[ad_1]
सांगली ः टेंभू, ताकारी व म्हैसाळ उपसा सिंचन योजनांच्या पाणीवाटपाची व पाणीपट्टी वसुलीसाठीची व्यवस्था कार्यक्षम, तसेच प्रभावी करावी. या योजना सौरऊर्जेवर चालविण्याबाबतचा प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना जलसंपदा, लाभक्षेत्र विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.
सांगली पाटबंधारे विभाग येथील विश्रामगृहात शनिवारी (ता. १७) पालकमंत्री श्री. पाटील यांनी टेंभू, ताकारी व म्हैसाळ उपसा सिंचन प्रकल्प योजनांबाबत आढावा घेतला. त्या वेळी ते बोलत होते. सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एम. जे. नाईक, उपअधीक्षक अभियंता अमर सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, कार्यकारी अभियंता अभिनंदन हारूगडे, सचिन पवार, सूर्यकांत नलवडे, कुमार पाटील, राजन डवरी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, की सिंचन योजनांच्या पाणीवाटपाबाबत व पाणीपट्टी वसुलीबाबत योग्य नियोजन करावे. टंचाईच्या काळात पाणी देण्यासाठी त्याचा साठा करण्याबाबत योग्य नियोजन करावे, अशा सूचना देऊन त्यांनी सांगली, वाळवा, कासेगाव, समडोळी येथील पूरसंरक्षक कामे, डिग्रज, बोरगाव कोल्हापूर पद्धतीचा बंधारा दुरुस्ती कामे, आरफळ व कृष्णा कालवा लायनिंग कामे, मंत्रालयीन स्तरावरील प्रलंबित प्रस्तावांचा आढावा घेतला. तसेच सिंचन योजनांची विद्युत देयक स्थिती, पाणीपट्टी वसुली, विविध बंदिस्त नलिका कामे, प्रगतिपथावरील व प्रस्तावित कामे, योजनांची सद्यःस्थिती, भूसंपादन आदींबाबत सविस्तर आढावा घेऊन संबंधितांना योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले.
तसेच क्षारपड जमिनीसंदर्भात कवठेपिरान, डिग्रज, बोरगांव, आष्टा, उरुण- इस्लामपूर या गावांचे सर्व्हे पूर्ण झाले असून, प्रति हेक्टरी खर्च मापदंड शासनास त्वरीत सादर करण्याच्या सूचना ही श्री. पाटील यांनी या वेळी दिल्या.
सांगली ः टेंभू, ताकारी व म्हैसाळ उपसा सिंचन योजनांच्या पाणीवाटपाची व पाणीपट्टी वसुलीसाठीची व्यवस्था कार्यक्षम, तसेच प्रभावी करावी. या योजना सौरऊर्जेवर चालविण्याबाबतचा प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना जलसंपदा, लाभक्षेत्र विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.
सांगली पाटबंधारे विभाग येथील विश्रामगृहात शनिवारी (ता. १७) पालकमंत्री श्री. पाटील यांनी टेंभू, ताकारी व म्हैसाळ उपसा सिंचन प्रकल्प योजनांबाबत आढावा घेतला. त्या वेळी ते बोलत होते. सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एम. जे. नाईक, उपअधीक्षक अभियंता अमर सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, कार्यकारी अभियंता अभिनंदन हारूगडे, सचिन पवार, सूर्यकांत नलवडे, कुमार पाटील, राजन डवरी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, की सिंचन योजनांच्या पाणीवाटपाबाबत व पाणीपट्टी वसुलीबाबत योग्य नियोजन करावे. टंचाईच्या काळात पाणी देण्यासाठी त्याचा साठा करण्याबाबत योग्य नियोजन करावे, अशा सूचना देऊन त्यांनी सांगली, वाळवा, कासेगाव, समडोळी येथील पूरसंरक्षक कामे, डिग्रज, बोरगाव कोल्हापूर पद्धतीचा बंधारा दुरुस्ती कामे, आरफळ व कृष्णा कालवा लायनिंग कामे, मंत्रालयीन स्तरावरील प्रलंबित प्रस्तावांचा आढावा घेतला. तसेच सिंचन योजनांची विद्युत देयक स्थिती, पाणीपट्टी वसुली, विविध बंदिस्त नलिका कामे, प्रगतिपथावरील व प्रस्तावित कामे, योजनांची सद्यःस्थिती, भूसंपादन आदींबाबत सविस्तर आढावा घेऊन संबंधितांना योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले.
तसेच क्षारपड जमिनीसंदर्भात कवठेपिरान, डिग्रज, बोरगांव, आष्टा, उरुण- इस्लामपूर या गावांचे सर्व्हे पूर्ण झाले असून, प्रति हेक्टरी खर्च मापदंड शासनास त्वरीत सादर करण्याच्या सूचना ही श्री. पाटील यांनी या वेळी दिल्या.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.