[ad_1]
पुणे : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आलेले आहेत. लक्ष्यांक केव्हाच संपल्याने योजनेचे संकेतस्थळ बंद करण्यात आले आहे, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
वीजटंचाई, रात्रीच्या वेळी होणारा विजेचा पुरवठा यामुळे शेतकऱ्यांना सौर कृषिपंप आता जास्त सोयीचा वाटतो. यंदा चांगल्या मॉन्सूनमुळे राज्यभरातील जलाशये भरलेली असून, पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे सौरपंप बसविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अजून वाढते आहे. मात्र या स्थितीत सौर कृषिपंप योजनेसाठी अर्ज करता येत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. बहुतेक शेतकरी अनुदानाची वाट न बघता स्वखर्चाने सौरपंप बसवत आहेत.
१.१० लाख कोटेशन वाटले
‘महावितरण’च्या म्हणण्यानुसार, या योजनेसाठी केवळ एक लाख पंप वाटले जाणार होते. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले असता दोन लाख चार हजार शेतकऱ्यांचे अर्ज आले. मागणीच्या दुप्पट अर्ज आल्याने पेच तयार झाला होता. अर्थात, काटेकोर छाननीमध्ये निकषात बसत नसल्याच्या मुद्द्यावर ६८ हजार अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे उर्वरित अर्जांमधून एक लाख १० हजार शेतकऱ्यांना सौरपंपासाठी कोटेशन वाटण्यात आलेले आहे.
‘‘कोटेशन दिलेल्या शेतकऱ्यांना सेवा देण्याचा प्रयत्न ‘महावितरण’चा आहे. ही योजना पूर्वी तीन टप्प्यांत होती. पहिला टप्पा २५००० कनेक्शनचा, दुसरा ५० हजारांचा, तर तिसरा २५ हजारांचा होता. मात्र दुसरा व तिसरा टप्पा आता एकत्र करण्यात आलेला आहे. तीन एचपी व पाच एचपीचे काम संपले आहे. आता फक्त साडेसात एचपीचे साडेसात हजार सौरपंप बसविण्याचे काम सुरू आहे. लक्ष्यांक संपल्यामुळे संकेतस्थळ काही महिन्यांपूर्वीच बंद करण्यात आले आहे. त्यामुळे संकेतस्थळ बंद असल्याने शेतकऱ्यांनी इतर पर्याय शोधावे. कारण, केंद्र किंवा राज्य शासनाकडून नव्याने लक्ष्यांक आल्यानंतरच अर्ज स्वीकारणी सुरू होईल,’’ अशी माहिती ‘महावितरण’च्या मुख्यालयातून देण्यात आली.
गावपातळीवर गोंधळ
राज्यात गावपातळीवर योजनेबाबत कमालीचा गोंधळ उडालेला आहे. ‘‘शेतकऱ्यांना अजूनही संकेतस्थळ बंद करण्यात आल्याची माहिती नाही. त्यामुळे बहुतेक गावांमध्ये ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शेतकरी अजूनही आपले सरकार सेवा केंद्रांवर चकरा मारताना दिसतात. तसेच ही योजना मूळ केंद्राची असून, केंद्र सरकारने ‘अटल सौर कृषिपंप योजना’ असे नाव दिले आहे. राज्य सरकारने या योजनेचे नाव बदलून ‘मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना’ असे दिले आहे. अनेक गावांमध्ये या योजना वेगवेगळ्या असल्याचा समज आहे. ‘तुमचा अर्ज या योजनेत नसला तर त्या योजनेत बसवू’ अशी उत्तरे शेतकऱ्यांना मिळतात. त्यामुळे अजूनही संभ्रम वाढला आहे,’’ अशी माहिती विदर्भातील ‘महावितरण’च्याच एका अधिकाऱ्याने दिली.
प्रतिक्रिया
वीजटंचाईमुळे मी हैराण आहे. गेल्या एक वर्षापासून सोलर पंपासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचा मी प्रयत्न करतो आहे, मात्र वेबसाइट उघडत नाही. सरकारने बंद पडलेली वेबसाइट त्वरित सुरू करावी.
