PM Kisan Yojana: या तारखेपूर्वी करा हे काम, अन्यथा तुम्ही PM किसान योजनेच्या 12 व्या हप्त्यापासून वंचित राहू शकता….
[ad_1]

PM Kisan Yojana: पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Sanman Nidhi) चा 11 वा हप्ता 31 मे 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला आहे. सरकारने 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हजार रुपये वर्ग केले आहेत.
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी दरवर्षी त्यांना सरकार (Government) कडून 6 हजार रुपये मिळतात. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये पाठवले जातात.
नियमांनुसार, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याचे पैसे 1 एप्रिल ते जुलै दरम्यान पाठवले जातात. दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान येतो, तर तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान हस्तांतरित केला जातो.
31 जुलै ही ई-केवायसी करण्याची तारीख आहे –
सरकारने सर्व शेतकऱ्यांना ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देणारी अधिसूचना जारी केली आहे. सरकारने ई-केवायसी पूर्णपणे अनिवार्य केले आहे. ई-केवायसी करण्यात शेतकरी (Farmers) निष्काळजी असेल तर तो 12व्या हप्त्यापासून वंचित राहू शकतो.
त्याचवेळी शेतकऱ्यांना आनंदाची बातमी देत, सरकारने ई-केवायसीची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया या तारखेपूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे.
ई-केवायसी कसे करावे? –
- सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
- येथे तुम्हाला फार्मर कॉर्नर दिसेल, जेथे EKYC टॅबवर क्लिक करा.
- आता एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला आधार क्रमांक (Aadhaar number) टाकावा लागेल आणि सर्च टॅबवर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरील क्रमांकावर OTP पाठवला जाईल.
- सबमिट OTP वर क्लिक करा.
- आधार नोंदणीकृत मोबाइल (Mobile) OTP प्रविष्ट करा आणि तुमचे eKYC केले जाईल.
[ad_2]
आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठीआम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.