सोलापूर : राज्यभरात परतीच्या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. तर यापूर्वी अतिवृष्टी व पुरामुळेही तब्बल २७ हजार कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. जुलै ते सप्टेंबर या काळातील नुकसानीचे एकत्रित पंचनामे करुन अहवाल तत्काळ सादर करावा, असे आदेश मदत व पुनर्वसन विभागाने दिले आहेत. तर केंद्र सरकारने भरपाईसाठी ‘एनडीआरएफ’मधून मदत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
अतिवृष्टी, पूर, परतीचा मोठा पाऊस झाल्याने राज्यातील १७ जिल्ह्यांमधील ७० हजारांहून अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सोयाबीन, तूर, कांदा, टोमॅटो, कापूस, ऊस या पिकांसह फळबागांचा समावेश आहे. तरीही काही जिल्ह्यांमध्ये नुकसान होऊनही पंचनाम्याला सुरुवात झालेली नाही. काही दिवसांत कारखान्याला जाणारा ऊस, नुकतीच लागवड केलेले टोमॅटो, कांदे पावसात वाहून गेले. तर अनेक ठिकाणी फळबागा झोपल्याचे चित्र आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले आहे. मात्र, राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याने केंद्र सरकारने ‘एनडीआरएफ’मधून मदत द्यावी, अशी मागणीही करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
ठळक बाबी…
- राज्यातील १७ जिल्ह्यांना अतिवृष्टी, पूर, पावसाचा तडाखा
- प्राथमिक अंदाजानुसार ७८ हजारांहून अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान
- नुकसानीचे पंचनामे अहवाल एकत्रित सादर करण्याचे विभागीय आयुक्तांना पत्र
- जुलै ते सप्टेंबरपर्यंतचे एकत्रित पंचनामे करण्याचे आदेश
- कोरोना अन् पावसामुळे पंचनामे अपूर्णच
- ३३ टक्क्यांहून अधिक नुकसानीसाठी केंद्राकडे मागितली मदत
प्रतिक्रिया
पावसामुळे ज्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे, त्यांना राज्य व केंद्र सरकारकडून मदत दिली जाणार आहे. नुकसानीचे पंचनामे अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकसानग्रस्तांना ‘एडीआरएफ’मधून मदत मिळावी, असा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला जाईल.
– सुभाष उमराणीकर, उपसचिव, मदत व पुनर्वसन, मुंबई


सोलापूर : राज्यभरात परतीच्या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. तर यापूर्वी अतिवृष्टी व पुरामुळेही तब्बल २७ हजार कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. जुलै ते सप्टेंबर या काळातील नुकसानीचे एकत्रित पंचनामे करुन अहवाल तत्काळ सादर करावा, असे आदेश मदत व पुनर्वसन विभागाने दिले आहेत. तर केंद्र सरकारने भरपाईसाठी ‘एनडीआरएफ’मधून मदत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
अतिवृष्टी, पूर, परतीचा मोठा पाऊस झाल्याने राज्यातील १७ जिल्ह्यांमधील ७० हजारांहून अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सोयाबीन, तूर, कांदा, टोमॅटो, कापूस, ऊस या पिकांसह फळबागांचा समावेश आहे. तरीही काही जिल्ह्यांमध्ये नुकसान होऊनही पंचनाम्याला सुरुवात झालेली नाही. काही दिवसांत कारखान्याला जाणारा ऊस, नुकतीच लागवड केलेले टोमॅटो, कांदे पावसात वाहून गेले. तर अनेक ठिकाणी फळबागा झोपल्याचे चित्र आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले आहे. मात्र, राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याने केंद्र सरकारने ‘एनडीआरएफ’मधून मदत द्यावी, अशी मागणीही करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
ठळक बाबी…
- राज्यातील १७ जिल्ह्यांना अतिवृष्टी, पूर, पावसाचा तडाखा
- प्राथमिक अंदाजानुसार ७८ हजारांहून अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान
- नुकसानीचे पंचनामे अहवाल एकत्रित सादर करण्याचे विभागीय आयुक्तांना पत्र
- जुलै ते सप्टेंबरपर्यंतचे एकत्रित पंचनामे करण्याचे आदेश
- कोरोना अन् पावसामुळे पंचनामे अपूर्णच
- ३३ टक्क्यांहून अधिक नुकसानीसाठी केंद्राकडे मागितली मदत
प्रतिक्रिया
पावसामुळे ज्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे, त्यांना राज्य व केंद्र सरकारकडून मदत दिली जाणार आहे. नुकसानीचे पंचनामे अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकसानग्रस्तांना ‘एडीआरएफ’मधून मदत मिळावी, असा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला जाईल.
– सुभाष उमराणीकर, उपसचिव, मदत व पुनर्वसन, मुंबई