[ad_1]
सातारा ः दरातील तेजी तसेच इतर पिकांना नसलेला अपेक्षित दर यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आले पीक घेण्याकडे कल वाढला आहे. जिल्ह्यात सरासरी अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर आले लागवड होत असते. यावर्षी मात्र ही लागवड चार हजार हेक्टरवर गेली आहे. यावर्षी दीड हजार हेक्टरने क्षेत्रात वाढ झाली आहे.
जिल्ह्यात कोरेगाव, सातारा, खटाव, कराड, पाटण तालुक्यात सर्वाधिक प्रमाणात आले लागवड केली जाते. साधारणपणे या लागवडीसाठी अक्षय तृतीयेचा मुहूर्त असतो. मात्र मागील सहा ते सात वर्षांपासून वळीवाच्या पावसाची दडी, कडक ऊन व पाणीटंचाई आदी कारणांमुळे लागवड काळात बदल होत गेला आहे. मे महिन्याच्या अखेरीस ते जून महिन्याच्या दुसऱ्या सप्ताहापर्यंत आले लागवडीची कामे उरकली जात आहे.
यावर्षीही या दरम्यान लागवड झाली आहे. २०१४-१५ मध्ये आल्याचे दर प्रतिगाडीस (५०० किलो) ५० हजारांवर गेले होते. या काळात शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळाले होते. यानंतर दर टप्प्याटप्याने कमी झाले तरी क्षेत्रात वाढच होत गेली आहे. मागील वर्षी प्रतिगाडीस ३५ हजार रुपये दर होते. यंदा मार्च-एप्रिलमध्ये २२ ते २५ हजार रुपये दर होते. या दरम्यानच बियाण्याचे दर राहिले होते. आधुनिक तंत्राच्यावापराने शेतकऱ्यांनी आले पिकाच्या लागवड क्षेत्रात भरीव वाढ केली आहे.
यामुळे सरासरी प्रतिगाडीस २० ते २५ हजार रुपये दर आणि एकरी ३० गाड्याचे उत्पादन मिळाले तरी इतर पिकांच्या तुलनेत जास्त पैसे मिळत असल्याने या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. या लागवड हंगामात आले लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे तुलनेत बियाण्याचे दर कमी तसेच ‘कोरोना’मुळे सुरू करण्यात आलेल्या लॅाकडाउनमुळे शहरी भागातील लोक गावाकडे आले होते. त्यांचाही आले पीक घेण्याकडे कल राहिला, परिणामी आले पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. माण, फलटण तालुक्यातही आले लागवड वाढली आहे.
सातारा ः दरातील तेजी तसेच इतर पिकांना नसलेला अपेक्षित दर यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आले पीक घेण्याकडे कल वाढला आहे. जिल्ह्यात सरासरी अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर आले लागवड होत असते. यावर्षी मात्र ही लागवड चार हजार हेक्टरवर गेली आहे. यावर्षी दीड हजार हेक्टरने क्षेत्रात वाढ झाली आहे.
जिल्ह्यात कोरेगाव, सातारा, खटाव, कराड, पाटण तालुक्यात सर्वाधिक प्रमाणात आले लागवड केली जाते. साधारणपणे या लागवडीसाठी अक्षय तृतीयेचा मुहूर्त असतो. मात्र मागील सहा ते सात वर्षांपासून वळीवाच्या पावसाची दडी, कडक ऊन व पाणीटंचाई आदी कारणांमुळे लागवड काळात बदल होत गेला आहे. मे महिन्याच्या अखेरीस ते जून महिन्याच्या दुसऱ्या सप्ताहापर्यंत आले लागवडीची कामे उरकली जात आहे.
यावर्षीही या दरम्यान लागवड झाली आहे. २०१४-१५ मध्ये आल्याचे दर प्रतिगाडीस (५०० किलो) ५० हजारांवर गेले होते. या काळात शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळाले होते. यानंतर दर टप्प्याटप्याने कमी झाले तरी क्षेत्रात वाढच होत गेली आहे. मागील वर्षी प्रतिगाडीस ३५ हजार रुपये दर होते. यंदा मार्च-एप्रिलमध्ये २२ ते २५ हजार रुपये दर होते. या दरम्यानच बियाण्याचे दर राहिले होते. आधुनिक तंत्राच्यावापराने शेतकऱ्यांनी आले पिकाच्या लागवड क्षेत्रात भरीव वाढ केली आहे.
यामुळे सरासरी प्रतिगाडीस २० ते २५ हजार रुपये दर आणि एकरी ३० गाड्याचे उत्पादन मिळाले तरी इतर पिकांच्या तुलनेत जास्त पैसे मिळत असल्याने या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. या लागवड हंगामात आले लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे तुलनेत बियाण्याचे दर कमी तसेच ‘कोरोना’मुळे सुरू करण्यात आलेल्या लॅाकडाउनमुळे शहरी भागातील लोक गावाकडे आले होते. त्यांचाही आले पीक घेण्याकडे कल राहिला, परिणामी आले पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. माण, फलटण तालुक्यातही आले लागवड वाढली आहे.
[ad_2]
Source link