• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
Sunday, April 18, 2021
आम्ही कास्तकार Logo
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी सल्ला
  • हवामान अंदाज
  • पीक व्यवस्थापन
  • शेतीविषयक योजना
    • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड
    • सौर कृषी पंप योजना
    • इतर योजना
  • कृषिपूरक
    • कुक्कुट पालन
    • मत्स्य व्यवसाय
    • शेळी पालन
    • इतर कृषिपूरक
    • कृषी प्रक्रिया
    • तंत्रज्ञान
  • शेती पिके
    • धान्य
    • भाजीपाला
    • नगदी पिके
    • फळे
    • फुले
  • इतर माहिती
    • बाजारभाव
    • यशोगाथा
    • शासन निर्णय
    • व्हिडिओ
    • संधी
    • Telegram Group
    • आमचे इतर प्रकल्प
      • हवामान अंदाज आणि बातम्या
      • हवामान अंदाज.इन
      • आम्ही कास्तकार.कॉम
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी सल्ला
  • हवामान अंदाज
  • पीक व्यवस्थापन
  • शेतीविषयक योजना
    • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड
    • सौर कृषी पंप योजना
    • इतर योजना
  • कृषिपूरक
    • कुक्कुट पालन
    • मत्स्य व्यवसाय
    • शेळी पालन
    • इतर कृषिपूरक
    • कृषी प्रक्रिया
    • तंत्रज्ञान
  • शेती पिके
    • धान्य
    • भाजीपाला
    • नगदी पिके
    • फळे
    • फुले
  • इतर माहिती
    • बाजारभाव
    • यशोगाथा
    • शासन निर्णय
    • व्हिडिओ
    • संधी
    • Telegram Group
    • आमचे इतर प्रकल्प
      • हवामान अंदाज आणि बातम्या
      • हवामान अंदाज.इन
      • आम्ही कास्तकार.कॉम
No Result
View All Result
आम्ही कास्तकार logo
No Result
View All Result

कायदे रद्द करण्याबाबत ठोस प्रस्ताव द्यावा : शेतकरी संघटना

Team आम्ही कास्तकार by Team आम्ही कास्तकार
24 December 2020
in बातम्या
2 min read
0


नवी दिल्ली : तीन कृषी कायदे रद्द करण्यासह अन्य मागण्यांवर गेले २८ दिवस ठाम असलेले आंदोलनकर्ते शेतकरी व ‘तेवढे सोडून बोला’ या भूमिकेवर ताठर असलेले सरकार यांच्यातील तिढा नजीकच्या काळात सुटण्याची शक्‍यता नसल्याचे बुधवारी (ता. २३) पुन्हा स्पष्ट झाले. ‘‘सरकारच्या प्रस्तावात वेगळे काहीच नाही. पुन्हा चर्चा सुरू करायची असेल तर सरकारने कायदे रद्द करण्यासह शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत स्वच्छ मनाने नवा ठोस प्रस्ताव लेखी द्यावा,’’ अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे.

सरकारने पाठविलेल्या चर्चेच्या ताज्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी ४० शेतकरी नेत्यांची बैठक सिंघू सीमेवर झाली. त्यानंतर दर्शन पाल, जगदीपसिंग डल्लेवाल, शिवकुमार कक्काजी, योगेंद्र यादव, हनन मौला, राजिंदरसिंग आदी नेत्यांनी सांगितले,

