मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे. सर्वांत उत्तम लस ही मास्क आहे. लस घेतल्यानंतरही मास्क वापरावा लागेल. आतापर्यंत आपण मास्क, हात धुणे आणि सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीने कोरोनाचा मुकाबला केला आहे, त्याचा विसर पडू देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी कोरोना लसीकरणाच्या राज्यस्तरीय प्रारंभ कार्यक्रमात केले.
बीकेसीतील कोरोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होऊन लसीकरण मोहिमेचा राज्यस्तरीय प्रारंभ करण्यात आला. या वेळी पहिल्या टप्प्यातील प्राधान्य गटातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. या वेळी पर्यटन तथा मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, आमदार झीशान सिद्दीकी, उपमहापौर सुहास वाडकर,
महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी, टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित आदी उपस्थित होते.
‘‘आपण खूप दिवसांपासून लस येणार असे ऐकत होतो. आज आपल्या हातात लस आहे. सर्वांच्या साक्षीने या लसीकरणाची आज सुरुवात होते; पण आपल्याला कोरोनाचा शेवट करायचा आहे, तोवर सर्व सूचनांचे कोटेकोर पालन करा. अजूनही संकट टळलेले नाही. लस आलेली असली तरी सर्वांना लस मिळेपर्यंत काही दिवस, महिने लागणार आहेत. त्यामुळे सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे,’’ असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
महापालिकेचे आयुक्त चहल यांचे मुंबईचे रक्षक आहेत. टास्क फोर्सचे डॉ. जोशी, डॉ. राहुल पंडित, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास आपल्या आरोग्य व्यवस्थेचे खांब आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
डॉ. मधुरा पाटील यांना पहिली लस
कोरोना केंद्रामधील आहारतज्ज्ञ डॉ. मधुरा पाटील यांना मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत पहिली लस घेण्याचा मान मिळाला. त्या नंतर डॉ. मनोज पाचंगे यांना लस देण्यात आली. टाळ्यांच्या गजरात कोरोना योद्ध्यांच्या लसीकरणाचा प्रारंभ झाला.


मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे. सर्वांत उत्तम लस ही मास्क आहे. लस घेतल्यानंतरही मास्क वापरावा लागेल. आतापर्यंत आपण मास्क, हात धुणे आणि सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीने कोरोनाचा मुकाबला केला आहे, त्याचा विसर पडू देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी कोरोना लसीकरणाच्या राज्यस्तरीय प्रारंभ कार्यक्रमात केले.
बीकेसीतील कोरोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होऊन लसीकरण मोहिमेचा राज्यस्तरीय प्रारंभ करण्यात आला. या वेळी पहिल्या टप्प्यातील प्राधान्य गटातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. या वेळी पर्यटन तथा मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, आमदार झीशान सिद्दीकी, उपमहापौर सुहास वाडकर,
महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी, टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित आदी उपस्थित होते.
‘‘आपण खूप दिवसांपासून लस येणार असे ऐकत होतो. आज आपल्या हातात लस आहे. सर्वांच्या साक्षीने या लसीकरणाची आज सुरुवात होते; पण आपल्याला कोरोनाचा शेवट करायचा आहे, तोवर सर्व सूचनांचे कोटेकोर पालन करा. अजूनही संकट टळलेले नाही. लस आलेली असली तरी सर्वांना लस मिळेपर्यंत काही दिवस, महिने लागणार आहेत. त्यामुळे सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे,’’ असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
महापालिकेचे आयुक्त चहल यांचे मुंबईचे रक्षक आहेत. टास्क फोर्सचे डॉ. जोशी, डॉ. राहुल पंडित, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास आपल्या आरोग्य व्यवस्थेचे खांब आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
डॉ. मधुरा पाटील यांना पहिली लस
कोरोना केंद्रामधील आहारतज्ज्ञ डॉ. मधुरा पाटील यांना मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत पहिली लस घेण्याचा मान मिळाला. त्या नंतर डॉ. मनोज पाचंगे यांना लस देण्यात आली. टाळ्यांच्या गजरात कोरोना योद्ध्यांच्या लसीकरणाचा प्रारंभ झाला.