[ad_1]
सातारा : जिल्ह्यात सोमवारी अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. यामुळे पिकांचे नुकसान झाले. मंगळवारी (ता. ५) सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली.
जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. सोमवारी (ता.४) पहाटेपासून माण तालुक्यातील म्हसवड परिसरात हलक्या पावसास सुरवात झाली. त्यानंतर खटाव, सातारा, कोरेगाव तालुक्यातही पावसाचा शिडकावा झाला. हलक्या पावसामुळे कामे ठप्प झाली.
सोमवारी रात्री अनेक ठिकाणी वाऱ्यासह दमदार पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी पिके आडवी झाली. माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा तालुक्याचा रब्बी हंगाम प्रमुख असल्याने या तालुक्यात पेरणीही मोठ्या प्रमाणात झाली आहे.
वाऱ्यामुळे रब्बी ज्वारी आडवी झाल्यानेही नुकसान झाले. पावसामुळे आंब्याचे मोहर झडण्याबरोबर वेलवर्गीय पिकांना भुरी, गहू, हरभरा पिकांवर तांबेरा, तर टोमॅटोवर करपाच्या प्रादुर्भावाच्या शक्यतेने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली.
सातारा : जिल्ह्यात सोमवारी अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. यामुळे पिकांचे नुकसान झाले. मंगळवारी (ता. ५) सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली.
जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. सोमवारी (ता.४) पहाटेपासून माण तालुक्यातील म्हसवड परिसरात हलक्या पावसास सुरवात झाली. त्यानंतर खटाव, सातारा, कोरेगाव तालुक्यातही पावसाचा शिडकावा झाला. हलक्या पावसामुळे कामे ठप्प झाली.
सोमवारी रात्री अनेक ठिकाणी वाऱ्यासह दमदार पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी पिके आडवी झाली. माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा तालुक्याचा रब्बी हंगाम प्रमुख असल्याने या तालुक्यात पेरणीही मोठ्या प्रमाणात झाली आहे.
वाऱ्यामुळे रब्बी ज्वारी आडवी झाल्यानेही नुकसान झाले. पावसामुळे आंब्याचे मोहर झडण्याबरोबर वेलवर्गीय पिकांना भुरी, गहू, हरभरा पिकांवर तांबेरा, तर टोमॅटोवर करपाच्या प्रादुर्भावाच्या शक्यतेने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली.
[ad_2]
Source link