[ad_1]
बुलडाणा : हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार काही ठिकाणी अवेळी पाऊस होत आहे. त्यानुसार जिल्ह्यातही काही भागांत अवकाळी पाऊस झाला आहे. यामुळे कुठे नुकसान झाले असेल तर ७२ तासांच्या आत विमा संरक्षित पिकांबाबतची माहिती विमा कंपनीला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते. पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत सहभाग नोंदविलेल्या शेतकऱ्यांचे विमा संरक्षित क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, ढगफुटी किंवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग अशा घटनांमुळे रब्बी हंगामातील विमा संरक्षित गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, रब्बी कांदा या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
याबाबत अधिसूचित महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीस घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत त्यांच्या विमा संरक्षित पिकांचे नुकसान झालेले असल्यास नुकसानीबाबत सूचना देणे आवश्यक असून, याबाबतची सूचना संबंधित विमा कंपनी यांना देण्यात यावी.
या पर्यायांचा करा वापर
क्रॉप इन्शुरन्स ॲप (Crop Insurance App), विमा कंपनी टोल फ्री क्रमांक, विमा कंपनीचा ई-मेल, विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय, कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी कार्यालय, ज्या बँकेत विमा जमा केला ती बँक शाखा आदी ठिकाणी सूचना द्यावी. नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत आपल्या विमा संरक्षित पिकाचे नुकसान झाले असल्यास याबाबतची सूचना पिकाच्या फोटोसह संबंधित विमा कंपनीकडे विहित कालमर्यादेत सादर करावी, असे कृषी विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे. जिल्ह्यासाठी रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनी नियुक्त असून, कंपनीचा टोल फ्री क्रमांक १८००१०२४०८८ आहे व ई-मेल आयडी rgicl.pmfby@ relianceada.com आहे.
[ad_2]
Source link