Havaman Andaj Today: आज व येत्या 24 तासात फक्त या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज - IMD - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Havaman Andaj Today: आज व येत्या 24 तासात फक्त या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज – IMD

0
4.5/5 - (2 votes)

Monsoon Update: राज्यात सर्वत्र आता मोसमी पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात मोसमी (Monsoon) पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने शेतकरी बांधवांची (Farmer) लगबग वाढली आहे. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव पेरणीसाठी धावपळ करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. निश्चितच या मोसमी पावसामुळे (Monsoon News) शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव बघायला मिळत आहेत.

मात्र अजूनही राज्यातील अनेक भागात अपेक्षित असा पाऊस बघायला मिळालेला नाही, अशा ठिकाणी शेतकरी बांधव अजूनही जोमदार मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यात बहुतांशी ठिकाणी शेतकरी बांधवांनी पेरणीची कामे अंतिम टप्प्यात नेली असून काही ठिकाणी पेरणीची कामे उरकली गेली आहेत. दरम्यान राजधानी मुंबई तसेच मुंबई उपनगरात मोसमी पावसाने हजेरी लावल्याने मुंबईकर सुखावला आहे.

अहमदनगर, यवतमाळ, रायगड, औरंगाबाद या जिल्ह्यातही पाऊस पडला असल्याने या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात जोरदार मोसमी पावसाची हजेरी बघायला मिळाली. यावेळी सिल्लोड तालुक्यात सर्वदूर मोसमी पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावत नाहीये. यामुळे तालुक्यात पेरणीच्या कामाला अजूनच गती मिळणार असून शेती संबंधित व्यवसाय पुन्हा एकदा नव्याने उभारी घेणार आहेत.

या ठिकाणी कोसळणार धो-धो पाऊस 

भारतीय हवामान विभागाच्या (Indian Meteorological Department) मते, रत्नागिरी जिल्ह्यात आज उद्या आणि 27 तारखेला मुसळधार त्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच नागरिकांसाठी सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. याशिवाय 28 जून पर्यंत दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनारी भागात ताशी 40 ते 50 कि.मी. ते 60 कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा देखील भारतीय हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे 28 तारखेपर्यंत मासेमारी करण्यासाठी कोणीही समुद्रात जाऊ नये असे आवाहन देखील विभागाने यावेळी केले आहे.

खरं पाहता, जुनचा पहिला पंधरवडा हा राज्यातील जनतेला पावसाविनाचं काढावा लागला होता. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात मान्सून सक्रिय झाला असल्याने आणि राज्यातील बहुतांशी ठिकाणी मोसमी पावसाने आपली उपस्थिती दाखवली असल्याने राज्यातील शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव बघायला मिळत आहेत. शिवाय राज्यात पेरणीची कामे देखील आता वेगाने होऊ लागले आहेत. शिवाय शेतीशी संबंधित उद्योगधंद्यांमध्ये देखील आता उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे.

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link