अतिवृष्टी नुकसान भरपाई 2021-2022 – या 14 जिल्ह्यांच्या याद्या आल्या Ativrushti Nuksan Bharpai Yadi आली
Ativrushti Nuksan Bharpai Yadi 2021-2022: नमस्कार मित्रांनो, राज्यात सन २०२१ मध्ये अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे खूप मोठे नुकसान झाले होते. आणि त्या संदर्भात राज्य सरकारने पिकांच्या अतिवृष्टी नुकसान भरपाई साठी जिरायत साठी दहा हजार रुपये आणि बागायती शेतीसाठी १५ हजार रुपये हेक्टरी अनुदान जाहीर करण्यात आले. त्याच प्रमाणे फळबाग बागायतदारांची हेक्टरी २५ हजार रुपये Nuksan Bharpai Anudan जाहीर करण्यात आले आहे.
सर्व जिल्ह्यांच्या अतिवृष्टी याद्या आणि किती रक्कम मिळणार
अतिवृष्टी नुकसान भरपाई 2021-2022
Ativrushti Nuksan Bharpai Yadi 2021-2022
जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानिकरिता दि. ६ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये ३६५ कोटी ६७ लाख रुपये, ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ पर्यंत उद्भवलेल्या परिस्थितीमुळे बाधित शेतकऱ्यांना दि. २६ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये १४ जिल्ह्याकरिता रू. २ हजार ८६० कोटी ८४ लाख ७ हजार रुपये मंजूर करण्यात आले.
सर्व जिल्ह्यांच्या अतिवृष्टी याद्या आणि किती रक्कम मिळणार

त्याचसोबत २७ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये ९ जिल्ह्याकरीता रू. ७७४ कोटी १५ लाख ४३ हजार रुपये इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली असून मदतीचे वाटप सुरू झाले आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा करताना २१ ऑक्टोबरच्या शासन निर्णयाप्रमाणे जिरायत साठी दहा हजार रुपये प्रति हेक्टरी, बागायत साठी १५,००० रुपये प्रति हेक्टर तर फळबागा साठी २५,००० रु प्रति हेक्टर केली जाणार आहे.
सर्व जिल्ह्यांच्या अतिवृष्टी याद्या आणि किती रक्कम मिळणार