[ad_1]
सांगली ः ‘‘जागतिक बाजार पेठ काबीज करण्यासाठी जगात चालणाऱ्या द्राक्ष वाण शेतकऱ्यांनी शोधले पाहिजे. त्याचबरोबर तंत्रज्ञानात आपण उतरलो पाहिजे. शेतीचा विकास करायचा असेल शेतकऱ्यांनी एकत्र येऊन फार्मर प्रोड्यूसर कंपनी स्थापन करून प्रक्रिया उद्योगात उतरावे,’’ असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
भिवघाट (ता. खानापूर) येथे सत्कार समारंभ व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. दरम्यान, गडकरी यांचा बेदाणा आणि डाळिंब या फळांचा हार घालून संजय पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. खासदार संजय पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, राजेंद्र देशमुख, विलासराव जगताप, राजाराम गरुड, अमरसिंह देशमुख, नीता केळकर, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद शेंडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य, सुहास शिंदे, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, प्रकाश जमदाडे, सचिन शिंदे उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, ‘‘७५ वर्षांत केवळ आश्वासने दिली. मात्र कोणतेही कामे पूर्ण केले नाही. शेती समृद्ध व्हायची असेल तर पाण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांजवळ पैसा येत नाही. तोपर्यंत शेतकरी समृद्ध होत नाही. ३० टक्के जनता गाव सोडून शहराकडे गेली आहे. येथील म्हैसाळ, ताकारी हे बंद पडलेले प्रकल्प पंतप्रधान व बळीराजा संजीवन योजनेत समाविष्ट करून ते पूर्णत्वास आणले.’’
‘‘शेतकऱ्यांनी अन्नदाता न होता ऊर्जादाता बनले पाहिजे. प्रक्रिया उद्योग उभारले तर शेतीमालाला चांगला दर मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना द्राक्ष, डाळिंबांच्या निर्यातीसाठी रांजणी येथे होणाऱ्या ड्रायपोर्टचा उपयोग होईल. त्यामुळे त्या ठिकाणी उद्योगाला चालना मिळेल,’’ असे गडकरी यांनी सांगितले.
संजय पाटील म्हणाले, ‘‘ गडकरी यांनी अनुशेषाच्या बाहेर जाऊन टेंभू उपसा सिंचन योजनेला निधी मिळवून दिला. त्यामुळे टेंभूचे पाणी दुष्काळी भागात पोहोचले. यामध्ये एक रुपयाही कंत्राटदाराकडून घेतला नाही. एवढा स्वच्छ कारभार आम्ही करत आहोत.’’
सांगली ः ‘‘जागतिक बाजार पेठ काबीज करण्यासाठी जगात चालणाऱ्या द्राक्ष वाण शेतकऱ्यांनी शोधले पाहिजे. त्याचबरोबर तंत्रज्ञानात आपण उतरलो पाहिजे. शेतीचा विकास करायचा असेल शेतकऱ्यांनी एकत्र येऊन फार्मर प्रोड्यूसर कंपनी स्थापन करून प्रक्रिया उद्योगात उतरावे,’’ असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
भिवघाट (ता. खानापूर) येथे सत्कार समारंभ व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. दरम्यान, गडकरी यांचा बेदाणा आणि डाळिंब या फळांचा हार घालून संजय पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. खासदार संजय पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, राजेंद्र देशमुख, विलासराव जगताप, राजाराम गरुड, अमरसिंह देशमुख, नीता केळकर, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद शेंडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य, सुहास शिंदे, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, प्रकाश जमदाडे, सचिन शिंदे उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, ‘‘७५ वर्षांत केवळ आश्वासने दिली. मात्र कोणतेही कामे पूर्ण केले नाही. शेती समृद्ध व्हायची असेल तर पाण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांजवळ पैसा येत नाही. तोपर्यंत शेतकरी समृद्ध होत नाही. ३० टक्के जनता गाव सोडून शहराकडे गेली आहे. येथील म्हैसाळ, ताकारी हे बंद पडलेले प्रकल्प पंतप्रधान व बळीराजा संजीवन योजनेत समाविष्ट करून ते पूर्णत्वास आणले.’’
‘‘शेतकऱ्यांनी अन्नदाता न होता ऊर्जादाता बनले पाहिजे. प्रक्रिया उद्योग उभारले तर शेतीमालाला चांगला दर मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना द्राक्ष, डाळिंबांच्या निर्यातीसाठी रांजणी येथे होणाऱ्या ड्रायपोर्टचा उपयोग होईल. त्यामुळे त्या ठिकाणी उद्योगाला चालना मिळेल,’’ असे गडकरी यांनी सांगितले.
संजय पाटील म्हणाले, ‘‘ गडकरी यांनी अनुशेषाच्या बाहेर जाऊन टेंभू उपसा सिंचन योजनेला निधी मिळवून दिला. त्यामुळे टेंभूचे पाणी दुष्काळी भागात पोहोचले. यामध्ये एक रुपयाही कंत्राटदाराकडून घेतला नाही. एवढा स्वच्छ कारभार आम्ही करत आहोत.’’
[ad_2]
Source link