[ad_1]
Monsoon Update: राज्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचा (Rain) जोर कमालीचा वाढला आहे. राज्यातील उत्तर महाराष्ट्रात पावसाची (monsoon) तीव्रता अधिक बघायला मिळाली. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव या जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी लागली आहे.
नासिक जिल्ह्यात पावसाचा (monsoon news) जोर सर्वात जास्त आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख धरणे ओसंडून वाहत आहेत. यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्याप्रमाणेचं राज्यातील इतरही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे शेतकरी बांधवांची डोकेदुखी देखील वाढली आहे.
खरं पाहता या अतिमुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. शेतकऱ्यांच्या मते, गेल्या आठवड्याभरात झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असून आता खरीप हंगामातील पिकांची दुबार पेरणी करावी लागणार आहे.
त्यामुळे शेतकरी बांधवांचा हजारो रुपयांचा खर्च पाण्यात गेला असून अजून दुबार पेरणी करण्यासाठी हजारो रुपयांचा निधी उभारावा लागणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांची काळजाची धडधड वाढली आहे.
दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळवलेल्या पंजाबराव डख साहेबांचा नवीनतम हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaz) आता सार्वजनिक झाला आहे.
पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी वर्तवलेल्या नवीनतम सुधारित अंदाजानुसार, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांच्या मते आज पासून नाशिक जिल्ह्यात सूर्य दर्शन घडणार असून पावसाचा जोर कमी होणार आहे. राज्यातील अनेक भागांत सूर्यदर्शन घडणार आहे.
मात्र असे असले तरीही राज्यात काही ठिकाणी पाऊस कोसळणारचं आहे. उद्यापासून अर्थात 17 जुलैपासून राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता पंजाबरावांनी (Panjab Dakh Weather Report) वर्तवली आहे. पंजाबराव यांच्या मते, 17 जुलै ते 21 जुलै दरम्यान राज्यातील काही भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे.
मात्र या कालावधीत कोसळणारा पाऊस हा राज्यात सर्वदूर राहणार नाही. अर्थातचं राज्यातील काही भागातचं या कालावधीत पाऊस कोसळणार आहे. यामुळे निश्चितच राज्यातील शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे.
शेतकऱ्यांच्या मते, आता जरी पावसाची उघडीप राहणार आहे तरीदेखील या आधी झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची नासाडी झाली असून आता पावसाची उघडीप झाल्यास दुबार पेरणी करावी लागणार आहे.
[ad_2]
आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.