— विजय विष्णू हागे, शेतकरी, लाडनापूर, ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा
पुणे : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आलेले आहेत. लक्ष्यांक केव्हाच संपल्याने योजनेचे संकेतस्थळ बंद करण्यात आले आहे, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
वीजटंचाई, रात्रीच्या वेळी होणारा विजेचा पुरवठा यामुळे शेतकऱ्यांना सौर कृषिपंप आता जास्त सोयीचा वाटतो. यंदा चांगल्या मॉन्सूनमुळे राज्यभरातील जलाशये भरलेली असून, पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे सौरपंप बसविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अजून वाढते आहे. मात्र या स्थितीत सौर कृषिपंप योजनेसाठी अर्ज करता येत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. बहुतेक शेतकरी अनुदानाची वाट न बघता स्वखर्चाने सौरपंप बसवत आहेत.
१.१० लाख कोटेशन वाटले
‘महावितरण’च्या म्हणण्यानुसार, या योजनेसाठी केवळ एक लाख पंप वाटले जाणार होते. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले असता दोन लाख चार हजार शेतकऱ्यांचे अर्ज आले. मागणीच्या दुप्पट अर्ज आल्याने पेच तयार झाला होता. अर्थात, काटेकोर छाननीमध्ये निकषात बसत नसल्याच्या मुद्द्यावर ६८ हजार अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे उर्वरित अर्जांमधून एक लाख १० हजार शेतकऱ्यांना सौरपंपासाठी कोटेशन वाटण्यात आलेले आहे.
‘‘कोटेशन दिलेल्या शेतकऱ्यांना सेवा देण्याचा प्रयत्न ‘महावितरण’चा आहे. ही योजना पूर्वी तीन टप्प्यांत होती. पहिला टप्पा २५००० कनेक्शनचा, दुसरा ५० हजारांचा, तर तिसरा २५ हजारांचा होता. मात्र दुसरा व तिसरा टप्पा आता एकत्र करण्यात आलेला आहे. तीन एचपी व पाच एचपीचे काम संपले आहे. आता फक्त साडेसात एचपीचे साडेसात हजार सौरपंप बसविण्याचे काम सुरू आहे. लक्ष्यांक संपल्यामुळे संकेतस्थळ काही महिन्यांपूर्वीच बंद करण्यात आले आहे. त्यामुळे संकेतस्थळ बंद असल्याने शेतकऱ्यांनी इतर पर्याय शोधावे. कारण, केंद्र किंवा राज्य शासनाकडून नव्याने लक्ष्यांक आल्यानंतरच अर्ज स्वीकारणी सुरू होईल,’’ अशी माहिती ‘महावितरण’च्या मुख्यालयातून देण्यात आली.
गावपातळीवर गोंधळ
राज्यात गावपातळीवर योजनेबाबत कमालीचा गोंधळ उडालेला आहे. ‘‘शेतकऱ्यांना अजूनही संकेतस्थळ बंद करण्यात आल्याची माहिती नाही. त्यामुळे बहुतेक गावांमध्ये ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शेतकरी अजूनही आपले सरकार सेवा केंद्रांवर चकरा मारताना दिसतात. तसेच ही योजना मूळ केंद्राची असून, केंद्र सरकारने ‘अटल सौर कृषिपंप योजना’ असे नाव दिले आहे. राज्य सरकारने या योजनेचे नाव बदलून ‘मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना’ असे दिले आहे. अनेक गावांमध्ये या योजना वेगवेगळ्या असल्याचा समज आहे. ‘तुमचा अर्ज या योजनेत नसला तर त्या योजनेत बसवू’ अशी उत्तरे शेतकऱ्यांना मिळतात. त्यामुळे अजूनही संभ्रम वाढला आहे,’’ अशी माहिती विदर्भातील ‘महावितरण’च्याच एका अधिकाऱ्याने दिली.
प्रतिक्रिया
वीजटंचाईमुळे मी हैराण आहे. गेल्या एक वर्षापासून सोलर पंपासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचा मी प्रयत्न करतो आहे, मात्र वेबसाइट उघडत नाही. सरकारने बंद पडलेली वेबसाइट त्वरित सुरू करावी.
— विजय विष्णू हागे, शेतकरी, लाडनापूर, ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा
[ad_2]
Source link