[ad_1]
२०२० साली बेरोजगारीमुळे (Unemployment) ३५४८ लोकांनी आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यसभेत ही माहिती दिली आहे. कोरोना महामारी आणि टाळेबंदीमुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचा सरकारचा दावा आहे.
२०१९ साली बेरोजगारीमुळे आत्महत्या (Suicides due to unemployment) करणाऱ्यांची संख्या २८५१ होती, २०१८ साली २७४१ लोकांनी बेरोजगारीमुळे आपले आयुष्य संपवले होते. २०२० साली कर्जबाजारीपणा वा आर्थिक दिवाळे निघाल्याने ५२१३ लोकांनी आपले आयुष्य संपवले असल्याचे सरकारने सांगितले आहे.
हेही वाचा- पीएम फंडातील केवळ एक तृतीयांश रक्कम खर्च !
२०१९ साली कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करणाऱ्यांची संख्या ५९०८ होती. २०१८ साली कर्जबाजारीपणामुळे मृत्यूला कवटाळणाऱ्या लोकांचे प्रमाण ४९७० होते.
सरकारने राष्ट्रीय स्तरावर मानसिक आरोग्य उपक्रम (National Mental Health Programme) राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मानसिक ताणतणावामुळे (Mental Stress) या आत्महत्या होत आहेत, असे सांगत सरकारने देशभरातील ६९२ जिल्ह्यांत राष्ट्रीय मानसिक आरोग्य उपक्रम (National Mental Health Programme) राबवणार असल्याची घोषणा केली आहे.
या उपक्रमात जिल्हा मानसिक आरोग्य अभियानाला बळ देणार असल्याचंही सांगण्यात आले आहे. आत्महत्या रोखण्यासाठी जनजागृती, शाळा, महाविद्यालयीन समुपदेशन, दैनंदिन आयुष्यातील व कामाच्या ठिकाणी असणारा ताण तणाव कमी करण्यासाठीचे प्रशिक्षणवर्ग असा भरगच्च कार्यक्रम या अभियानात राबवण्यात येणार आहेत.
व्हिडीओ पहा
मानसिक आरोग्याशिवाय आत्मनिर्भर भारत रोजगार योजना, राष्ट्रीय करियर सेवा , पंतप्रधान रोजगारनिर्मिती कार्यक्रम मेक इन इंडिया (Make In India), डिजिटल इंडिया (Digital India), अशा अनेक सरकारी योजनांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करण्यात येत असल्याचेही सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.
बहुतांशी लोकांना आपली नोकरी (Jobs), आपला रोजगार (Employment ) गमवावा लागला आहे, त्यामुळे २०२१ साली आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल २०२१ पासून बहुतांशी व्यावसायिकांना आपला व्यवसाय बंद करावा लागलेला आहे.
केंद्र सरकारने अशा लोकांना कसलीच आर्थिक मदत दिलेली नाही. त्यांना पुरेशा प्रमाणात रेशन देण्यात आलेले नाही. रोजगार गेलेल्या लोकांना आपला जीव द्यावासा वाटला कारण त्यांना रोजगाराची हमी वाटत नव्हती.
आत्महत्यांचे प्रमाण रोखायचे असेल लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज आहे. समुपदेशन आणि इतर उपायांचे परिणाम त्वरित दिसून येणार नाहीत, सरकारने रोजगारनिर्मितीवर लक्ष द्यावे, अशी मागणी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (AITUC) महासचिव अमरजित कौर यांनी केली आहे.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.