[ad_1]
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा बॅंकेच्या १८ जागांसाठी आज (ता. २१) मतदान होत आहे. वैयक्तिक सभासद मतदारसंघातून अर्जच आला नाही. त्यामुळे व दोन जागा आधीच बिनविरोध झाल्याने जागा २१ आहेत. तरीही १८ जागांसाठीच ही निवडणूक होत आहे. दोन पॅनेलचे तब्बल ४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दिग्गजांनी कसलेली कंबर, प्रचाराचे गाजणारे फड पाहता ही निवडणूक चांगलीच रंगतदार ठरण्याची चिन्ह आहेत.
जिल्हा बॅंकेच्या २१ जागांसाठी १५ फेब्रुवारीपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. शनिवारी (ता. २०) या निवडणूकीसाठीचा प्रचार थांबला. जिल्हा बॅंकेच्या २१ जागांसाठी २२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. एकाच उमेदवाराने एकापेक्षा जास्त उमेदवारी अर्ज दाखल केल्याने विहित मुदतीत जवळपास १९४ अर्ज दाखल झाले होते. छाननीत त्यापैकी जवळपास ४२ अर्ज बाद झाले. त्यामुळे प्रत्यक्षात १५२ अर्ज छाणनीअंती कायम राहिले होते.
२४ फेब्रुवारी ते १० मार्चपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती. या निवडणुकीत प्राथमिक कृषी पतपुरवठा वि. का. सेवा सहकारी संस्था (ता. पैठण) व (ता.खुलताबाद) हे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले. शेतकरी विकास पॅनेल व शेतकरी सहकार विकास पॅनलद्वारे जिल्ह्यातील राजकीय दिग्गजांकडून निवडणुकीच्या रिंगणात प्रचाराचे फड गाजविले गेले. आपलच पॅनेल योग्य, हे सांगताना आरोप प्रत्यारोपांचा फैरीही चांगल्याच झडल्या.
या निवडणुकीसाठी १११४ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. १० केंद्रांत सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान मतदार मतदान करतील. सोमवारी मार्चला मतमोजणी होईल.
कोविड रुग्णांसाठी खास सोय
कोविड बाधित व संशयित मतदारांसाठी निर्धारित वेळेत शेवटच्या अर्ध्या तासात दुपारी ३.३० ते ४ वाजेदरम्यान मतदानाची सोय असेल. कोवीड बाधित रुग्णांना पिपीई कीट परिधान करून व संशयित रुग्णांना फेस शील्ड, मास्क व ग्लोज परिधान करून मतदान करता येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मुकेश बारहाते यांनी दिली.
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा बॅंकेच्या १८ जागांसाठी आज (ता. २१) मतदान होत आहे. वैयक्तिक सभासद मतदारसंघातून अर्जच आला नाही. त्यामुळे व दोन जागा आधीच बिनविरोध झाल्याने जागा २१ आहेत. तरीही १८ जागांसाठीच ही निवडणूक होत आहे. दोन पॅनेलचे तब्बल ४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दिग्गजांनी कसलेली कंबर, प्रचाराचे गाजणारे फड पाहता ही निवडणूक चांगलीच रंगतदार ठरण्याची चिन्ह आहेत.
जिल्हा बॅंकेच्या २१ जागांसाठी १५ फेब्रुवारीपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. शनिवारी (ता. २०) या निवडणूकीसाठीचा प्रचार थांबला. जिल्हा बॅंकेच्या २१ जागांसाठी २२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. एकाच उमेदवाराने एकापेक्षा जास्त उमेदवारी अर्ज दाखल केल्याने विहित मुदतीत जवळपास १९४ अर्ज दाखल झाले होते. छाननीत त्यापैकी जवळपास ४२ अर्ज बाद झाले. त्यामुळे प्रत्यक्षात १५२ अर्ज छाणनीअंती कायम राहिले होते.
२४ फेब्रुवारी ते १० मार्चपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती. या निवडणुकीत प्राथमिक कृषी पतपुरवठा वि. का. सेवा सहकारी संस्था (ता. पैठण) व (ता.खुलताबाद) हे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले. शेतकरी विकास पॅनेल व शेतकरी सहकार विकास पॅनलद्वारे जिल्ह्यातील राजकीय दिग्गजांकडून निवडणुकीच्या रिंगणात प्रचाराचे फड गाजविले गेले. आपलच पॅनेल योग्य, हे सांगताना आरोप प्रत्यारोपांचा फैरीही चांगल्याच झडल्या.
या निवडणुकीसाठी १११४ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. १० केंद्रांत सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान मतदार मतदान करतील. सोमवारी मार्चला मतमोजणी होईल.
कोविड रुग्णांसाठी खास सोय
कोविड बाधित व संशयित मतदारांसाठी निर्धारित वेळेत शेवटच्या अर्ध्या तासात दुपारी ३.३० ते ४ वाजेदरम्यान मतदानाची सोय असेल. कोवीड बाधित रुग्णांना पिपीई कीट परिधान करून व संशयित रुग्णांना फेस शील्ड, मास्क व ग्लोज परिधान करून मतदान करता येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मुकेश बारहाते यांनी दिली.
[ad_2]
Source link