[ad_1]
बुलडाणा : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची केंद्र सरकार दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ रविवारी (ता. १३) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोबाईल टॉवर तोडो आंदोलन केले. पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक करून हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. केंद्र सरकारने दखल न घेतल्यास राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा या वेळी विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी बोलताना दिला.
गेल्या सतरा दिवसांपासून कृषी कायद्याविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन सुरू असताना केंद्र सरकारने अद्यापही दखल घेतली नाही. या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असताना सरकारने हे आंदोलन बेदखल केले. केंद्र सरकारच्या या आडमुठ्या धोरणाचा निषेध करण्यासाठी सकाळी सात वाजताच स्वाभिमानचे कार्यकर्ते संग्रामपूर- जळगाव रस्त्यावर असलेल्या सावळ्या फाट्याजवळील जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवरजवळ पोहोचले. टॉवर तोडणे सुरू करीत असताना पोलिसांचा ताफा तेथे तत्काळ पोहोचला.
पोलिसानी कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले. या आंदोलनात ‘स्वाभिमानी’चे युवा जिल्हाध्यक्ष अनंता मानकर, तेजराव लोणे, आशिष नांदोकार, नयन इंगळे, सुपडा सोनोने, आशिष सावळे, शिवा पवार, प्रवीण येणकर, वैभव मुरुख, श्याम ठाकरे,अनुप देशमुख, विशाल गव्हाळे, भगवान तांदळे, गजानन मसुरकार, गोलू पाटील यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
बुलडाणा : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची केंद्र सरकार दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ रविवारी (ता. १३) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोबाईल टॉवर तोडो आंदोलन केले. पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक करून हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. केंद्र सरकारने दखल न घेतल्यास राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा या वेळी विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी बोलताना दिला.
गेल्या सतरा दिवसांपासून कृषी कायद्याविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन सुरू असताना केंद्र सरकारने अद्यापही दखल घेतली नाही. या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असताना सरकारने हे आंदोलन बेदखल केले. केंद्र सरकारच्या या आडमुठ्या धोरणाचा निषेध करण्यासाठी सकाळी सात वाजताच स्वाभिमानचे कार्यकर्ते संग्रामपूर- जळगाव रस्त्यावर असलेल्या सावळ्या फाट्याजवळील जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवरजवळ पोहोचले. टॉवर तोडणे सुरू करीत असताना पोलिसांचा ताफा तेथे तत्काळ पोहोचला.
पोलिसानी कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले. या आंदोलनात ‘स्वाभिमानी’चे युवा जिल्हाध्यक्ष अनंता मानकर, तेजराव लोणे, आशिष नांदोकार, नयन इंगळे, सुपडा सोनोने, आशिष सावळे, शिवा पवार, प्रवीण येणकर, वैभव मुरुख, श्याम ठाकरे,अनुप देशमुख, विशाल गव्हाळे, भगवान तांदळे, गजानन मसुरकार, गोलू पाटील यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
[ad_2]
Source link