[ad_1]
पुणेः रशिया-युक्रेन युध्दामुळं (Russia Ukraine War) इंधन दरवाढीसह जागतीक व्यापार प्रभावित होत आहे. यामुळं कापूस (Cotton) वायद्यांत नरमाई आली. असं असली तरी बाजार समित्यांतील दर त्याप्रमाणात नरमले नाहीत. युध्दाचा परिणाम जाणवत असल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती दीर्घकाळ नसेल. युध्दाची परिस्थिती निवळल्यानंतर कापूस दर पुन्हा सुधारतील, असं जाणकारांनी सांगितले.
हेही वाचा – Top 5 News: कापसाचा तुटवडा जाणवू नये, म्हणून आयातीची मागणी.
रशिया आणि युक्रेनमधील युध्दाने आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market)काहीशी अस्थिरता निर्माण झाली. याचा परिणाम कापूस बाजारावरही जाणवतोय. रशिया कच्चे इंधन उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर नैसर्गिक वायू उत्पादनातही महत्वाचा देश म्हणून ओळखला जातो. मात्र रशियाने युक्रेनवर हल्ला केला आणि अनेक देशांनी निर्बंध लादले. आता अमेरिकेसह युरोपियन देशांनी निर्बंध वाढविले. त्यामुळं इंधनाचे दर वाढले आहेत. कच्चे तेल २०१४ नंतर प्रथमच १०० डाॅलर प्रतिबॅरच्या पुढे गेले. युरोपियन देश इंधनासाठी रशियावर अवलंबन आहेत. त्यामुळं हे निर्बंध किती दिवस चालतील हे सांगता येत नाही. असे असले तरी सध्या जागतीक बाजारात उलथापालथ सुरु आहे. भारतातील कापड उद्योग कच्च्या मालासाठी आयातीवर अवलंबून आहे. तर यंदा सूत आणि कापूस निर्यात वाढली. परिणामी देशांतर्गत बाजारात तेजी आली होती. देशातील कापूस दर आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा अधिक होते.
हेही वाचा – एफआरपीचे धोरण शेतकऱ्यांच्याच बाजूचे
मात्र युध्द सुरु झाल्यानंतर कापूस बाजारात अचानक नरमाई आली. इंधनाचे दर वाढल्यानं आयात-निर्यात (Import-Export)महाग झाली, असं जाणकारांनी सांगितलं. भारतातून सर्वाधिक निर्यात बांगलादेशला होतेय. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता दरावर दिसून येतेय. इंटरनॅशनल काॅटन एक्सचेंजवर कापसाचे वायदे १२३ सेंट प्रतिपाऊंडवरून सोमवारी ११७ सेंटपर्यंत आले आहेत. मे महिन्याचे वायदे ११७.२२२ सेंटने झाले. तर देशातील वायदेबाजारतही कापसाचे दर नरमले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंंजवर मार्चचे वायदे ३६ हजार ७४० रुपये गाठीने झाले. जवळपास सर्वंच देशांच्या वायदे बाजारात कापसाचे वायदे नरमले आहेत.
व्हिडीओ पाहा –
वायद्यांमध्ये कापूस दर नरमले असले तरी बाजार समित्यांमध्ये दरात त्याप्रमाणात नरमाई आली नाही. बाजार समित्यांतील दर १०० ते २०० रुपयांनी नरमले. मात्र सर्वसाधारण दर काही प्रमाणात स्थिर आहेत. देशातील बाजारात कापसाला सर्वसाधारण दर ९ हजार ५०० ते ९ हजार ९५० रुपयांपर्यंत मिळाले. गुजरात आणि महाराष्ट्रात बाजारातील सर्वसाधारण दर काही प्रमाणात स्थिरावलेले दिसत आहेत. दर कमी झाल्यानंतर शेतकरी बाजारात आवक कमी करत आहेत. त्यामुळं कापूस दर जास्त कमी होतील, अशी स्थिती नाही, असं जाणकारांनी सांगितले.
जागतीक पातळीवर यंदा कमी उत्पादन आणि अधिक वापर असं समिकरणं आहे. त्यामुळं कापूस तेजीत होता. मात्र युध्दामुळं ही नरमाई आलीये. ही स्थिती दीर्घकाळ नसेल. युध्दाची परिस्थिती निवळल्यानंतर कापूस दर पुन्हा सुधारतील, असं जाणकारांनी सांगितले.
प्रतिक्रिया
रशिया आणि युक्रेनमधील युध्दाने इंधनाचे दर वाढले आहेत. तसेच काही देशांचा व्यापार प्रभावित झाला. यामुळे दर नरमले आहेत. मात्र यंदा कापूस वापर वाढल्यानं पुढील काळात दर पुन्हा सुधारतील. ही स्थिती युध्द असेपर्यंत असू शकते.
– गोविंद वैराळे, ज्येष्ट कापूस तज्ज्ञ
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.