की संयुक्त शेतकरी संघर्ष समिती आघाडीकडून कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव विवेक अग्रवाल यांच्या नावे सरकारच्या प्रस्तावाला येत्या २ दिवसांत उत्तर पाठविले जाईल असे सांगितले. कायद्यात दुरुस्त्या वगैरे आम्हाला मान्य नाही व ही मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन चालूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त येत्या २५ डिसेंबरला अवध भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधून तीन कृषी कायद्यांबाबतची भूमिका मांडतील. शेतकऱ्यांच्या वतीने सरकारला चर्चेच्या पुढच्या तारखेबद्दल काहीही कळविण्यात आले नसल्याचेही स्पष्टीकरण शेतकरी नेत्यांनी दिले. सरकार हे प्रकरण ताणून धरत आहे. नवे कायदे म्हणजे भांडवलदारी शक्तींना कृषी क्षेत्रात घुसण्यासाठी मोकळे रान देण्याचे कटकारस्थान असल्याचे आम्ही गृहमंत्री अमित शहा यांनाही सांगितले होते असे सांगून शेतकरी नेते म्हणाले, की आंदोलक शेतकरी सोडून इतरांशी जाणीवपूर्वक चर्चा करून सरकार आंदोलनात फूट पडल्याचे जे भासवीत आहे ते निषेधार्ह आहे. आंदोलकांना राजकीय विरोधक न समजता कायद्यांमुळे अन्याय झालेले शेतकरी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यांवर बसले आहेत याची सरकारने जाणीव ठेवावी.

पत्रातील ठळक मुद्दे ः

  • संयुक्त शेतकरी समितीने दर्शन पाल यांच्या सहीने पाठविलेले पत्र व त्यातील मुद्दे सर्व नेत्यांनी एकमताने घेतले आहेत. त्यावर शंकाकुशंका व्यक्त करणे सरकारचे कामच नाही.
  • भारत सरकारने या शांततापूर्ण आंदोलनाला बदनाम करण्याचे व कुतर्क लढविण्याचे प्रकार सुरू आहेत हे निषेधार्ह आहे.
  • यापूर्वीच्या चर्चेत सरकारने मूळ मागण्यांना भिडण्याची हिंमत न दाखवता चलाखी व कुतर्कच दिले आहेत.
  • ज्यांचा आंदोलनाशी काडीचा संबंध नाही अशा कथित शेतकरी नेत्यांशी व कागदावरील संघटनांशी चर्चा करून आंदोलनात फूट पाडण्याचे प्रयत्न करत आहे. हे गैर आहे.
  • तीन कृषी कायदे रद्द का करावेत याबाबत शेतकऱ्यांचा नेमका तर्क व मते ऐकून घेण्यासही हे सरकार तयार नाही हे विचित्र आहे.
  • सर्व पिकांना ५० टक्के हमीभावाची (एमएसपी) खात्री देणाऱ्या, वीज अधिनियम दुरुस्तीबाबतच्या प्रस्तावित कायद्याचा मसुदा पाठविला तर शेतकरी संघटना त्वरित त्याचे उत्तर देतील.

आंदोलनाच्या आघाडीवर

  • कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी बुधवारी (ता. २३) पुन्हा चर्चेचे आवाहन केले.
  • तोमर यांना २० राज्यांतील शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांना पाठिंबा असल्याची पत्रे दिली. यावर तीन लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे तोमर म्हणाले.
  • हे कायदे शेतकऱ्यांच्या पूर्ण हिताचे असल्याने आम्ही त्यांना पाठिंबा देतो असे या शेतकऱ्यांनी म्हटल्याचा तोमर यांचा दावा.
  • नोएडातील शेतकऱ्यांनी सरकार व पंतप्रधानांना स्वतःच्या रक्ताने सह्या केलेली पत्रे पाठविण्याचे आवाहन केले.
  • – चिल्ला सीमेवर सरकारला सद्‍बुद्धी द्यावी यासाठी होमहवन व मंत्रपाठ.
News Item ID: 
820-news_story-1608736886-awsecm-440
Mobile Device Headline: 
कायदे रद्द करण्याबाबत ठोस प्रस्ताव द्यावा : शेतकरी संघटना
Appearance Status Tags: 
Mukhya News
Site Section Tags: 
बातम्या
Make concrete proposals for repeal of laws: Farmers AssociationMake concrete proposals for repeal of laws: Farmers Association
Mobile Body: 

