पीएम किसान योजनेचे लेटेस्ट अपडेट,12 वा हप्त्या कधी येणार खात्यात जाणून घ्या
देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार दीर्घकाळापासून प्रयत्न करत आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना ही देखील अशी योजना आहे, ज्याद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात.
आतापर्यत सरकारने पीएम किसान योजनेचे 11 हप्ते हस्तांतरित केले आहेत, तर 12 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. 31 मे रोजी सरकारने पंतप्रधान किसान योजनेचा 11 वा हप्ता म्हणून 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना दोन हजार रुपये हस्तांतरित केले होते.
आता शेतकरी (Farmers) पुढच्या म्हणजे बाराव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. पुढील हप्त्याचे पैसे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात हस्तांतरित करता येतील, असे सांगण्यात येत आहे.
दरवर्षी या योजनेच्या पहिल्या हप्त्याचे पैसे 1 एप्रिल ते जुलै दरम्यान पाठवले जातात. त्याच वेळी दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान पाठविला जातो, तर तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान पाठविला जातो.
पीएम किसान योजनेसाठी सरकारने ई-केवायसी (E-KYC) करणे अनिवार्य केले आहे. तुम्ही ई-केवायसी न केल्यास तुम्हाला पुढील हप्त्याचा लाभ मिळण्यापासून वंचित राहावे लागू शकते.
अशा परिस्थितीत करोडो शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी करून घेतले पाहिजे. ई-केवायसीची तारीख 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे.
तर सविस्तरपणे E-KYC कशी करावी आणि त्यानंतर अजून काय अपडेट आहे, त्यासाठी खालील बटणवर क्लिक करा