[ad_1]
1. देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन दिवस तरी ओसरण्याची शक्यता नाही. तर उत्तरेत उच्च दाब असल्याने थंड वारे वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने येत आहेत. परिणामी, गेले तीन दिवस विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये थंडीची लाट (cold wave) आली आहे. ही लाट मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून ओसरली असली तरी विदर्भात मात्र येते दोन ते तीन दिवस थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवली आहे. नागपूर वेधशाळेने पुढच्या 24 तासांसाठी विदर्भातल्या बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, आणि गोंदिया या जिल्ह्यांसाठी थंडीच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’ (yellow alert) जारी केला असून थंड दिवस (cold day) राहण्याचा इशारा कायम ठेवलाय.
Next 5 days weather warning for Vidarbha Dated 27.01.2022 #weatherwarning #imdnagpur #imd pic.twitter.com/AGy1esuRgL
— Regional Meteorological Centre, Nagpur (@RMC_Nagpur) January 27, 2022
2. सोलापूर बाजारात अल्प काळात कांद्याच्या हंगामी आवकेचा (seasonal arrivals) दबाव वाढला. परिणामी, आज बाजार समितीत अचानक मोठ्या प्रमाणात आवक झाली. ही बातमी देईपर्यंत आवक नेमकी किती झाली, हे स्पष्ट झालं नव्हतं. पण अतिरिक्त आवकेचं समायोजन करण्यासाठी उद्या 27 जानेवारीला सोलापूर बाजार समिती (Solapur APMC) बंद राहणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
हे देखील वाचा : शेती- निर्यातक्षम टोमॅटोची, भाग ७
3. दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियातील वाढत्या मागणीच्या अनुषंगाने या आर्थिक वर्षात भारताची गहू निर्यात (wheat export) ६.५ दशलक्ष ते ७ दशलक्ष टन असा विक्रमी टप्पा गाठेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारताने डिसेंबर अखेरीस ४.५ मेट्रिक टन गहू निर्यात केलेला आहे. प्रत्येक महिन्यात ५ ते ६ लाख टन गहू निर्यातीचा अंदाज असून त्यामुळे अतिरिक्त अशा १.५ ते २ मेट्रिक टन निर्यातीमुळे एकूण निर्यातीचा आकडा ७ मेट्रिक टनांवर पोहोचण्याची शक्यता ओलम ॲग्रो इंडिया लिमिटेडच्या राईस अँड ग्रेन्सचे (rice and grains) उपाध्यक्ष नितीन गुप्ता यांनी व्यक्त केली आहे.
हे देखील वाचा : तेलकट डागविरहित डाळिंब अन् बारमाही हुकमी कारले
4. गेल्या काही महिन्यांपासून केळीचे भाव (banana market rates) वेगवेगळ्या कारणांमुळे कमालीचे घसरलेत. त्यामुळे केळी उत्पादकांनी नियोजन करून फेब्रुवारी मार्चमध्ये लागवड केल्यास पुढील वर्षी नक्कीच फायदा होईल, असा अंदाज आहे. याचा अभ्यासपूर्ण विचार करूनच शेतकरी बांधवांनी निर्णय घ्यावा, असं आवाहन जळगावचे जागतिक केळीतज्ज्ञ के. बी. पाटील यांनी केलंय. गेल्या काही आठवड्यांपासून घटलेली मागणी, मालाची कमी उचल, इतर राज्यांमधल्या पिकाची स्पर्धा, अशा कारणांमुळे केळी दरांना आधार मिळत नाहीये.
हा व्हिडिओ पाहिलात का? :
5. गेल्या आठवडाभरात वऱ्हाडातल्या अकोला, अमरावती, मलकापूर, कारंजा, खामगाव, मुर्तिजापूर, आणि वाशीम सारख्या प्रमुख बाजारांमध्ये तुरीची आवक (tur arrivals) सातत्यानं वाढत चाललीय. अमरावती बाजारात गेल्या आठवडाभराच्या काळात 78,271 क्विंटल तुरीची आवक झाली. आज अमरावतीत आलेल्या 6348 क्विंटल मालाला 5500 ते 6533 च्या दरम्यान भाव मिळालाय. तर सर्वाधिक सौदे 6017 रुपयांना झालेत (modal price). शेजारी अकोला बाजारात आठवडाभरात 13,805 क्विंटल तूर आली होती. आज तिथं 2613 क्विंटल तुरीची आवक झाल्याचं कळतंय. या मालाला किमान 5100 तर कमाल 6630 रुपये भाव मिळाला. तर सर्वसाधारण भाव 5900 रुपयांचे होते. यंदा तुरीला 6300 ची किमान आधारभूत किंमत (MSP) जाहीर झालीय. पण तुरीच्या महत्त्वाच्या बहुतांश बाजारांमध्ये तुरीचे भाव किमान आधारभूत किमतीच्या खाली आहेत. पण असं असलं तरी गेल्या आठवडाभरापासून तुरीच्या दरांमध्ये सातत्यानं सुधारणा (price appreciation) होतीये. तसंच कर्नाटकातलं घटलेलं उत्पादन, शिल्लक साठा, आणि आयातीचं गणित पाहून स्टाॅकिस्टही खरेदीत उतरतायत, असं जाणकारांनी सांगितलं. त्यामुळे आवक वाढत असली तरी दरांमध्ये सुधारणा आहे. नुकत्याच सुरू झालेल्या हंगामात पुढे तुरीचे दर काय राहतील, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
[ad_2]
Source link