नवी दिल्ली : तीन कृषी कायदे रद्द करण्यासह अन्य मागण्यांवर गेले २८ दिवस ठाम असलेले आंदोलनकर्ते शेतकरी व ‘तेवढे सोडून बोला’ या भूमिकेवर ताठर असलेले सरकार यांच्यातील तिढा नजीकच्या काळात सुटण्याची शक्‍यता नसल्याचे बुधवारी (ता. २३) पुन्हा स्पष्ट झाले. ‘‘सरकारच्या प्रस्तावात वेगळे काहीच नाही. पुन्हा चर्चा सुरू करायची असेल तर सरकारने कायदे रद्द करण्यासह शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत स्वच्छ मनाने नवा ठोस प्रस्ताव लेखी द्यावा,’’ अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे.

सरकारने पाठविलेल्या चर्चेच्या ताज्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी ४० शेतकरी नेत्यांची बैठक सिंघू सीमेवर झाली. त्यानंतर दर्शन पाल, जगदीपसिंग डल्लेवाल, शिवकुमार कक्काजी, योगेंद्र यादव, हनन मौला, राजिंदरसिंग आदी नेत्यांनी सांगितले,

की संयुक्त शेतकरी संघर्ष समिती आघाडीकडून कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव विवेक अग्रवाल यांच्या नावे सरकारच्या प्रस्तावाला येत्या २ दिवसांत उत्तर पाठविले जाईल असे सांगितले. कायद्यात दुरुस्त्या वगैरे आम्हाला मान्य नाही व ही मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन चालूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त येत्या २५ डिसेंबरला अवध भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधून तीन कृषी कायद्यांबाबतची भूमिका मांडतील. शेतकऱ्यांच्या वतीने सरकारला चर्चेच्या पुढच्या तारखेबद्दल काहीही कळविण्यात आले नसल्याचेही स्पष्टीकरण शेतकरी नेत्यांनी दिले. सरकार हे प्रकरण ताणून धरत आहे. नवे कायदे म्हणजे भांडवलदारी शक्तींना कृषी क्षेत्रात घुसण्यासाठी मोकळे रान देण्याचे कटकारस्थान असल्याचे आम्ही गृहमंत्री अमित शहा यांनाही सांगितले होते असे सांगून शेतकरी नेते म्हणाले, की आंदोलक शेतकरी सोडून इतरांशी जाणीवपूर्वक चर्चा करून सरकार आंदोलनात फूट पडल्याचे जे भासवीत आहे ते निषेधार्ह आहे. आंदोलकांना राजकीय विरोधक न समजता कायद्यांमुळे अन्याय झालेले शेतकरी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यांवर बसले आहेत याची सरकारने जाणीव ठेवावी.

पत्रातील ठळक मुद्दे ः

  • संयुक्त शेतकरी समितीने दर्शन पाल यांच्या सहीने पाठविलेले पत्र व त्यातील मुद्दे सर्व नेत्यांनी एकमताने घेतले आहेत. त्यावर शंकाकुशंका व्यक्त करणे सरकारचे कामच नाही.
  • भारत सरकारने या शांततापूर्ण आंदोलनाला बदनाम करण्याचे व कुतर्क लढविण्याचे प्रकार सुरू आहेत हे निषेधार्ह आहे.
  • यापूर्वीच्या चर्चेत सरकारने मूळ मागण्यांना भिडण्याची हिंमत न दाखवता चलाखी व कुतर्कच दिले आहेत.
  • ज्यांचा आंदोलनाशी काडीचा संबंध नाही अशा कथित शेतकरी नेत्यांशी व कागदावरील संघटनांशी चर्चा करून आंदोलनात फूट पाडण्याचे प्रयत्न करत आहे. हे गैर आहे.
  • तीन कृषी कायदे रद्द का करावेत याबाबत शेतकऱ्यांचा नेमका तर्क व मते ऐकून घेण्यासही हे सरकार तयार नाही हे विचित्र आहे.
  • सर्व पिकांना ५० टक्के हमीभावाची (एमएसपी) खात्री देणाऱ्या, वीज अधिनियम दुरुस्तीबाबतच्या प्रस्तावित कायद्याचा मसुदा पाठविला तर शेतकरी संघटना त्वरित त्याचे उत्तर देतील.

