[ad_1]
सांगली : जिल्ह्यातील टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनेसह सातारा जिल्ह्यातील उरमोडी योजनेतून सन २०१७-१८ व २०१८-१९ टंचाईच्या काळात दुष्काळी पट्ट्यातील भागाला पाणी दिले होते. त्याचे वीजबिल ३६ कोटी ७५ हजार ७० लाख रुपये इतके झाले होते. या वीजबिलापोटी १८ कोटी रुपयांचे देण्यात आले असून, उर्वरित १८ कोटी ७५ लाख ७० हजार रुपये अद्यापही शासनाने पाटबंधारे विभागाला दिले नाहीत. त्यामुळे वीजबिलापोटी १८ कोटी ७५ लाख मिळणारी रक्कम अद्यापही मिळालेली नाही. त्यामुळे भविष्यात योजना सुरू करण्यासाठी थकीत वीजबिलांमुळे अडथळे होण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ, टेंभू योजनेसह सातारा जिल्ह्यातील उरमोडी योजना सुरू करून दुष्काळी भागाला पाणी देण्याची मागणी केली होती. योजना सुरू केल्यानंतर वीजबिलाचा प्रश्न उपस्थित झाला. या वीजबिलाचा भार कोणावर टाकला जाणार, अशी शेतकऱ्यांत चर्चा सुरू झाली होती. परंतु टंचाई निधीतून योजनेच्या वीजबिलाचा प्रश्न मार्गी लावला जाणार असल्याने या योजना सुरू करून दुष्काळी भागात पाणी सोडण्यात आले.
दरम्यान, सन मार्च १८ पासून या योजना सुरू करण्यात आल्या होत्या. टप्प्याटप्प्याने पाण्याच्या गरजेनुसार योजना सुरू झाल्या होत्या. सन २०१८ व २०१९मध्ये ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजना सुमारे १० ते १२ महिने सुरू होत्या. या कालावधित दुष्काळी भागात पाणी सोडले होते. तसेच दुष्काळी भागातील तलावही या पाण्याने भरून दिले होते. या योजनांचे वीजबिल ३६ कोटी ७५ लाख ७० हजार घरात पोहोचले आहे.
वीजबिलाची रक्कम देण्यासाठी ऑगस्टमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली असून, दोन हप्ते करण्यात आले आहेत. पहिला हप्ता १८ कोटी तर दुसरा हप्ता १८ कोटी ७५ लाख, असा वितरित करण्यास मान्यता दिली आहे. मात्र, १८ कोटी ७५ लाख रुपयांचे वीजबिल टंचाईतून मिळालेले नाही. त्यामुळे थकीत वीजबिल मिळाले नाही तर योजना सुरू होण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
- योजना वीजबिल रक्कम
- म्हैसाळ १६ कोटी ७३ लाख ९९ हजार
- ताकारी ३ कोटी ८१ लाख ८९ हजार
- टेंभू १० कोटी ९१ लाख ८२ हजार
- उरमोडी ५ कोटी २८ लाख
- एकूण ३६ कोटी ७५ लाख ७० हजार
सिंचन योजनांचे वीजबिल थकीत
सांगली (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनेसह सातारा जिल्ह्यातील उरमोडी योजनेतून सन २०१७-१८ व २०१८-१९ टंचाईच्या काळात दुष्काळी पट्ट्यातील भागाला पाणी दिले होते. त्याचे वीजबिल ३६ कोटी ७५ हजार ७० लाख रुपये इतके झाले होते. या वीजबिलापोटी १८ कोटी रुपयांचे देण्यात आले असून, उर्वरित १८ कोटी ७५ लाख ७० हजार रुपये अद्यापही शासनाने पाटबंधारे विभागाला दिले नाहीत. त्यामुळे वीजबिलापोटी १८ कोटी ७५ लाख मिळणारी रक्कम अद्यापही मिळालेली नाही. त्यामुळे भविष्यात योजना सुरू करण्यासाठी थकीत वीजबिलांमुळे अडथळे होण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ, टेंभू योजनेसह सातारा जिल्ह्यातील उरमोडी योजना सुरू करून दुष्काळी भागाला पाणी देण्याची मागणी केली होती. योजना सुरू केल्यानंतर वीजबिलाचा प्रश्न उपस्थित झाला. या वीजबिलाचा भार कोणावर टाकला जाणार, अशी शेतकऱ्यांत चर्चा सुरू झाली होती. परंतु टंचाई निधीतून योजनेच्या वीजबिलाचा प्रश्न मार्गी लावला जाणार असल्याने या योजना सुरू करून दुष्काळी भागात पाणी सोडण्यात आले.
दरम्यान, सन मार्च १८ पासून या योजना सुरू करण्यात आल्या होत्या. टप्प्याटप्प्याने पाण्याच्या गरजेनुसार योजना सुरू झाल्या होत्या. सन २०१८ व २०१९मध्ये ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजना सुमारे १० ते १२ महिने सुरू होत्या. या कालावधित दुष्काळी भागात पाणी सोडले होते. तसेच दुष्काळी भागातील तलावही या पाण्याने भरून दिले होते. या योजनांचे वीजबिल ३६ कोटी ७५ लाख ७० हजार घरात पोहोचले आहे. या वीजबिलाची रक्कम देण्यासाठी ऑगस्टमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली असून, दोन हप्ते करण्यात आले आहेत. पहिला हप्ता १८ कोटी तर दुसरा हप्ता १८ कोटी ७५ लाख, असा वितरित करण्यास मान्यता दिली आहे. मात्र, १८ कोटी ७५ लाख रुपयांचे वीजबिल टंचाईतून मिळालेले नाही. त्यामुळे थकीत वीजबिल मिळाले नाही तर योजना सुरू होण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
- योजना वीजबिल रक्कम
- म्हैसाळ १६ कोटी ७३ लाख ९९ हजार
- ताकारी ३ कोटी ८१ लाख ८९ हजार
- टेंभू १० कोटी ९१ लाख ८२ हजार
- उरमोडी ५ कोटी २८ लाख
- एकूण ३६ कोटी ७५ लाख ७० हजार
[ad_2]
Source link