[ad_1]
सोलापूर ः निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबई, पुण्यासह अनेक भागात मोठा फटका बसला. दरम्यान, जिल्ह्यात मात्र गेल्या दोन दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाची हलकी हजेरी लागली. याशिवाय या वादळवाऱ्याचा तेवढा परिणाम जाणवला नाही. दिवसभर नुसता सोसाट्याच्या वारा सुटतो आहे. पंढरपूर, माढा, करमाळ्यात काही प्रमाणात त्याचा फटका बसला.
या चक्रीवादळाच्या झळा जिल्ह्याला तेवढ्या प्रमाणात बसल्या नाहीत. पण, गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात चांगलाच बदल झाला आहे. दिवसभर सातत्याने सोसाट्याचा वारा सुटत आहे. दुपारी एकीकडे तीव्र ऊनाने प्रचंड उकाडा आणि मध्येच वादळवाऱ्यामुळे वातावरणाचा नूर बदलत आहे. वाऱ्याचा काहीही परिणाम अद्याप तरी झालेला नाही.
दरम्यान, सोमवारपासून बुधवारी (ता.३) रात्रीपर्यंत सलग तीन दिवसांत पंढरपूर, मोहोळ, माढा, करमाळ्याच्या काही भागात पूर्वमोसमी पावसाने हलकी हजेरी लावली. दिवसभराच्या वादळवाऱ्याच्या वातावरणानंतर रात्रीच्या या पावसाने काहीठिकाणी शेतमालाचे नुकसान झाले आहे.
पंढरपूर तालुक्यातील बार्डी येथील दशरथ बनकर यांच्या काढणीस आलेल्या अडीच एकरच्या खरबूजाचा प्लॅाट पूर्णपणे खराब झाला. कूसूर (ता.दक्षिण सोलापूर) भागात परवा काही घरावरील पत्रे उडाले. बार्शी तालुक्यातील गौडगाव, वैराग भाग, उत्तर सोलापुरातील नान्नज, मार्डी भागात वीजेचा लपंडाव सुरु राहिला. सध्या या भागात पाणी टंचाई आहे. त्यात वीज गेल्याने ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल झाले.
नियंत्रण कक्ष नावालाच
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाऊस आणि खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापला आहे. पण, सध्या जिल्हा प्रशासनाचे सर्व लक्ष कोरोना नियंत्रणावर आहे. गेल्या काही दिवसापासून बरेचसे अधिकारी, कर्मचारी याच कामावर असल्याने या कक्षाचे कामकाज अद्याप पुरेशा कार्यक्षमतेने सुरु नाही.
सोलापूर ः निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबई, पुण्यासह अनेक भागात मोठा फटका बसला. दरम्यान, जिल्ह्यात मात्र गेल्या दोन दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाची हलकी हजेरी लागली. याशिवाय या वादळवाऱ्याचा तेवढा परिणाम जाणवला नाही. दिवसभर नुसता सोसाट्याच्या वारा सुटतो आहे. पंढरपूर, माढा, करमाळ्यात काही प्रमाणात त्याचा फटका बसला.
या चक्रीवादळाच्या झळा जिल्ह्याला तेवढ्या प्रमाणात बसल्या नाहीत. पण, गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात चांगलाच बदल झाला आहे. दिवसभर सातत्याने सोसाट्याचा वारा सुटत आहे. दुपारी एकीकडे तीव्र ऊनाने प्रचंड उकाडा आणि मध्येच वादळवाऱ्यामुळे वातावरणाचा नूर बदलत आहे. वाऱ्याचा काहीही परिणाम अद्याप तरी झालेला नाही.
दरम्यान, सोमवारपासून बुधवारी (ता.३) रात्रीपर्यंत सलग तीन दिवसांत पंढरपूर, मोहोळ, माढा, करमाळ्याच्या काही भागात पूर्वमोसमी पावसाने हलकी हजेरी लावली. दिवसभराच्या वादळवाऱ्याच्या वातावरणानंतर रात्रीच्या या पावसाने काहीठिकाणी शेतमालाचे नुकसान झाले आहे.
पंढरपूर तालुक्यातील बार्डी येथील दशरथ बनकर यांच्या काढणीस आलेल्या अडीच एकरच्या खरबूजाचा प्लॅाट पूर्णपणे खराब झाला. कूसूर (ता.दक्षिण सोलापूर) भागात परवा काही घरावरील पत्रे उडाले. बार्शी तालुक्यातील गौडगाव, वैराग भाग, उत्तर सोलापुरातील नान्नज, मार्डी भागात वीजेचा लपंडाव सुरु राहिला. सध्या या भागात पाणी टंचाई आहे. त्यात वीज गेल्याने ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल झाले.
नियंत्रण कक्ष नावालाच
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाऊस आणि खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापला आहे. पण, सध्या जिल्हा प्रशासनाचे सर्व लक्ष कोरोना नियंत्रणावर आहे. गेल्या काही दिवसापासून बरेचसे अधिकारी, कर्मचारी याच कामावर असल्याने या कक्षाचे कामकाज अद्याप पुरेशा कार्यक्षमतेने सुरु नाही.
[ad_2]
Source link