[ad_1]
नाशिक : ‘‘जिल्ह्यातील उमराणे व येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदरसुल उपबाजारात दोन वर्षांपूर्वी विक्री केलेल्या कांद्याची देयके प्रलंबित आहेत. या दरम्यान हजारो शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. त्यांना न्याय मिळवून द्या’’, अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांच्याकडे नुकतीच केली.
देवळा तालुक्यातील उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील १ हजाराहून अधिक कांदा उत्पादकांची फसवणूक झाली आहे. याबाबत दोन वर्षांपूर्वी गुन्हे दाखल करूनही शेतकऱ्यांचे अडकलेले साडेतीन कोटी रुपये अडकले आहेत. तर, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदरसुल उपबाजार येथे दीड कोटींपैकी निम्म्यावर रक्कम बाकी असल्याचे नमूद करण्यात आले.
अनेकदा याबाबत उपोषणे करूनही न्याय मिळत नसल्याचे सांगण्यात आले आहे. यावर प्रहार सातत्याने पाठपुरावा करत असून दाद मिळत नसल्याची खंत मांडण्यात आली आहे. येवला तालुक्यातील मानोरी येथील केंद्रीय राखीव पोलिस दलातील जवान दिगंबर शेळके यांचा संशयास्पद मृत्यू होऊन दोन वर्ष होऊनही अजून शवविच्छेदन अहवाल व मृत्यू दाखला मिळू शकलेला नाही. तसेच मुरुमी गावात दीड कोटींचा भ्रष्टाचार उघड होऊनही वर्ष उलटून गेले तरी अजून तपासात प्रगती नाही. परिणामी, भ्रष्टाचार करणाऱ्यांना मोकळे रान मिळत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
शिष्टमंडळात जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर, येवला तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, देवळा तालुका उपाध्यक्ष हरसिंग ठोके, संघटक किरण चरमळ, सरचिटणीस सागर गायकवाड उपस्थित होते.
‘न्याय मिळवून देणार’
प्रहारच्या शिष्टमंडळाने डॉ. दिघावकर यांची भेट घेऊन गाऱ्हाणं मांडले. त्यावेळी त्यांनी यात लक्ष घालून न्याय मिळवून देण्याची हमी दिली. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना सोडणार नसल्याची ग्वाही यावेळीं शिष्टमंडळाला दिली.
नाशिक : ‘‘जिल्ह्यातील उमराणे व येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदरसुल उपबाजारात दोन वर्षांपूर्वी विक्री केलेल्या कांद्याची देयके प्रलंबित आहेत. या दरम्यान हजारो शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. त्यांना न्याय मिळवून द्या’’, अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांच्याकडे नुकतीच केली.
देवळा तालुक्यातील उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील १ हजाराहून अधिक कांदा उत्पादकांची फसवणूक झाली आहे. याबाबत दोन वर्षांपूर्वी गुन्हे दाखल करूनही शेतकऱ्यांचे अडकलेले साडेतीन कोटी रुपये अडकले आहेत. तर, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदरसुल उपबाजार येथे दीड कोटींपैकी निम्म्यावर रक्कम बाकी असल्याचे नमूद करण्यात आले.
अनेकदा याबाबत उपोषणे करूनही न्याय मिळत नसल्याचे सांगण्यात आले आहे. यावर प्रहार सातत्याने पाठपुरावा करत असून दाद मिळत नसल्याची खंत मांडण्यात आली आहे. येवला तालुक्यातील मानोरी येथील केंद्रीय राखीव पोलिस दलातील जवान दिगंबर शेळके यांचा संशयास्पद मृत्यू होऊन दोन वर्ष होऊनही अजून शवविच्छेदन अहवाल व मृत्यू दाखला मिळू शकलेला नाही. तसेच मुरुमी गावात दीड कोटींचा भ्रष्टाचार उघड होऊनही वर्ष उलटून गेले तरी अजून तपासात प्रगती नाही. परिणामी, भ्रष्टाचार करणाऱ्यांना मोकळे रान मिळत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
शिष्टमंडळात जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर, येवला तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, देवळा तालुका उपाध्यक्ष हरसिंग ठोके, संघटक किरण चरमळ, सरचिटणीस सागर गायकवाड उपस्थित होते.
‘न्याय मिळवून देणार’
प्रहारच्या शिष्टमंडळाने डॉ. दिघावकर यांची भेट घेऊन गाऱ्हाणं मांडले. त्यावेळी त्यांनी यात लक्ष घालून न्याय मिळवून देण्याची हमी दिली. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना सोडणार नसल्याची ग्वाही यावेळीं शिष्टमंडळाला दिली.
[ad_2]
Source link