दल कोणालाही सॅम्पल वजनाद्वारे खात्री करण्याची मुभा असावी (तसा फलक असावा).
शेतकऱ्याला वजनाबाबत तक्रार करायची झाल्यास कोणाकडे करावी, त्याची माहिती देणारा फलक काट्याशेजारी उभारावा. बाहेरच्या काट्यावर शेतकऱ्याने वजनाच्या खात्री साठी वजन केल्यास कारखाना, असे वाहन नाकारतो. त्याबाबत कारखान्यांना सूचना कराव्यात.
ऊस नियंत्रण आदेशानुसार वजनकाटे हे इलेक्ट्रॉनिक व ऑटो जनरेटेड असावेत, असे निर्देश आहेत. त्यामुळे वजन करण्याच्या व पावती देण्याच्या प्रक्रियेमध्ये मानवी हस्तक्षेप असता कामा नये, याबाबतीत खात्री करून व अट घालून साखर कारखान्यांना वैधता प्रमाणपत्र द्यावे. साखर कारखाने हे भरलेल्या वाहनांची पावती काढत नाहीत, वाहन रिकामे होऊन आलेनंतर वजावट करून पावती वाहन चालकाकडे देतात, असे निवेदनात नमूद आहे. यावेळी धनाजी चूडमुंगे. श्रीकांत माने, आप्पा कदम उपस्थित होते.
[ad_2]
Source link