[ad_1]
नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या किसान रेल्वे (Kisan Railway) योजनेचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला झाला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, किसान रेल्वेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पाच लाख ९८ हजार ३३ टन शेतमालाची (Agri Produce) वाहतूक करण्यात आली. यापैकी ७६ टक्के शेतमालाची वाहतूक (agri Produce Transport) ही महाराष्ट्रातून झाली आहे.
हेही वाचा – जागतिक पीक उत्पादनात ५३ टक्क्यांची वाढ
किसान रेल्वेच्या माध्यमातून वाहतूक होणाऱ्या शेतमालामध्ये संत्री, कांदा, बटाटा, केळी, आंबा, टोमॅटो, पेरू, डाळिंब, सिताफळ, ढोबळी मिरची, चिकू, गाजर, लसूण या शेतमालाचा समावेश आहे. पालेभाज्या, फळे आणि इतर नाशवंत शेतमालाच्या वाहतूकीसाठी (Perishables Agri Produce Transport )केंद्रीय कृषी मंत्रालय आणि राज्य सरकारांशी चर्चा करण्यात आली. या प्रक्रियेत स्थानिक स्वराज्य संस्थांसह, एजन्सीज आणि बाजार समित्यांनाही सहभागी करण्यात आले. मागणीच्या आधारावर किसान रेल्वेसाठी प्राधान्याने रॅक पुरवण्यात पुरवले जातात.
हेही वाचा – अर्धचंद्र आकाराची शिंगे असलेली गाय
बाबा सावंत या शेतकऱ्याने हिंदू बिझनेसलाईनशी बोलताना सांगितले की, “या सेवेमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना खरोखरच मदत झाली आहे. विशेषत: कोरोना काळात काही भागांमध्ये लॉकडाऊन केल्याने केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला”.
यासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्रालयाने बुधवारी (ता.१०) दिलेल्या माहितीनुसार, “किसान रेल्वे ही एक पार्सल सेवेचा भाग आहे. चालू वर्षात अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने किसान रेलद्वारे फळे आणि भाज्यांच्या वाहतुकीसाठी अनुदान म्हणून ५० कोटींचे वाटप केले. रेल्वेने १५ जानेवारीपर्यंत अनुदान म्हणून ९८ कोटी आधीच वितरित केले आहेत”
[ad_2]
Source link