आंदोलनाच्या आघाडीवर

  • कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी बुधवारी (ता. २३) पुन्हा चर्चेचे आवाहन केले.
  • तोमर यांना २० राज्यांतील शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांना पाठिंबा असल्याची पत्रे दिली. यावर तीन लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे तोमर म्हणाले.
  • हे कायदे शेतकऱ्यांच्या पूर्ण हिताचे असल्याने आम्ही त्यांना पाठिंबा देतो असे या शेतकऱ्यांनी म्हटल्याचा तोमर यांचा दावा.
  • नोएडातील शेतकऱ्यांनी सरकार व पंतप्रधानांना स्वतःच्या रक्ताने सह्या केलेली पत्रे पाठविण्याचे आवाहन केले.
  • – चिल्ला सीमेवर सरकारला सद्‍बुद्धी द्यावी यासाठी होमहवन व मंत्रपाठ.
English Headline: 
Agriculture news in Marathi Make concrete proposals for repeal of laws: Farmers Association
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
आंदोलन agitation सरकार government योगेंद्र यादव मंत्रालय नरेंद्र मोदी narendra modi अटलबिहारी वाजपेयी atal bihari vajpayee कटक भारत संघटना unions हमीभाव minimum support price वीज नोएडा
Search Functional Tags: 
आंदोलन, agitation, सरकार, Government, योगेंद्र यादव, मंत्रालय, नरेंद्र मोदी, Narendra Modi, अटलबिहारी वाजपेयी, Atal Bihari Vajpayee, कटक, भारत, संघटना, Unions, हमीभाव, Minimum Support Price, वीज, नोएडा
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Make concrete proposals for repeal of laws: Farmers Association
Meta Description: 
Make concrete proposals for repeal of laws: Farmers Association
तीन कृषी कायदे रद्द करण्यासह अन्य मागण्यांवर गेले २८ दिवस ठाम असलेले आंदोलनकर्ते शेतकरी व ‘तेवढे सोडून बोला’ या भूमिकेवर ताठर असलेले सरकार यांच्यातील तिढा नजीकच्या काळात सुटण्याची शक्‍यता नसल्याचे बुधवारी (ता. २३) पुन्हा स्पष्ट झाले.



Source link

READ ALSO

तूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021

आपण कोठूनही सलाखांच्या मागे जाऊ नये म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा!

Tags: Agriculture Marathi NewsAgriculture NewsAgriculture News MarathiFarming News MarathiFarming News Update MarathiMarathi Agri NewsMarathi Agri News Update

Related Posts

तूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती चे मंडी रेट 18 April 2021
बाजारभाव

तूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021

18 April 2021
आपण कोठूनही सलाखांच्या मागे जाऊ नये म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा!
बातम्या

आपण कोठूनही सलाखांच्या मागे जाऊ नये म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा!

18 April 2021
निळ्या हिरव्या शैवालमुळे खरीप पिकांचे उत्पादन वाढेल, त्याबद्दल सर्व काही जाणून घ्या….
बातम्या

निळ्या हिरव्या शैवालमुळे खरीप पिकांचे उत्पादन वाढेल, त्याबद्दल सर्व काही जाणून घ्या….

17 April 2021
आजची ताजी माहिती शेतीशी संबंधित
बातम्या

आजची ताजी माहिती शेतीशी संबंधित

17 April 2021
संसर्ग झाल्यानंतरही अहवाल नकारात्मक येत आहे, हे का होत आहे ते जाणून घ्या.
बातम्या

संसर्ग झाल्यानंतरही अहवाल नकारात्मक येत आहे, हे का होत आहे ते जाणून घ्या.

