[ad_1]
जालना : ‘‘सीताफळ बागांचे व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने करावा’’, असा सल्ला महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विनय सुपे यांनी दिला.
कृषि विज्ञान केंद्र, खरपुडी जालना अंतर्गत कृषि विज्ञान मंडळाचे २७७ वे मासिक चर्चासत्र शनिवारी ( ता.५) आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रात ‘सीताफळ बागांचे व्यवस्थापन’ यावर डॉ. सुपे बोलत होते. ‘केव्हिके’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने उपस्थित होते.
डॉ. सुपे म्हणाले, ‘‘सध्याच्या परिस्थितीचा विचार करता बागेची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. बागेत पडलेली पाने, काळी रोगट फळे, झाडावर लटकलेली काळी फळे बागेबाहेर नेऊन त्यांची योग्य विल्हेवाट लावावी. बहराचे नियोजन करताना झाडांमध्ये व मोकळ्या जागेत पालापाचोळ्याचे आच्छादन करावे. बागेत खेळती हवा व स्वच्छ सूर्यप्रकाश येईल याकडे लक्ष द्यावे. सूर्यप्रकाश हा फळांच्या वाढीतील मुख्य घटक आहे. पानांवरील ठिपके या रोगाच्या नियंत्रणासाठी शिफारशी नुसार नियोजन करावे.’’
डॉ. सोनुने म्हणाले, ‘‘जिल्ह्यात सीताफळ लागवड मोठ्या प्रमाणात होत असून सीताफळ बागामधील व्यवस्थापन व मूल्यवर्धन करून मार्केटिंग करणे आवश्यक आहे.’’
शास्त्रज्ञ डॉ. एस. एम. सोनकांबळे म्हणाले, ‘‘सीताफळ हे लवकर परिपक्व होते. त्याला टिकवणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यावर प्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे. सीताफळाला १५ दिवस टिकवायचे असल्यास एम. ए. पी. या तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. सीताफळ गरामध्ये मोठ्या प्रमाणावर पौष्टिक घटक आहेत. त्यामुळे आखाती देशांमध्ये भरपूर मागणी आहे. सीताफळाच्या गरावर प्रक्रिया केली, तर एक वर्षापर्यंत टिकवता येते. सीताफळापासून रबडी, गर, श्रीखंड, विविध पेय, आईसक्रीम, चॉकलेट, कॉफी असे अनेक पदार्थ तयार करता येऊ शकतात.’’
‘केव्हिके’चे प्रकल्प संचालक विजय अण्णा बोराडे यांच्यासह कृषि उपसंचालक विजय माईनकर, कृषि विस्तार सेवेतील कर्मचारी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
जालना : ‘‘सीताफळ बागांचे व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने करावा’’, असा सल्ला महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विनय सुपे यांनी दिला.
कृषि विज्ञान केंद्र, खरपुडी जालना अंतर्गत कृषि विज्ञान मंडळाचे २७७ वे मासिक चर्चासत्र शनिवारी ( ता.५) आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रात ‘सीताफळ बागांचे व्यवस्थापन’ यावर डॉ. सुपे बोलत होते. ‘केव्हिके’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने उपस्थित होते.
डॉ. सुपे म्हणाले, ‘‘सध्याच्या परिस्थितीचा विचार करता बागेची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. बागेत पडलेली पाने, काळी रोगट फळे, झाडावर लटकलेली काळी फळे बागेबाहेर नेऊन त्यांची योग्य विल्हेवाट लावावी. बहराचे नियोजन करताना झाडांमध्ये व मोकळ्या जागेत पालापाचोळ्याचे आच्छादन करावे. बागेत खेळती हवा व स्वच्छ सूर्यप्रकाश येईल याकडे लक्ष द्यावे. सूर्यप्रकाश हा फळांच्या वाढीतील मुख्य घटक आहे. पानांवरील ठिपके या रोगाच्या नियंत्रणासाठी शिफारशी नुसार नियोजन करावे.’’
डॉ. सोनुने म्हणाले, ‘‘जिल्ह्यात सीताफळ लागवड मोठ्या प्रमाणात होत असून सीताफळ बागामधील व्यवस्थापन व मूल्यवर्धन करून मार्केटिंग करणे आवश्यक आहे.’’
शास्त्रज्ञ डॉ. एस. एम. सोनकांबळे म्हणाले, ‘‘सीताफळ हे लवकर परिपक्व होते. त्याला टिकवणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यावर प्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे. सीताफळाला १५ दिवस टिकवायचे असल्यास एम. ए. पी. या तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. सीताफळ गरामध्ये मोठ्या प्रमाणावर पौष्टिक घटक आहेत. त्यामुळे आखाती देशांमध्ये भरपूर मागणी आहे. सीताफळाच्या गरावर प्रक्रिया केली, तर एक वर्षापर्यंत टिकवता येते. सीताफळापासून रबडी, गर, श्रीखंड, विविध पेय, आईसक्रीम, चॉकलेट, कॉफी असे अनेक पदार्थ तयार करता येऊ शकतात.’’
‘केव्हिके’चे प्रकल्प संचालक विजय अण्णा बोराडे यांच्यासह कृषि उपसंचालक विजय माईनकर, कृषि विस्तार सेवेतील कर्मचारी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
[ad_2]
Source link