[ad_1]
औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबध्द आहे. औरंगाबादच्या विकासासाठी विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा मानसही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखविला.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सिध्दार्थ उद्यानातील स्मृती स्तंभाजवळ गुरुवारी (ता.१७)पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री ठाकरे हे व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून मुंबई येथून सहभागी झाले होते. स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन पालकमंत्री व मान्यवरांनी हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर पोलिस दलाकडून बँड, बिगूल वाजवून व बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ठाकरे म्हणाले, ‘‘मराठवाडा ही संतांची भूमी आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातून व त्यांनी सहन केलेल्या अत्याचारातून ही भूमी रझाकारांच्या जोखडातून मुक्त झाली. मराठवाड्यासाठी आजचा दिवस स्वातंत्र्यदिन आहे. या आंदोलनामध्ये जसा मराठवाडा सहभागी झाला होता, तसेच आपण करोनाच्या उच्चाटनासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेत सहभागी व्हावे. मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी आबालवृध्दांनी ज्या पध्दतीने रझाकारी अत्याचार मोडून टाकला, त्यापध्दतीनेच आपण कोरोना आक्रमणही परतवून लावूया.’’
‘‘मराठवाडा विकासाच्या दिशेने चालला आहे. यंदा समाधानकारक पाऊस झाला. शिवाय शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याची जबाबदारी सरकारने घेतली आहे. मुंबई ते नागपूर या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाच्या माध्यमातून मराठवाडा समृध्द होणार आहे. औरंगाबाद विकास प्राधिकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल,’’ अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.
फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार उदयसिंग राजपूत, आमदार अतुल सावे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगर पालिका प्रशासक अस्तिक कुमार पाण्डेय, पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील आदींची उपस्थिती होती. यावेळी कार्डियाक रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. सूत्रसंचालन प्रवीणा कन्नडकर यांनी केले.
औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबध्द आहे. औरंगाबादच्या विकासासाठी विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा मानसही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखविला.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सिध्दार्थ उद्यानातील स्मृती स्तंभाजवळ गुरुवारी (ता.१७)पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री ठाकरे हे व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून मुंबई येथून सहभागी झाले होते. स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन पालकमंत्री व मान्यवरांनी हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर पोलिस दलाकडून बँड, बिगूल वाजवून व बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ठाकरे म्हणाले, ‘‘मराठवाडा ही संतांची भूमी आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातून व त्यांनी सहन केलेल्या अत्याचारातून ही भूमी रझाकारांच्या जोखडातून मुक्त झाली. मराठवाड्यासाठी आजचा दिवस स्वातंत्र्यदिन आहे. या आंदोलनामध्ये जसा मराठवाडा सहभागी झाला होता, तसेच आपण करोनाच्या उच्चाटनासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेत सहभागी व्हावे. मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी आबालवृध्दांनी ज्या पध्दतीने रझाकारी अत्याचार मोडून टाकला, त्यापध्दतीनेच आपण कोरोना आक्रमणही परतवून लावूया.’’
‘‘मराठवाडा विकासाच्या दिशेने चालला आहे. यंदा समाधानकारक पाऊस झाला. शिवाय शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याची जबाबदारी सरकारने घेतली आहे. मुंबई ते नागपूर या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाच्या माध्यमातून मराठवाडा समृध्द होणार आहे. औरंगाबाद विकास प्राधिकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल,’’ अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.
फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार उदयसिंग राजपूत, आमदार अतुल सावे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगर पालिका प्रशासक अस्तिक कुमार पाण्डेय, पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील आदींची उपस्थिती होती. यावेळी कार्डियाक रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. सूत्रसंचालन प्रवीणा कन्नडकर यांनी केले.
[ad_2]
Source link