17 April 2021
खोल नांगरण्याचे फायदे आणि मातीच्या सोलरायझेशनच्या प्रक्रियेचे फायदे जाणून घ्या
बातम्या

खोल नांगरण्याचे फायदे आणि मातीच्या सोलरायझेशनच्या प्रक्रियेचे फायदे जाणून घ्या

17 April 2021
Next Post

साखरनिर्यात करारात उत्तर प्रदेशची आघाडी

लेखी आश्‍वासनानंतर उपोषण मागे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result
Currently Playing

LATEST NEWS UPDATES

तूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती चे मंडी रेट 18 April 2021

तूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021

18 April 2021
वृद्ध पेंशन योजना बिहार लाभार्थी स्थिती

वृद्ध पेंशन योजना बिहार लाभार्थी स्थिती

18 April 2021
(अनुप्रयोग फॉर्म) हिमाचल प्रदेश रेशन कार्ड 2021: अप्लाई ऑनलाइन, फॉर्म फॉर्म

(अनुप्रयोग फॉर्म) हिमाचल प्रदेश रेशन कार्ड 2021: अप्लाई ऑनलाइन, फॉर्म फॉर्म

18 April 2021
मृत्यू प्रमाणपत्र डाउनलोड करा, ऑनलाईन तपासा

मृत्यू प्रमाणपत्र डाउनलोड करा, ऑनलाईन तपासा

18 April 2021
रेशन कार्ड फॉर्म ऑनलाईन डाउनलोड करा

रेशन कार्ड फॉर्म ऑनलाईन डाउनलोड करा

18 April 2021
राज्यात चिकन, अंड्यांच्या दरात सुधारणा 

राज्यात चिकन, अंड्यांच्या दरात सुधारणा 

18 April 2021
राज्यात अद्याप वीस लाख टन ऊस शिल्लक 

राज्यात अद्याप वीस लाख टन ऊस शिल्लक 

18 April 2021
बाजार समित्या बंद ठेवू नका 

बाजार समित्या बंद ठेवू नका 

18 April 2021
साखर वाहतुकीसाठी क्विंटलला १०० रुपये अनुदानाचा प्रस्ताव 

साखर वाहतुकीसाठी क्विंटलला १०० रुपये अनुदानाचा प्रस्ताव 

18 April 2021
व्हर्च्युअल क्लासरूममुळे कृषी शिक्षणाची गुणवत्ता वाढणार ः तोमर 

व्हर्च्युअल क्लासरूममुळे कृषी शिक्षणाची गुणवत्ता वाढणार ः तोमर 

18 April 2021
Amhi Kastkar – आम्ही कास्तकार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy

© 2020 आम्ही कास्तकार - Managed by Pritam Sonone.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी सल्ला
  • हवामान अंदाज
  • पीक व्यवस्थापन
  • शेतीविषयक योजना
    • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड
    • सौर कृषी पंप योजना
    • इतर योजना
  • कृषिपूरक
    • कुक्कुट पालन
    • मत्स्य व्यवसाय
    • शेळी पालन
    • इतर कृषिपूरक
    • कृषी प्रक्रिया
    • तंत्रज्ञान
  • शेती पिके
    • धान्य
    • भाजीपाला
    • नगदी पिके
    • फळे
    • फुले
  • इतर माहिती
    • बाजारभाव
    • यशोगाथा
    • शासन निर्णय
    • व्हिडिओ
    • संधी
    • Telegram Group
    • आमचे इतर प्रकल्प
      • हवामान अंदाज आणि बातम्या
      • हवामान अंदाज.इन
      • आम्ही कास्तकार.कॉम

© 2020 आम्ही कास्तकार - Managed by Pritam Sonone.